Monday 26 December 2016

इंजिनीरिंग

माझा दिवस रोज सकाळी ६. ०० ला सुरु होतो . सकाळी निद्रेतून बाहेर आल्यावर सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स ,टाइम्स ऑफ इंडिया वाचल्याशिवाय दिवसाची सुरवात सध्या कुणाचीच होत नाही . सकाळ व महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी सध्याच्या बातम्या ,आर्थिक बातम्या ,नोकरीच्या बातम्या वाचत होतो . पेपर वाचत असताना काही बातम्या माझे लक्ष वेधून घेत होत्या . कमी होत असलेल्या नोकऱ्या ,चालू असलेली जागतिक मंदी ,तडकाफडकी काढून टाकलेले इंजिनिअर ,ह्या  बातम्यांनी सध्या दिवस सुरु होत होता . आणखी एका बातमीने मला अस्वस्थ केले . सकाळ मध्ये पहिल्या पानावर एका दुसऱ्या वर्षी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने नस कापलेली बातमी होती व टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एका तिसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिल्डिंग  वरून उडी मारलेली बातमी होती . हि बातमी वाचून  माझ्या काळजात धस्स झाले . मी चहा बाजूला ठेवला व पूर्ण बातमी वाचली . हे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीरिंग ला शिकणारे होते  . सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले असल्याने मला  हायसे वाटले . त्यांनी एवढ्या टोकाचा  घेतलेला निर्णय ह्यामागचे कारण होते त्यांना शिक्षणात आलेले अपयश .हे कारण वाचल्यावर मला त्या दोघांचा खूप राग आला . त्यांनी का आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला ?ते नर्वस होते का ?त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम नव्हते ?त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हेच सर्वोच्च  मानले ?

ह्या नकारात्मक बातम्या वाचून मी पुढे पेपर वाचन केले नाही . मी चहा पिऊन आवरलो व सॅक घेऊन सकाळी ६.३० ला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो . जिम ला  जाताना मी विचार करत होतो . मला त्या दोन मुलांची दया आली . अपयश पचवायची त्यांच्यात हिम्मतच  नव्हतीच का ?त्यांच्याकडे कुणी शिक्षकांनी लक्ष का नाही दिले ?त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असणार  ?एवढ्या टोकाला जायचे काय कारण होते ?

मला माझं मेकॅनिकल इंजिनीरिंग चे दिवस आठवले . मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी तीनदा नापास झालो होतो . बऱ्याचदा मला काही ठराविक शिक्षकांनी बोलून बोलून माझे जोरदार
खच्चीकरण  करत होते .तोंडी परीक्षण च्या वेळेस बऱ्याचदा मला तोंडावर अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागले होते . मी नापास झाल्यावर माझ्यावर झालेला त्याचा नकारात्मक परिणाम  मी अनुभवला आहे ,नापास होणे म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हा करणे असे हावभाव असलेले चेहरे मी पाहिले आहेत .माझ्या कॉलेज च्या एक सिनियर शिक्षकाने मला शिक्षण पूर्ण करण्याचे थेट आव्हान दिले होते . पण ह्या सर्व गोष्टीना मी पुरून उठलो व माझा शिक्षण हे फर्स्ट क्लास नि पूर्ण झाले . ह्या सर्व माझं खचीकरण करणार्यांना मी खोटे ठरवले व निव्वळ जिद्दीवर माझं शिक्षण पूर्ण झाले होते . 
इंजिनीरिंग हे कधीच सोप्पे नसते व कधीच अवघड नसते व कुणीही इंजिनीरिंग गृहीत धरून चालू नये . नस कापणे,आत्महत्या करणे हा समस्यांवर उपाय नाही . आपल्या आयुष्यात यश अपयश व नोकरी कधीच कायमची नसतात . नापास होणे हे नैसर्गिक आहे . जो माणूस काम करतो तोच अपयशी होती . स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास असल्यावर ह्या जगात अशक्य असे काही नाही . कुणी हुशार नसतो व कुणी ढ नसतो सर्वाना समान बुद्धिमत्ता असते . शिक्षण घेताना किंवा नोकरी करताना अपयश येणार ते कुणी टाळू शकत नाही पण तेच अपयश पचवून धक्के खाऊन जो पुढे जात राहतो तोच नंतर जिंकतो .मला शिक्षण पूर्ण करायचेच होते त्यामुळे सर्व आलेल्या धक्क्यांना पुरून उठून पुढे जात राहिलो व ३ डिग्री पूर्ण करून स्वतःच्या नजरेत मी कधीच अपयशी झालो नाही . अंगात जिंकण्याचा किडा असल्यावर येणाऱ्या अपयशाने आपण कधीच खचून जात नाही . मी विचार केला आता हि दोन मुले काय करणार ?त्यांच्या आई वडिलांना काय वाटणार ?त्यांना धीर कोण देणार ?आता येणाऱ्या टोमण्यांना ते कसे तोंड देणार ?
मी तळवलकर ला पोचलो . हे जिम माझे आवडते आहे . मी माझा पोशाख बदलून थेट जिम Floor ला  गेलो . तिथे असलेले काही सुविचार मला उत्साहित करीत होते . 
''I am neither clever, nor intelligent but i am successful bcoz i kept going and going and going'.
''Every champion was once contendor who refused to give up''
हॉलिवूड च्या रॉकी सिनेमाची हे सुविचार अनुभवाचे बोल होते . असे सुविचार आपला दिवस नक्कीच आशादायी करतात . मी मनातल्या मनात प्रार्थना केली ती दोन मुले सुखरूप असतील व मी  रॉकी बाल्बोआ  च्या गाण्यावर वोर्क आऊट ला सुरवात केली . 

Rising up, back on the street

Did my time, took my chances

Went the distance, now I'm back on my feet

Just a man and his will to survive

So many times it happens too fast

You trade your passion for glory

Don't lose your grip on the dreams of the past

You must fight just to keep them alive

It's the eye of the tiger

It's the thrill of the fight

Rising up to the challenge of our rival


लेखन -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३
©

Friday 23 December 2016

सिने परीक्षण -दंगल

आमिर खान एक अष्टपैलू कलाकार व हिंदी सिनेमा च एक अजब रसायन व सिनेमाचं विद्यापीठ .!!तब्बल २ वर्षांनी ह्या अष्टपैलू कलाकाराचा सिनेमा पाहायचा योग आला आणि प्रतिवर्षी प्रमाणे हाही सिनेमा आपल्या अपेक्षा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरतो  . सिनेमा ची कथा सुरु आहे तरुण असलेला कुस्तीपटू महावीर फोगत (आमिर खान) व त्यांचे  कुस्ती प्रेम ह्या २ गोष्टींभवती फिरते . ऐन उमेदीचा काळात अत्यंत चिकट व तडफदार असलेला महावीर फोगट ना काही कारणास्तव कुस्ती सोडावी लागते  व त्यांचे गोल्ड मेडल जिंकायचे स्वप्न भंगते .कुस्ती ला सर्वस्व मानणारे व भारतासाठी गोल्ड मेडल चे स्वप्न असलेले महावीर फोगट कालांतरानंतर हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढी कडून  पूर्ण करून घ्यायचे ठरवतात . पण  मुली असल्याने त्या  हे स्वप्न पूर्ण करू शकतील काय हि शंका महावीर ह्यांना सतावते . पण एका प्रसंगामुळे महावीर ह्यांचा आपल्या मुलींवर विश्वास बसतो व ते आपल्या मुलींना कुस्ती साठी बालपणापासून तयार करायला सुरु करतात . पण मुली असल्याने मुलं /मुली अश्या भेदाला त्यांना सामोरे जावे लागते . कुस्ती हि पुरुषांची मक्तेदारी असल्याने ती मुलींना जमेल काय ? हा असलेला गैरसमज व भेद महावीर फोगत ह्यांच्या मुली गीता व बबिता (सानिया मल्होत्रा व फातिमा शेख )ह्या खोडून काढतात व त्या कुस्तीमध्ये प्रत्येक लेवल ला पदक जिंकतात . पण गोल्ड मेडल जिंकायचे असलेल स्वप्न हे गीता(फातिमा  ) पूर्ण करते . सिनेमा ची कथा हि वडील व मुलींचे असलेलं हळुवार नाते ह्यावर प्रकाश टाकते . अखेर हा आमिर खान चा सिनेमा आहे त्यामुळे सुरवातीपासून फक्त आमिर खान ह्या नावाचा काय प्रभाव आहे हे जाणवत राहते . एक तरुण कुस्तीपटू ते २ मुलींचा पिता हा बदल थेटर मधेच जाऊन पाहावा . एक अभिनेता आपली भूमिका व अभिनय करण्यासाठी कसे अपार कष्ट घेतो हे पदोपदी जाणवते. Best or Nothing हा नियम वापरल्यास काही अशक्य नाही हे आमिर खान दाखवून देतो . गीता (फातिमा  )चा अभिनय हा देखील वाखाणण्याजोगा  आहे . सिनेमा ची कथा आपल्याला पूर्ण कुस्ती ह्या खेळामध्ये गुंतवून ठेवते व कुस्ती न पसंद करण्याऱ्यांना हा सिनेमा पाहताना कुस्तीची मनापासून आवड निर्माण होते .काही मिनिटे अभिनय केलेले गिरीश कुलकर्णी आपली छाप पडतात . आमिर खान ह्या  सर्वोत्कृष्ठ कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी व आपले शरीरावर प्रेम करण्याऱ्या कुस्तीपटूंनी व आपले वजन वाढलेले असताना ते कमी देखील होऊ शकते हे पाहण्यासाठी नक्की एका नाही दोनदा हा सिनेमा पहाच .
***** ५ स्टार्स 
लेखन -कौशिक श्रोत्री 
संपर्क -९९२१४५५४५३

Wednesday 21 December 2016

नोटबंदी

८ नोव्हेंबर २०१६ हि तारीख भारताच्या इतिहासात गणली जाईल .ह्याच दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी ५०० व १००० च्या नोटा ह्या भारतीय चलनातून रद्द होणार अशी अधिकृत घोषणा केली .अर्थव्यस्थेत असलेला काळा पैसे बाहेर काढण्यासाठी व अर्थव्यस्था नोटावीररहित करण्यासाठी घेतलेलं   ह्या निर्णयाने भारतीय अर्थकारण हे पूर्णपणे बदलून जाणार होते . असा हा धडाकेबाज निर्णय भारतीय जनतेने पहिल्या वेळेस पहिला .असा धडाकेबाज निर्णय भारतात घेतले जाऊ शकतात ह्यावर भारतीय जनतेचा विश्वास बसू लागला . ह्या निर्णयाने पूर्ण देशभरात काही ठिकाणी कौतुक,उत्साह,स्वागत  व काही ठिकाणी हाहाकार,विरोध होत होता . हा निर्णय झाल्यावर जनतेला ३ महिने ५०० व १००० च्या नोटा जमा करायची मुदत देण्यात आली . ह्या निर्णयाने नक्कीच एका नवीन पर्वाची सुरवात होणार होती. ATM व बँकेतून पैसे काढण्यावर काही अंशी बंदी आली . ९ नोव्हेंबर पासून हा निर्णय अमलात आल्यावर मी १५ नोव्हेंबर ला idbi बँकेत १०० च्या नोटा घेण्यास गेलो . तिथे प्रचंड गर्दी होत होती . ५०० व १००० च्या नोटबंदीनंतर २००० ची नवीन नोट येणार होती . त्यामुळे मला १०० च्या नोटा घेण्यास गत्यंतर नव्हता . मी रांगेत उभा राहिलो . रांगेत उभा असताना मला तिथे आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या . 
सोने चांदी व्यापारी ,''हे सध्याचे सरकार म्हणजे काय करेल नेम नाही . ह्या सरकारने टप्पाटप्प्याने निर्णय घेतला असता तर खूप चांगले झाला असते .ह्यांनी जर आधी सर्वाना सूचना केल्या असत्या की १००० व ५०० च्या नोटा आम्ही ह्या महिन्याअखेर बंद करणार आहोत तर आम्हाला पुढचे नियोजन करता आले असते . आमचा व्यवसाय पूर्ण शांत झाला आहे  .त्यात आणि दिवसाला ४००० पैसे   बँकेतून काढण्याचे लिमिट आहे . ऐन सणासुदीच्या काळात जर गिर्हाईक नसेल तर  आम्हाला दुकानाला कुलूप घालावे लागेल.उद्या ह्यांनी सोने चांदी च्या बाबतीत निर्णय घेतल्यावर कल्याणच आहे आमच!!!! आधीचे सरकारच बरे असे वाटत आहे . ह्या निर्णयाने छोटे खानी सराफ व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे .

यंत्रमागधारक -''एक तर आम्ही आधीच अडचणीत आहोत त्यात आणि हि मोठी तलवार म्हणजे आम्हाला पण घरीच बसावे लागेल . आम्हाला आधीच वीजबिलाची अडचण ,कामगारांची अडचण ,मंदीचं वारा आणि हे आणि नवीन कॅशलेस म्हणजे आम्ही एक तर दुसऱ्या देशात जावे किंवा दुसरा व्यवसाय करावा ''.  

मी,''ह्या सरकारचा हा निर्णय घेण्यामागे हेतू अतिशय प्रामाणिक व स्पष्ट आहे . सर्व काळा पैसे ,भ्रष्टचार ,दहशतवाद थांबवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नक्षलवादी ,स्मुग्लर ,दहशतवादी ,दंगलखोर ह्यांचा आर्थिक पुरवठा ५०० व १००० च्या नोटांवर होता तो ह्या निर्णयाने पूर्ण थांबणार आहे . इनकम टॅक्स लपवणारे व अमली पदार्थ व्यावसायिक ह्यांचा पतपुरवठा पूर्णपणे थांबून हा सर्व पैसे उजेडात येणार आहे . हा निर्णय आल्यापासून जम्मू काश्मीर ची परिस्तिथी पूर्ण पणे शांत आहे   जे लोक आपल्या जवानांवर दगडफेक करत होती ते पूर्णपणे थांबले आहे''. 

कॉलेज ची विद्यार्थिनी ,''तरी पण असे अचानक निर्णय घेऊन सरकारने काय साधले ?इथे मला अभ्यास सोडून इथे रांगेत पैसे काढण्यासाठी उभे राहावे लागत आहे . बाहेर एक हा हि ATM  मध्ये १०० व ५० च्या नोटा नाहीत त्यात आणि ५०० च्या जुन्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत .मला  निर्णय पटत आहे पण वेळ व पद्धत चुकीची वाटत आहे . आता अजून ३ तास मला इथेच बसावे लागणार आहेत . 

वाहतूक व्यावसायिक ,'' आमची तर पूर्ती हजामत झाली आहे राव . एक तर आमचा व्यवसाय पूर्ण हा ५० टक्के रोखीवर चालतो . लांब पाल्याची वाहतुकीला आम्हाला ड्राइवरला काही रोख पैसे द्यावे लागतात . आता आमचे ड्राइवर लांब पाल्यावर गेले आहेत त्यांनी आता काय करावे अवघडच होऊन बसले आहे .कॅशलेस व्यवहार हा आम्हाला सुद्धा आवडेल उलट आमची आर्थिक कामे जास्तच सोप्पी होतील . त्यांच्याकडे असलेल्या ५०० च्या नोटांच त्यांनी काय करावे आता ?''हा व्यावसायिक बराच त्रस्त वाटत होता . 
जशी रंग पुढे सरकत होती तसं प्रतिक्रिया वाढत होत्या . माझ्या पुढे मागे असलेल्या काही लोक व एका कॉलेज विद्यार्थिनी मध्ये संवाद सुरु होते . त्यात आता बाकीचं लोक पण प्रतिक्रिया देत होते . 

इंजिनीरिंग व्यावसायिक - इथे आम्हाला जास्त त्रास झाला नाही . आमचे सर्व व्यवहार हे चेक व क्रेडिट वर होत असल्यामुळे व इंजिनीरिंग चा व्यवसाय असल्यामुळे जास्त त्रास जाणवला नाही . फक्त आम्ही ज्या कामगारांचे पगार रोखीने करतो ते करताना थोडा त्रास आम्हाला सहन करावा लागला बाकी आमच्या स्टाफ चे पगार थेट बँक अकाउंट मध्ये जमा होतात . पण ह्या निर्णयाने देश नक्की पुढे जाणार आहे . सोने चांदी व बांधकाम क्षेत्र ह्या २ व्यवसायांमध्ये वस्तूंच्या किमती ह्या खूप कमी होणार आहेत व त्याचा आपल्यालाच होणार आहे . सर्व बँक कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देतील कारण ह्या निर्णयाने बँकेमध्ये ५०० व १००० च्या प्रचंड नोटा जमा होत आहेत व व्याज दर देखील कमी होत आहेत . 

गृहिणी-घरात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे पगार कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे .घरात काम करणारे कामगार काय डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन फिरणार आहेत ??एवढे तरी समजायला हवे ह्या सरकारला त्यात आणि कहर म्हणजे २००० ची नोट हे सरकार बाजारात आणणार म्हणजे १०० आणि ५० रुपये च्या खरेदीसाठी आम्ही काय २००० ची नोट घेऊन फिरू काय ?कोणाकडे २००० चे सुटे पैसे असतात?उगीचच सरकारनं अमेरिका मधील कॅशलेस  पद्धत इथे मुळीच घेऊन येऊ नये. 
त्या गृहिणींचा रोकठोक संवाद ऐकून बऱ्याच जणांनी त्यांना दाद दिली . मला कॅश काउंटर वॉर जायला २ तास लागले .त्या वेळेमध्ये रांगेत उभे असलेले लोकांच्यात  अर्थव्यवस्था व कॅशलेस ह्या विषयावर खूप चर्चा चालू होती . कुणाला निर्णय आवडला कुणाला नाही आवडला कुणी त्याचा समर्थन केले . एक फरक मला जाणवला ८ नोव्हेंबर आधी मी जेव्हा बँक किंवा ATM मध्ये जात होतो तेव्हा पण थोडी गर्दी असायचे पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते . पुढे उभा असलेला माणसाला मागे कोण उभा आहे कल्पना पण नव्हते . पण ८ नोव्हेंबर नंतर समोरचा ओळखीचा नसला तरी त्याचाशी ५ शब्द लोक बोलत आहेत . नोटबंदी हा निर्णय ९०% लोकांना पटला होता फक्त त्याची अंमलबजावणी ची वेळ व पद्धत चुकीची आहे असा तिथे आलेल्या सर्वांचं म्हणणे होते .ह्या निर्णयाने कमी पैशामध्ये कसे जगावे ह्याचा देखील एक धडा मिळत होता .शेवट माझा कॅश काउंटर ला नंबर आला . मी १०० च्या नोटा मोजल्या व त्या माझ्या पाकिटात ठेवल्या व जाताना तिथे असलेल्या कॅशियर च्या चेहऱ्यावर असलेला तणाव पाहून त्याला एक मार्मिक हास्य दिले व बँकेतून बाहेर पडलो . 

लेखन -कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३







Sunday 18 December 2016

सिने परीक्षण ROGUE STAR WARS

ह्या आठवड्यात मी STAR WARS च परीक्षण ना पाहता थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . एकंदर नावावरून ह्या सिनेमाची कथा हि उत्कृष्ट असणार अशी खात्री होती . माझ्या लेखन करिअर मध्ये सर्वप्रथम मी दिग्दर्शक व सिने अभिनेता ह्यांच्या कडे न पाहता व स्टार वॉर बद्दल जास्त माहिती नसताना थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . ह्या सिनेमाची सुरवात एका वैज्ञानिकाच्या(GALEN ERSO) आयुष्यापासून होती.एक अत्यंत हुशार असलेला वैज्ञानिकाच्या आयुष्यात एक वादळ येते . एका अंतराळ संस्था चा अध्यक्ष गॅलेन ला पळवून नेतो व आपल्या अत्यंत धोकादायक अश्या SHUTTLE तयार करतो जे पूर्ण एक ग्रह उध्वस्त करू पाहतो. त्याचा वापर करून अध्यक्ष जेधा नावाच एक गाव उध्वस्त करतो . नंतर ग्लेन ची मुलगी पुढे वडिलांचा वारसा पुढे न्हेत एक पायलट व एक मानवी अँड्रॉइड रोबोट व तिच्या मदतीने त्या अध्यक्षाला शोधून काढून बाहेर काढती व सिनेमा संपतो . सदरचा सिनेमा हा सुपरसॉनिक अंतराळ मधला आहे . सिनेमाच ऍनिमेशन व सिनेमॅटोग्राफी नक्की कौतुकास पात्र आहे . आधुनिक इलेक्ट्रॉनिक मधले अविष्कार व अंतराळ मधले गती व दिवा ची स्पर्धा दाखवतील . सदर सिनेमाची कथा हि पटकन उमजत नाही त्यामुळे नक्की काय चालू आहे हे समजायला सिनेमाचा शेवट येतो . मध्यंतरानंतर कथा सुमार होऊ लागते व आपल्याला कधी एकदा सिनेमा संपतो अशी जाणीव होते. फार काही खोलात न जात ज्यांना स्टार वॉर बद्दल माहिती आहे त्यांनीच हा सिनेमा पाहावा बाकीच्यांनी आपल्या मर्जीवर जावे .
१.५ स्टार
9921455453
लेखन -कौशिक श्रोत्री 
©



Friday 25 November 2016

सिने परिक्षण -डिअर ज़िन्दगी

इंग्लिश विंग्लिश सिनेमा आठवतोय ???? काही वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता.गौरी शिंदे ह्यांच्या अफलातून दिग्दर्शनामुळे व् श्रीदेवी ह्यांच्या अभिनयामुळे सिनेमा प्रचंड गाजला होता. सध्या गौरी शिंदे ह्यांचा डिअर जिंदगी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे . बऱ्याच वर्षांनी गौरी शिंदे ह्यांचा सिनेमा येत असल्यामुळं त्याकडून अपेक्षा निश्चित होत्या व हा सिनेमा आपल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करतो.  सिनेमा च्या कथेची सुरवात होती कायरा (आलिया भट ) पासून जिच्या आयुष्याची उमेदीची सुरवात हि भरकटत जाते . मुळात एक सुशिक्षित व उत्साही असलेली कायरा ला आत्मविश्वास हा नसल्यामुळेतिचे ऐन उमेदीचे आयुष्य हे नियोजन न केल्यामुळे भरकटत जाते . सर्व गोष्टींमध्ये नकार हा बऱ्याच अंशी पचवता न आल्यामुळे व मॉडर्न विचारसरणी असल्यामुळे कायरा चा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक होऊन जातो .निराशा व चिडचिडेपणा नि ग्रासल्यानंतर व आयुष्य एका टोकाला गेल्यावर  तिला जहांगीर खान (शाहरुख खान ) हा मेंटॉर भेटतो. अत्यंत व्यावहारिक असलेला व प्रत्येक प्रश्नांची सहज उत्तर शोधणाऱ्या जहांगीर खान मुळे कायरा च्या  आयुष्याला हि पूर्ण कलाटणी मिळते . सिनेमा हा पूर्णपणे आजची तरुणमुले व मुली व त्यांची विचारसरणी ह्यांचे अतिशय उत्तमरीत्या मांडणी करतो . सिनेमा ची कथा हि अतिशय सरळ ,साधी व उत्कृष्ट रित्या मांडली आहे ज्यात कुठेही फिल्मी थिल्लरपणा व मसाला नाही . बऱ्याच वर्षांनी शाहरुख खान मधला अभिनेता उठून दिसला आहे . एका मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेला त्याने न्याय दिला आहे . सध्याच्या पिढीची आलिया भट्ट चा अभिनय हा सर्वोत्कृष्ट आहे . एक फॉरवर्ड,अल्लड,उत्साही व काही अंशी चिंतेने ग्रासलेल्या मुली चा अभिनय हा तिने अतिशय उत्कृष्टपणे केला आहे . सिनेमाच्या शेवटी तिचा मेंटॉर जहांगीर खान मुळे तिच्या आयुष्यात झालेला बदल, त्याला निरोप देताना तिचा अभिनय हा नक्कीच पाहण्याजोगा आहे . एका मुलीला कुटुंबाने सहकार्य केल्यावर ती काय करू शकते ह्यावर सिनेमा भाष्य करतो . संगीत हा सिनेमा चा आत्मा आहे . सर्व गाणी व पाश्वसंगीत अतिशय उत्कृष्ट आहेत व  पाश्वसंगीत हे  सिनेमाच्या आशयाशी बरोबर जुळून आले आहे . सिनेमा मध्ये कुणाल कपूर ,आदित्य रॉय कपूर व  अली जफर ह्यांचा अभिनय फक्त चेहरा दाखवण्यापुरताच आहे . आयुष्य हे खूप साधे व सरळ आहे ते सरळपणे मनसोक्त जगा व जगू द्या हा संदेश देण्याऱ्या एक साधा सरळ व आयुष्यावर असलेला सिनेमा नक्की पाहावा . 
३ मिरच्या 
परीक्षण - कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

Wednesday 23 November 2016

Eye of the Tiger

 I came back to home with Burning Mind and Muscular Hands. I didn't have great day in an office. Private People are getting unsatisfied by satisfying customers since Customer is God. Today's Private sector is turned out as 80:20 Ratio of (Politics: Work) in small Industries. Little Urge with a Boss had lightened fire inside me. Patience and Sweetness in language will surely help you in such situations. Yet at young age it is difficult to handle such situations since we are not aware of it. Sudden Aggression can make situations Worst. I switched on TV to watch Rocky Series. I always watch movie twice a day on my desktop. Movies take away my Anger, Regression. I loved Sylvester Stallone as an Actor.  Rocky and Rambo Series is one of best series of movies of Sylvester. After switching On TV I began to have a punch on punching bag in my Room. This helps to light off fire inside you and surely helps you to calm down. I was watching Rocky 4. Larger than Life Elements of Movie, Underdog who keeps Fighting with Dragoon, Motivational words given by Tony Burton To Sylvester During Fights to keep Rocky’s Moral High caught my Attention. I watched Movie from start to end. Rise of Rocky as Winner even after losing initial rounds in boxing match Kicked my Butt. We (Youngsters) are facing situations when our talent is not recognized by C.E.O, Plant Head, Senior Persons due to Insecurity and Politics. We even get frustrated many times at Office Premises. Even at many hard times we think to have some punches to senior guys. Surely this is not the answer. Many times Talented People are kept aside in Private Sector and People who pretend to work are promoted ahead. We are not taught in school a topic how to deal with a people. Many times our Confidence and moral is not awarded by seniors. During such situations don’t get tensed and frustrated. We are guys gifted with Equal Talents and Equal Opportunities.  As said by Rocky,'' If you know what your worth then go out and get that worth'' when a guy has a talent it will definitely come to face of world. Private Sector is a Boxing Match you will get different kinds of Hard Punches on Daily Basis. Don’t get blown away by such punches. Your Senior Person is just a man he is not Machine. People who are insure pretend to pressurize there juniors. Do not forget “When you're scared, when you're hanging on, when life is hurting you, then you're going to see what you're really made of.".

This is life where you will be meeting people who will pressurize you, screw you, throw you, frustrate you, and dominate you. You will fail; loose job but your ability to get HIT by these things and keep moving forward will surely make you at the end WINNER. 
Written by- Kaushik Shrotri
9921455453
©

Saturday 19 November 2016

सिने परीक्षण -फोर्स २

मागच्या आठवड्यात ११ नोव्हेंबर ला रॉक ऑन २ सिनेमा आला होता आता फोर्स २ आला आहे . एखाद्या सिनेमा चा २रा भाग बनवताना बऱ्याचदा कथेवर जास्त लक्ष दिले जात नाही . सध्या प्रदर्शित झालेला फोर्स २ च्या बाबतीत असेच काही अंश पाहायला मिळते .२०११ ला आलेला फोर्स चा हा २रा भाग . सिनेमा ची सुरवात होती ACP यशवर्धन (जॉन अब्राहम ) च्या पिळदार,८ बिस्कीट असलेल्या दणकट ,४ चाकी वाहन व बुलेट दोन्ही हातानी कवेत घेणाऱ्या शरीराने जे पाहताच आपल्यात शरीर तंदुरुस्ती ची जागरूकता परत निर्माण होते व जिम ला न जाणारे मुले परत जिम ला जायचा विचार करायला लागतात . भारतीय गुप्तहेर संघटनेचा  एक गुप्तहेर असलेला यशवर्धन ला त्याच्या साथिदारांच्या अचानक बेपत्ता होणे हि बातमी समजते . त्याच्या शोधात तो व के के (सोनाक्षी सिन्हा )परदेशात बुडापेस्ट ला जातात . तिथे त्या दोघांना बेपत्ता होण्यामागचं कारण व त्याचा सूत्रधार कळतो . त्यानंतर सुरु होते जॉन अब्राहम व त्या सूत्रधाराच्या गोळ्यांचा व बुक्यांचा आवाज व सिनेमा ची समाप्ती होती . 
जॉन अब्राहम चा अभिनय नक्कीच पाहायच्या लायक आहे . एक पिळदार शरीरयष्टीचा ,एक थंड डोक्याचा पोलीस अधिकारी व देशविरोधी शत्रुंना शोधून काढायची त्याची धडपड नक्की पाहण्याजोगी आहे . सोनाक्षी सिन्हा चा अभिनय पण छान आहे . पण बोलके डोळे असल्याने तिचा अभिनय अधिक डोळ्यांमधून दिसून येतो . सिनेमा चा खलनायक असलेला ताहीर नक्कीच आपल्याला खिळवून ठेवतो . सिनेमा मधून गुप्तहेर व त्यांचे देशासाठी केलेले प्रामाणिक योगदान ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे . ह्या सिनेमा ची कथा हि अतिशय उत्कृष्ट आहे पण डायरेक्टर ह्यांनी ती मध्यांतरानंतर ती पळवली  . सिनेमा च्या शेवटी केलेले शूटिंग पाहताना आपण COUNTERSTRIKE पाहतो काय असा प्रश्न पडतो ???सिनेमा मध्ये असलेला जेनेलिया देशमुख चा वावर हा सुखावतो . 
जॉन अब्राहम चे फॅन ,त्याची शरीर तंदुरुस्ती ,जेनेलिया चे फॅन व गुप्तहेर ची आवड ज्यांना आहे त्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा . 
२. ५ स्टार्स 
लेखन - कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३

Tuesday 15 November 2016

सिने परीक्षण राँक आँन 2


2008 ला राँक संगीत या विषयावर राँक आँन सिनेमा हा आला होता.अप्रतिम संगीत व अभिनयामुळे हा सिनेमा अविस्मरणीय ठरला होता. फरहान अख्तर व पूरब कोहली ह्यांचा दमदार अभिनय व् शंकर एहसान लॉय ह्यांचे संगीतमुळे हा सिनेमा हा एक लाजवाब कलाकृति ठरली होती त्याचाच पुढचा भाग म्हणजे सध्या आलेला रॉक ऑन २. पहिला भाग हा प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे ह्या सिनेमा कडून खुप अपेक्षा होत्या. पण रॉक ऑन भाग २ हा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात काही अंश यशस्वी ठरतो.मैजिक बैंड चे सदस्य आदित्य (फरहान ) जो (अर्जुन रामपाल ) के डी (पूरब कोहली ) ह्यांच्या बदलेल्या आयुष्याने सिनेमाचे सुरवात होती मैजिक ची कीर्ति ही जोरदार वाढत असते. मैजिक च्या संगीताचे चाहते हे वाढत असतात. यशाच्या एक मोठ्या शिखरावर असताना ह्या मैजिक बैंड कडून एक नकळत चूक होती व् त्यांची फाटफुट होती. ह्या फाटाफूट ची जबाबदारी मनाला लागल्यामुळे आदित्य (फरहान अख्तर ) हां शिलॉन्ग ला राहायला जातो.संगीत हे ह्या सिनेमा ची उजवी बाजु आहे सुरवातीपासूनचे पाश्वसंगीत हे आपल्या कानात रहते व आपल्याला थेटर मध्ये एका थेट रॉक बँड च्या कॉन्सर्ट चा अनुभव देते . कालांतराने शिलाँग मध्ये आलेल्या एका नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मॅजिक बँड परत एकत्र येतो . फरहान अख्तर च्या अभिनय व गायक ह्या दोन्ही भूमिकेला तोड नाही .अर्जुन रामपाल,प्राची देसाई ह्यांचा अभिनय फक्त चेहरा दाखवण्यापुरताच आहे . सिनेमा ची सर्वात उजवी बाजू म्हणजे श्रद्धा कपूर चा अभिनय व गायन ह्या दोन गोष्टींमध्ये तिने बाजी मारली आहे .
मध्यंतरानंतर कथा जरा वेगवान होते पण संगीत व श्रद्धा कपूर हा वेग सुसह्य करतात . एकंदरीत सिनेमंची कथा आणखीन खुलली जाऊ शकली असती . सिनेमाच्या अखेरीस दाखवलेली थेट कॉन्सर्ट व उषा उत्तप ह्यांच्या गाण्याच्या सुरांची , संगीताची अमर्याद मेजवानी आहे . सर्व गाणी तुम्हाला डोलायला लावतील व तुम्हाला तरतरीत व ऊर्जा देतील .
श्रद्धा कपूर चा अभिनय व गायन , फरहान अख्तर चा अष्टपैलू अभिनय व रॉक संगीतप्रेमी नि हा सिनेमा नक्की पाहावा . संगीतप्रेमींना हा सिनेमा हि एक मेजवानी ठरणार आहे .. नक्की पाहावा .
२. ५ स्टार्स
लेखन - कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३

Saturday 12 November 2016

सिनेमा

मी एक पक्का कलाप्रेमी मुलगा आहे .आठवड्यात मी एखादा सिनेमा हा नक्की पाहतो . इंजिनीरिंग हे माझं  पहिल प्रेम व कला हे २ रे . नुकताच मी सुप्रसिद्ध सिनेकलावंत सिल्वेस्टर स्टॉलीने  ह्यांचा  रॉकी सिनेमा, दिल चाहता हें ,अग्नीपथ व नुकताच आलेला धोनी हा  सिनेमा पहिला . सिनेमे हे अतिशय उत्कृष्ट होते . त्यातल्या त्यात मला भावलेला सिनेमा  म्हणजे रॉकी . धोनी व दिल चाहता है अग्नीपथ  हे सिनेमे पण उत्कृष्ट होते . हे सध्या आलेले सिनेमे मी थेटर ला जाऊन पहिले .  थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या .  एकाद्या सिनेमा चा आशय हा आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित असेल तर आपण तो खूप आतुरतेने पाहतो . एखादी व्यक्ती हि शून्यातून सुरवात करून पुढे आयुष्यात धक्के खात यश मिळवत जाते हे जेव्हा एका सिनेमा मध्ये येते तेव्हा आपण तो सिनेमा मनापासून पाहतो . अग्नीपथ मधला टिचून भिडणारा ह्रितिक रोशन असो , रॉकी मधला एक सामान्य मुलगा जो काही काळाने प्रचंड चिकाटीने व ध्येयाने पछाडून जाऊन बॉक्सिंग चा सामना जिंकतो . सिनेमा पाहताना आपल्या अंगात येणारे रोमांच,अग्नीपथ मध्ये एक अबोल असा तरुण जो स्वतःचे ध्येय हे शेवटपरेंत न सांगता गाठणारा ह्रितिक ला पाहून आपल्या अंगात येणारे बळ ,रॉकी मधल्या शरीर तंदुरुस्ती ला प्रथम महत्व देऊन त्यात झोकून देणारा सिल्वेस्टर स्टॅलोनन  ला पाहून आपल्यात येणारे शरीर तंदुरुस्ती विषयी येणारे महत्व, धोनी सिनेमा मध्ये थंड डोक्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारा सुशांत सिंग ला पाहून आपला नकळत आपल्या स्वप्नांवर विश्वास अधिक जास्त बसतो .ह्या सिनेमा नि आपले पूर्ण जीवन व्यापून टाकले आहे . सध्या जीवनशैली हि चक्रीवादळाच्या हि गतीपेक्षा सुसाट झाली आहे . सर्वत्र स्पर्धा ,पैसा ,मानसन्मान ,नाव ,कीर्ती वाढत जात आहे . रोजचा तणाव ताण उद्दिष्ट हे वाढत जात आहेत . ह्या सर्व गीष्टींमध्ये सामान्य माणूस गुरफटला गेला आहे . रोज घरगुती तणाव व ऑफिस मधले तणाव ह्यांनी आपल्याला वेढले आहे. अश्या परिस्तिथीमध्ये सिनेमा हाच आधारस्तंभ आहे . आपल्याला प्रेरित करेल , ताण  तणाव नाहीसा करेल ,आपल्याला ऊर्जा देईल , आपल्याला  लढाऊ बनवणारा ,आपल्याला संगीतप्रेमी बनवेल ,आपल्याला चिकाटी देणारा ,आपल्याला प्रेम कसे व कसे करू नये हे शिकवणारा ,आपले जीवनमान बदलणारा ,एक सिनेमा प्रत्येक कलाप्रेमी नि नक्की पाहावा . 

सर्व सिने प्रेमींसाठी

लेखन - कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३
©

Sunday 6 November 2016

Review- Doctor Strange

This is going to be future of the Marvel Movies. It is Outstanding and Very Good. The story begins with a Self- Proclaimed Successful Doctor called Doctor Strange(Benedict Cumberbatch). He is arrogant Neurosurgeon in New York. Fear of Failure has made him most successful Neurosurgeon. His Life Changes when he meets with an terrible accident. This accident makes him to think about his way of life. Traditional Medicine fails to cure him.  He is in hunger to cure his Disease. Modern Diseases couldn't cure him. In search of medicine and motivation he moves towards Kathmandu to Ancient Vedic Guru ( TIlda Swilton)who cures diseases with yoga and healing powers. She teaches him the Yoga and Healing Magic Powers and educates him about Bizarre Truth of MultiUniverse.
The Most Promising of film is its Dazzling Special Effects and VFX and Action Sequences. Marvellous Effect of VFX will leave you in curious state. Most Promising Part of Film begins after Interval when doctor turned sorcerer Strange learns about Other Multiuniverse Concept, Time Travel Magic where he meets dark forces who are going to destroy Earth.
Sherlock Star Benedict has fitted perfectly in Successful arrogant doctor strange and his transformation from Doctor to Earth Life Saviour. Bald Tilda Steals in Every Scene. She has Played Perfect Role of Yog and Magic Guru. Story of film will keep you holding on the seats of theatre. Credit goes to writers of the movie. This Film has Excellent VFX Action Sequence and Time Travel Concept. There are some Hypothetical Things in movie which you wont believe easily.
Its now Weekend . If you love the fiction things, magics, time travel concept surely you will love this movie( Kids Specially)
3 Stars from My Side.
1 Time Watch.
 Movie Review- Kaushik Shrotri
9921455453
©

Thursday 3 November 2016

ती आणि मी

नुकताच मी पुण्यात भल्यापहाटे ४. ०० ला आलो होतो ,पुणे हे माझं अत्यंत जवळचे व आवडीचे शहर आहे . लवकरच माझ्या  पुण्यनगरीत बस्तान बसवण्याच्या  प्रयत्नांना लवकरच  यश मिळेल . माझा करियर च्या शेवटचा पेपर लीगल आस्पेक्टस ऑफ सप्लाय चैन मॅनॅजमेण्ट हा पेपर सिंबायोसिस ला द्यायला आलो होतो . एव्हाना पुण्यात गुलाबी हुडहुडी थंडी ने पाय पसरायला सुरु केले होते . मी सकाळी ६ ला माझ्या रूम ला पोचलो .  पेपर हा सायंकाळी ५ ला असल्यामुळे मला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला होता . सकाळी ८ ला आवरून मी तयार झालो .सिंबायोसिस ला  सकाळी ९. ३० ला पोचायचे होते. पुण्यात प्रवास करायला माझ्या जवळ २ चाकी वाहन नव्हते . मग फारसा विचार न करता मी पुणे महानगरपालिका च्या सिटी बस ने जायचे ठरवले . जाताना मी काटा किर्रर्र ह्या सुप्रसिद्ध मिसळ च्या ठिकाणी उतरलो . एव्हाना पुण्याच्या हुडहुडी गुलाबी थंडीत मिसळ व चहा हे अतूट नातं .  मिसळीचा आस्वाद घेऊन मी सिंबायोसिस कडे निघालो . अश्या गुलाबी थंडी ने माझा उत्साह आणखी वाढवला . मी तडक कॉलेज गाठले . कॉलेज ला आल्यावर माझा मोर्चा लायब्ररी कडे वळवला . मी माझ्या बॅग मधले पुस्तक काढले व  अभ्यासाला लागलो .
मी आजूबाजूला नजर टाकली . १० वाजले होते व लायब्ररी पण अतिशय निरव शांततेत होती . मी वाचायला बसलो. लीगल आस्पेक्टस हा अत्यंत क्लिष्ट असा विषय होता जो मला काही करून करो या मारो च्या अवस्तेत सोडवायचाच होता . मी वाचणार एवढ्यात ५ मुलींचा ग्रुप आला व अचानक शांत असलेली लायब्ररी आवाजांनी गुंजून गेली . माझी एक नजर त्या मुलींवर पडली . पण नंतर मी स्वतःला बजावला की आपण इथे का आलो आहोत ?फक्त पेपर द्यायला . नंतर मी अभ्यासात गढून गेलो .
तब्बल २ तासांनी मी माझे पुस्तक बाजूला ठेवलं व चाहोबाजूला नजर टाकली . एव्हाना १२.०० वाजले होते . मुलींचा ग्रुप नंतर लायब्ररी च्या बाहेर पडला होता . एवढ्यात एक मुलगी लायब्ररी मध्ये आली व माझ्या डेस्क च्या शेजारी येऊन बसली . माझे तिच्याकडे लक्ष गेले . ३ पुस्तके व सॅक व डायरी हे सामान घेऊन ती माझ्या शेजारी अभ्यासाला बसली . तिच्याकडे देखील तीच पुस्तके होती जी माझ्याकडे होती . दिसायला  छान देखणी सुंदर गोरीघारी, तिने लावलेला काळा चस्मा मुळे ती अधिकच खुलून दिसत होती . शेजारी एक सुंदर व गोरीपान मुलगी अभ्यासाला बसल्यावर एका मुलाची अवस्था काय होते हे एका मुलालाच माहित ????ती माझा विषय देत आहे हे पाहून मला तिच्याशि निदान चार शब्द बोलायची इच्छा झाली . पण मी हा शाळेपासून शांत शांत लाजरा मुलींशी न बोलणारा व एकटा एकटा राहणारा होतो . मी इथे फक्त माझा विषयात पास व्हायला आलो आहे हे मनाला बजावून मी परत वाचायला लागलो .
१२. ३० ला 
ती ,'' हाय कोणता पेपर आहे तुझा ''.
मी पूर्ण आश्चर्यचकित झालो .
मी ,'' हाय माझा लीगल आस्पेक्टस हा पेपर आहे ".
ती ,''मग तयारी कशी सुरु आहे, मी खूप तयारी करत आहे तरीपण मला अजूनही अभ्यास हा अपूर्णच वाटत आहे ''.
तिला माझ्याशी बोलायचे होते . कुठल्याही मुलाची अवस्था अवघड होते  जेव्हा लायब्ररी मध्ये एक सुंदर गोरीपान मुलगी तुमच्या शेजारी येते आणि बोलते व तुम्हीएक परीक्षेचे पुस्तक वाचत असता .
मी ,''माझी पण तशीच अवस्था आहे . मी देखील तयारी करत आहे गेली ६ दिवस माझं काम सांभाळत पण अजूनही अपूर्णच वाटत आहे .''
ती अखंड बोलत होती . सुदैवानं ती अतिशय हळुवार आवाजात बोलत असल्यामुळे तिचा आवाज ग्रंथपाल पर्येंत  पोचत नव्हता . तिला पाहिल्यावर एव्हाना सिने अभिनेत्री कतरीना व दीपिका ह्यांचीच आठवण यावी ,दिसायला गोरीपान ,मोहक व बोलके डोळे ,सुंदर व मोहून टाकणारे हास्य ,गालावर खळी व अतिशय मधुर व  गोड आवाज अश्या सर्व परिपूर्ण गुणसंपन्न  एका पुण्याच्या मुलीशी बोलताना मला खूपच अप्रूप वाटत होत.
ती,''हाय मी प्रियांका मी टाटा कन्सल्टन्सी ला मेकॅनिकल इंजिनेर म्हणून जॉईन झाली  आहे ''.
मी ,''हाय मी कौशिक मेकॅनिकल इंजिनेर मी इचलकरंजी ला राहतो . ''
ती ,'' वाह तू पण मेकॅनिकल इंजिनीयर आहेस ".
 हस्तांदोलन करून तिच्या पुढच्या गप्पा सुरु झाल्या .
"कोल्हापूर उसाचा जिल्हा बरोबर ''.
मी ,'' हो तुला माहिती आहे? ''.
ती,''  हो माझे येणे असते कोल्हापूर इचलकरंजी ला ''.
मी ,''खरंच वाह ''.
ती ,'' तू कुठे काम करतो ?
एका बाजूला ती अखंड बोलत होती व मला अभ्यासात गुंग व्हायचे होते. तिच्या प्रश्नांनी मी शेवटी वैतागून गेलो .
मी,'' मी फाय ग्रुप मध्ये काम करतो सध्या थोडा वाचूया आपला पेपर आहे सायंकाळी ''.
ती ,'' हो हो रे चल मी पण वाचते.''
ती एका बाजूला वाचत होती व मी तिच्या शेजारी वाचत होतो . मी दुपारी एक वाजेपरेंत वाचत बसलो . एक नंतर मी पुस्तक बाजूला ठेवले व कॅन्टीन ला जेवायला गेलो .

दुपारी १. ३० ला मी परत डेस्क ला आलो तेव्हा मला ती अभ्यास करताना दिसली . मला पाहताच तिने मोहक हास्य दिले .
मी,'' दुपारचे जेवण केले नाही का ?.
ती ,'' आत्ताच मी पण करून आले .
मी ,'' कुठे ? मी पण कॅन्टीन ला होतो .
ती ,'' माझे घर कॉलेज च्या जवळ आहे .
ती परत अभ्यासात गुंतली व मी पण माझ्या अभ्यासात गुंतलो .

सायंकाळी ४. ५०
मी,'' झाली का तयारी ''.
ती ,''हो जवळपास''.
मी ,'' ऑल बेस्ट ''.
ती ,'' थँक्स तुला पण फिंगर्स क्रोस्ज्ड ''.
आम्ही दोघे  अत्याधुनिक अश्या एक्साम हॉल मध्ये गेलो जिथे माझी परीक्षा होती .

सायंकाळी ६. ०० 
ती ,'' हाय कौशिक कसा होता पेपर ,''
मी,''मस्त पास होईन पाहू काय होते  तुला कसा गेला?,''
ती,'' मला डिस्टींकशन मिळेल अशी आशा ठेवते सध्या ,''
मी ,'' अभिनंदन ''.
मुलींना जिंकायचे असेल तर त्यांना कॉम्प्लिमेंट्स कायम द्याव्यात .
ती ,'' थँक्स ''
आम्ही रेसेपशन एरिया जवळ बसलो .
ती ,'' मग कसे चालू आहे तुझे नोकरी व अनुभव इचलकरंजी ला ,''
मी ,'' चालू आहे उद्दिष्ट,तणाव ,त्रास,ग्राहक समाधान हे चक्र थांबत नाही . खासगी क्षेत्रात आयुष्याची मजा उरली नाही .
ती ,''अरे असे काही नसते . मी टाटा ग्रुप मध्ये आहे तो देखील खासगी आहे तरी पण मी काम आणि आयुष्य हे खूप मनसोक्त एन्जॉय करीत आहे .
मी ,'' अतिशय छान पण तू जिथे काम करती तिथे एक ब्रँड काम करतो जो सर्व लोकांचे देखभाल करतो .
ती,'' असे काही नाही . आपल्या कामाची सुरवात व त्याचे नियोजन हे आपल्याला आलेच पाहिजे. आपले काम व आपले आयुष्य हे २ वेगळे घटक आहेत ते कसे संभाळावेत हे मी टाटा मधून शिकते आहे . तुम्ही जिथे काम करता त्या कंपनी चा तुम्हाला अभिमान वाटलंच पाहिजे कारण आपण दिवसातले १२ तास तिथे असतो . ती कंपनी आपले २ रे घर समजावे. मी ऐकलंय कोल्हापूर व इचलकरंजी हे फौंड्री उद्योगात आघाडीवर आहेत  बरोबर ??
मी,'' हो अगदी तिथे फौंड्री ला खूपच वाव आहे''.
ती ,'' मग तर तुला फौंड्री मध्ये काम करायला तिथे खूप वाव आहे.  मी २ इयर ला METALLERGY  ला टॉप होते . तू तिथेच थांबणार काय मग का बाहेर प्रयत्न करणार ???''
आता मी खूप आश्चर्यचकित झालो . एक अनोळखी पुण्याची मुलगी सकाळपासून माझ्याबरोबर असणारी  मला म करिअर चे चॉईस ला मदत करीत होती . ती अतिशय हुशार व समंजस होती .
मी ,''  काही वर्ष मी नक्की थांबीन कोल्हापुरात पण मला लेखक बनायचे आहे  ''.
मी असे म्हंटल्यावर अशी अपेक्षा केली की ती जोरात हसेल पण झाले उलटेच .
ती ना हसली ना तिला आश्चर्य वाटले .
ती,'' अरे वाह लेखक पण कशातला ?
मी ,'' एक लेखक जो प्रेमकथा, प्रवासवर्णन, प्रेरित करण्याऱ्या कथा, रहस्यमयी कथा लिहिणारा असेल . माझी  कथा हीच  माझी बलस्थान असेल भले त्यात एकदा हिरो व हेरॉईन नसले  तरी चालतील  ''.
ती,'' वाह मस्तच अतिशय छान  ''.
आम्ही कॉलेज च्या बाहेर आलो .
ती ,'' कौशिक तुझी कल्पना अतिशय सुंदर आहे . मी खूप कमी मुले पाहिलीत जे त्यांच्या हृदयाला पटेल  त्याच क्षेत्रात काम करतात  . नक्कीच तू पुढे जाशील तुझ्या पहिल्या आर्टिकल व पुस्तकाची मी वाट पाहीन इट वाझ ग्रेट टाईम विथ यू सीन्स मॉर्निंग, चाल बाय''.
तिने तिची ऍक्टिवा गाडी काढली व ति निघाली . मी तिच्याकडे पाहत राहिलो .मला तिचा स्वभाव व सहवास खूप आवडला होता .  ती अतिशय हुशार समंजस मुलगी होती . मी पुण्यात खूप मुलींना नोटीस केले आहे . नखरे करण्यात बऱ्याच मुली आघाडीवर असलेल्या मी पाहिल्यात . पण ती अजिबात तशी नव्हती . मला तिच्याशी मैत्री करून  वाढवायची होती . जाताना मी तिचा फोन न पण विचारला नाही . हे आहे आपले आयुष्य जिथे कधी व कुठे कशी माणसे भेटत राहतील व आपल्याला पटणाऱ्या गोष्टी सांगतील  सांगता येत नाही .
परत प्रियांका ची भेट होईल सिंबायोसिस मध्ये हि आशा मनात ठेऊन मी बाहेर पडलो व रूम कडे निघालो .

तर मित्रानो प्रतिक्रिया नक्की कळवा .
©
लेखक -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३










Saturday 29 October 2016

Review-Shivay

Ajay Devgan is terrific actor no doubt. Films like Singham and Golmal are well and good for his acting career. But in Shivay He looks better in Actor then Director. Shivay is full of melodrama and sound of bullets and jumping cars rather then words.Story begins with a man called Shivay(Ajay Devgan) a Devotee of Lord Shiv who stays in Himalaya Ranges. Beauty of nature, Himalayan Ranges are worth to watch and they grab you on your seats. Shivay is true Devotee of Lord Shiva who is expert in Trekking. Story continues with high emotional drama between Shivay and his daughter when they travel Bulgaria in search of his Mother. Ajay Devgan yet fails to deliver a romance on screen.But he is Action Guru.
 Film has all High Octane Action scenes. Film will keep you curious after interval. It has High Octane Drama with lot of bullet and car Jumping and Car Crashing Scenes which are worth to watch. It has Just one man from start to end Ajay Devgan. He loves to jump and crash cars. I think there should not be much songs in such kind of film they have spoiled the tempo of Story. Ajay Devgan has done superb Acting and Action. He can use his body language in much perfect manner then words for acting from Shiva Devotee to caring Father. Other Actors Girish Karnad Vir Das are just for showing there faces. Ajay looks perfect Shiva Devotee with his toned body,
At End Ajay Devgan looks best in acting then directing. Story has much Loopholes. 1st half of film seems to be little slower. The story of film is wonderful but it could be best. Music is Ok for Song bolo har har. Without much thinking watch film for core action scenes of Ajay Devgan and Beautiful Himalaya and Bulgaria Mountain.
2 stars from my side. Good Movie For Diwali Time

Happy Diwali

Reviewer-Kaushik Shrotri
phone-9921455453
©

Wednesday 26 October 2016

CADCAM- Making Manufacturing, Designing Simpler

CADCAM- Making Manufacturing, Designing Simpler.
CADCAM Industry is one of fastest growing Industry in India. No Mechanical Engineer is bound to keep CADCAM aside during his Engineering Days. Computer-aided design (CAD) involves creating computer models defined by geometrical parameters. These models typically appear on a computer monitor as a three-dimensional representation of a part or a system of parts, which can be readily altered by changing relevant parameters. Computer-aided manufacturing (CAM) uses geometrical design data to control automated machinery. CAM systems are associated with computer numerical control (CNC) or direct numerical control (DNC) systems. These systems differ from older forms of numerical control (NC) in that geometrical data are encoded mechanically. Since both CAD and CAM use computer-based methods for encoding geometrical data, it is possible for the processes of design and manufacture to be highly integrated. Computer-aided design and manufacturing systems are commonly referred to as CAD/CAM. As Mechanical Engineer your CAD skills should be perfect. You can design whatever product you want as per your ideas, knowledge.

All Catia, Proe, Solid works, Unigraphics, Camworks, Autodesk, Alibre are linked with each other. You need to get master in any one of these software’s you can handle other softwares 90 %. In Catia You can even design a component provide a simulation path as our need and create tool path and calculate respective cycle times from it.  These software’s have made Fixture design, Pattern design, Assembly simpler and easy. You can design and assemble any Machine and view it visually in these software’s. Any Mechanical Engineer who loves basically Creativity he should go for CADCAM with open heart. Designing is a pleasure for any creative mechanical engineer. All Manufacturing Industries can control these cycle times with these software’s. Any Mechanical Engineer who loves creativity, and analysis he should go for CAD CAMCAD CAM is Gifted tool in this era for all creative persons. Go for it

Hi Guys this is my short article about CADCAM. I would love to hear Comments

Thanks

Written by- Kaushik Shrotri
9921455453
©

Saturday 22 October 2016

One Indian Girl Review

One Indian Girl review

After the blockbuster series of 2 states, One night at call center, Half Girlfriend, Revolution 2020 Mr. Chetan Bhagat is back with another book One Indian Girl after 2 years. I must say as his Fan these 2 years were worth waiting. This book is all about an Indian Girls Ideology, her Independent and bold views on all subjects, her love towards parents,her attitude etc. Book begins with a Wedding Ceremony of Indian Girl named Radhika Mehta IIM pass out in MARRIOT GOA who is working in a top MNC in USA.  She is going to get marry an IT boy who works in FB. As a reader We will think this is going to be Biggest Wedding  with lots of Dances, Mehendi, and Sangit Ceremony. But wait Weddings don’t happen so easily in Current Era. During Wedding function 2 guys come to meet Radhika. These  guys are from 2 different sides of world. These  guys are her BF's. 
Who are these guys? What is there connection with Radhika? What will happen to her Wedding boy? Will this function have an happy ending???

This book speaks about Independent views of an Indian Girl, her views on Feminism, Equal Rights, Equal Space, Her views on Marriages, Boys etc. Mr Chetan has proved again that he is master of writing on Offbeat Subjects with Deep Understanding. Don’t miss the end of this book. No one can match his writing style, his Dare to write, his practical language. Book is very much exciting to read till the end. Chetan Bhagat is only writer who has dared to speak up openly about Attraction.
This book will surely help to understand feminism better at the end. All girls will love this book and guys don't miss this book on your favourite subject. 
4 Stars from my side

Book Review- Mr Kaushik Shrotri
9921455453
©

Sunday 16 October 2016

Movie Review- MSD

      Movie review M.S Dhoni the untold story:-

 Amazing! Outstanding! Director Neeraj Pande has truly delivered a great and worth watching story of rise of common man from Ranchi to successful Indian captain Mahendra Singh Dhoni. The story starts from initial struggling days of common man from Ranchi.  It is always a tough and challenging job to demonstrate Real life of a Midas touch self-made cricketer to Reel life onscreen. The script and story is written so strongly and with through analysis, it never loses theme and rhythm and theme of movie. Songs and music supports the story line in perfect manner. Sushant Singh Rajput has delivered his Careers best performance in MSD.
I would say this is completely writers, director’s movie. When you write in such a beautiful strong manner a story of MSD you will get an appreciation. Kudos to all writers of movie
This movie is sure going to inspire you positively. For all MSD fans and for all boys who believe in their dream and passion don’t miss such a beautiful movie of rise of king from T.C Collector to Indian Cricket Team Captain.
5 stars from my side.
Enjoy movie
Review by- Kaushik Shrotri
9921455453

All rights reserved

Friday 7 October 2016

सिने परीक्षण -जाऊ द्या ना बाळासाहेब

अप्रतिम !!!!!!वाह वाह !!!लाजवाब !!! परत एकदा गिरीश कुलकर्णी-उमेश कुलकर्णी ह्या जोडी कडून एका सुंदर कलाकृती!!सदर सिनेमा हा अस्सल ग्रामीण भागामध्ये फिरत राहतो . सिनेमा ची कथा एक अस्सल ग्रामीण आहे . सिनेमा फिरतो एका अस्सल रांगडा ग्रामीण भागातल्या तरुणाभवती ज्याची घरची राजकीय पाश्वभुमी आहे .घरी राजकीय पाश्वभुमी असल्यामुळे हा तरुण हा भरकटलेला असतो . वडिलांच्या  वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीमुळे ह्याला आपल्या पलीकडं जग दृष्टीआड झालेल असते .हा तरुण(गिरीश कुलकर्णी) पुण्यात एका महिला लेखिकेशी संपर्कात  येतो व त्याचे आयुष्याचं बदलून जाते . 
गिरीश कुलकर्णी ह्यांनी अभिनयात पूर्ण षटकार मारलेला आहे . एका अस्सल ग्रामीण युवक ते कॉमन मन ची  भूमिका पूर्ण सफाईदार पणे पेलली आहे .अस्सल ग्रामीण भाषा,राकटपणा ,एका नाट्यप्रेमी भूमिका गिरीश कुलकर्णी ह्यांनी पूर्ण नसानसात उतरवली आहे . बाकी साई ताम्हणकर ,रीमा लागू दिलीप प्रभावळकर सारखे कलाकार काही सीन पुरतेच . सिनेमा हा मध्यांतरापरेंत कंटाळवाणा वाटू लागतो पण नंतर दुसऱ्या भागात वेग घेतो . सिनेमा चा शेवट मात्र हेलावून टाकतो .सदर सिनेमाची कथा हि अतिशय उत्कृष्ट आहे . मोहन जोशी ह्यांच्या सारखा कलाकार ह्यांनी एका मुरलेल्या राजकारण्याची भूमिका अतिशय उत्कृष्ट केली आहे . 
अजय अतुल जोडी च्या  संगीताला तोड नाही . संगीत हे ताल धरायला लावणारे आहे व थेटर मध्ये  डान्स करायला देखील लावणारे आहे . 
सदरचा सिनेमा हा फक्त गिरीश कुलकर्णी चा अभिनय व अजय अतुल ह्यांचे संगीत ह्यांच्यासाठीच पाहावा . गिरीश ची एका वाट चुकलेला तरुण ते एक कॉमन मन चा प्रवास नक्की पाहावा .... 
माझ्याकडून ३ मिरच्या .... 
सर्व हक्क अबाधित 
लेखन -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

Tuesday 4 October 2016

ब्रह्मकमळ

ब्रह्मकमळ -नुसते नाव आलं की डोळ्यासमोर येते ते मध्यरात्री उमलणारे राजकमळ. बालपणापासून कधीच मी ब्रह्मकमळ पाहिले नसल्यामुळे मला खूपच उत्सुकता लागली होती .ब्रह्मकमळ हे मध्यरात्री १२ ला उमलते हि ऐकून उत्सुकता आणखीनच ताणली गेली . ब्रह्मकमळ हे फक्त १० तास टिकते हे ऐकूनच मी ब्रह्मकमळ घरात लावायचा निर्णय घेतला . आधी मी कल्पना केली होती ब्रह्मकमळ हे कुंडीत येते मग मला माझ्या निसर्गप्रेमी मित्र मयूर कडून कळाले की त्याची पाने लावावी लागतात. लावलेली पाने नंतर वाढू लागतात  मग २-३ वर्षांनी फुल येते .घरी पाने लावल्यावर मी आता पाने वाढायची वाट पाहू लागलो . नित्यनेमाने मी पानावर पाणी घालत होतो . कुंडीतल्या पाने वाढून त्यातून फुल येईल मला पूर्ण ३ वर्ष वाट पाहावी लागली . हा काळ म्हणजे पूर्ण माझ्या संयम सहनशक्ती चिकाटी ह्यांची परीक्षाच होती . त्या काळात कासवाच्या गतीने पानाची  वाढ होत असे .एकदा तर माझ्या मनांत पूर्ण पान काढायचा विचार आला होता पण  एकाद्या सुंदर गोष्टी साठी थोडा काळ संयम ठेवणे म्हणजे काय असते ह्याचा प्रत्यय मला नंतर येत होता .
तब्बल ३ वर्षांनी रात्री ७ -१२ ह्या दरम्यान मला साक्षात ब्रह्मकमळ पाहायचा योग आला . एवढ्या दिवसांनी ब्रह्मकमळ पाहणे हे माझ्यासाठी जणू काही दिवाळीच होती . मी माझ्या हातातील कामे सोडली व त्या उमलणाऱ्या फुलाकडे पाहत होतो. असे फुल मी उमलताना मी ना कधी पहिला ना कधी पाहायला योग आला . मी एकटक पाहतच राहिलो .ब्रह्मकमळ उमलणे ह्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नव्हते . निसर्गाच्या काही गोष्टी डोळ्यांनी भरभरून पाहाव्यात . तरी पण मी माझ्या परीने मी वर्णन करतोय .  लहान कळी मधून कासवाच्या गतीने उमलणारे  फुल ,रात्रीबरोबर वाढणारे फुल व त्याचे पदर ,फुलाचा येणारा अद्वितीय अवर्णनीय मानवनिर्मित सुगंध ला देखील लाजवेल असा अस्सल नैसर्गिक ईश्वरनिर्मित सुगंध ,फुलांबरोबर वाढत जाणारा सुगंध ,ब्रह्मकमळाच शांतपणे राजेशाही थाटात उमलणे,वेळेबरोबर वाढत जाणारा त्याचा रमणीय ,हवाहवासा ,शांतमय ,पवित्र सुगंध हा मला एका पवित्र जगात घेऊन गेला जिथे महालक्ष्मी देवी हि हिमालयातून अवतरत आहे आणि माझ्यावर कमळ नि पाण्याचे झरे पडत आहेत ,ब्रह्मकमळाच्या मध्यातून उगवणारे शेषनाग व फणा व त्यामधून येणारे विष्णू हे माझं हे माझे स्वागत करत आहेत ,एका शांत पवित्र धीरगंभीर वातावरणात मी गेलो होतो . एव्हाना १२ वाजले होते व ब्रह्मकमळ पूर्णपणे डौलदार पणे इंद्रपुरीतून उमललेल्या अप्सरेसारखं उमललेले होते .

रात्री हे फुल मी दत्त गुरु ना वाहिला व  हे ब्रह्मकमळ मला एकाच गोष्ट सांगत होते जे भगवतगीता मध्ये लिहिल आहे ,''कर्म करीत राहा फळाची चिंता सोडून दे माझ्यासारखा राहा शांत निर्मल तुला चांगली फळ नक्कीच मिळतील .''.

तर मित्रानो प्रतिक्रिया नक्की कळवा .

लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
सर्व हक्क अबाधित





Friday 30 September 2016

मी व संगीत

हा वीकएंड माझा २ दिवसांचा असल्यामुळे मी जाम खुश होतो . मी सकाळी अगदी आरामात उठलो . रोजच्या सारखी आज मला गडबड नव्हती . सकाळच्या वातावरणाचा मी मनसोक्त आनंद घेत होतो  सुट्टी चा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आठवड्यात ५ दिवस जोमाने काम करतो . सकाळचा कडक चहा व इचलकरंजी च्या मधुरा हॉटेल ची मिसळ  हा योग क्वचितच येतो .घरी आल्यावर  मी संगीत चालू केले . मी पक्का कडवट कलाप्रेमी संगीतप्रेमी आहे . संगीत ह्या विषयाने माझी साथ कधीच सोडली नाही .मी तबला बाहेर काढला व माझं रियाज सुरु केला . 
एव्हाना सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. सकाळी १० ला पाऊस जोरात सुरु झाला व  त्याबरोबर माझं रियाज सुरु झाला . एकदा का रियाज सुरु झाला की मी वेळ काळ सर्व काही विसरलो व त्या संगीतमय वादनात पूर्णपणे बुडून गेलो . त्या वादनातून निघणारे धा धिं धिं धा हे तबल्याचे बोल मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होते . जसे माझा रियाज हा वाढत होता तसे मी आणखी खोलात जाऊन तबला वंदन करत होतो . त्या वादनातून निगणारे स्वर आवाज ऊर्जा मला कधीच न मिळालेला आनंद देत होते . कला हि जगायला शिकवते ,कला हि कायम शेवटपरेंत आपली साथ सोडत नाही ,कला राग दुःख ताण नैराश्य एकटेपणा अबोलपणा सर्व काही विसरायला लावते ,कला हे कालांतराने जगायचे साधन बनते ,कला हि आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवते,आपल्या विचार करायच्या पद्धतीला चालना देते.  कला व वादन  हे जर समूहाबरोबर व समूहात राहून केले तर ते सोन्ह्याहून पिवळे . कला हि अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा देणारे एक नैसर्गिक रित्या मिळालेली ईश्वरी देणगी आहे . 
माझं संगीत तबला वंदन हे सुरु होतो त्या दरम्यान माझंही वेळ काळ ह्या कडे जरा देखील लक्ष गेले नाही . माझ्या मोबाइलला असलेले गिटार च संगीत  व तबल्याचे बोल असे अतूट असे श्रवणीय वंदन सुरु होते . तबला मध्ये येणारे ताल धुमाळी व समुद्राच्या लाटे प्रमाने चढ उतार होणारे संगीत हे आपल्याला पूर्ण बदलून टाकते . जसा पाऊस वाढत होता तसा माझा वादन हे वाढत होते . कलात्मय माणसाला वेळ काळ दुपारचे जेवण ह्याचे कधीच भान राहत नाही . अखेर शेवटी त्रिताल झपताल व एकताल ह्यांचे एकत्रीकरण करत दुपारी १ ला तबला वादनाची सांगता केली . 

तर मित्रानो एक तरी कला आपल्याला यायलाच हवी स्वतःसाठी ;

प्रतिक्रिया नक्की कळवा 

वितरणाचे सर्व हक्क राखीव 

कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३



Thursday 22 September 2016

मध्यरात्र व संगीत

आज मला ऑफिस वरून घरी यायला बराच उशीर झाला होता . घरी आल्यावर मी पटकन संगीत लावले . दिवसभराच्या कंमिटमेंट्स मुळे आलेला नैराश्य ,थकवा ,चिडचिड ,राग सर्व काही हे संगीत विसरायला लावते व मला एका वेगळ्याच जगात नेते . १ तास संगीत ऐकल्यावर मी फ्रेश झालो . लवकर रात्री चे जेवण उरकून घेऊन मी अभ्यासाला बसलो .माझं शिक्षण आता अधिकृत रित्या समाप्तीकडे चाललं होत. मी माझ्या करियरच्या शेवटच्या विषयाच्या अभ्यास करायला रात्री च्या ११. च्या ठोक्याला बसलो . कमवा आणि शिका हि पद्धत मला खूप आवडली होती . बरोबर रात्री ११ ला मी विषयाची उजळणी करायला बसलो . विषय हा अभियांत्रिकी व्यवसाय शी संबंधित असल्याने माझा अत्यंत आवडीचा होता. जशी रात्र वाढत होती तसा मी आणखीन त्या विषयाच्या खोलात जाऊन त्याची उजळणी करत होतो .जस जशी रात्र कासवाच्या गतीने पुढे सरकत होती तशी ती आणखीन गूढ होत होती. मी एकटाच माझ्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो. रिकामे होणारे रस्ते ,रातकिड्यांचा आवाज ,फ्लॅट मधील हळू हळू बंद होणारे दिवे ,मधूनच ऐकू येणारी वॉचमन ची शिट्टी चा आवाज,खरंच ह्या मध्यरात्री व इंजिनियर चे नाते हे अतूट आहे . रात्री १ ला मी  पुस्तक बाजूला ठेवला व माझ्या गॅलरी चा दरवाजा उघडला . योगायोगाने ती पौर्णिमा ची रात्र होती.एका बाजूला शांत झोपलेल शहर ,शांत झालेले रस्ते व दुसऱ्या बाजूला मुक्तीच्या दिशेने उगवणारा चंद्र ते दृश्य ती शांतता मी मनात व कानात साठवून ठेऊ लागलो ,ते दृश्य मी एकटक पाहत होतो. एव्हाना मध्य रात्र झाली होती . अश्या गूढ शांततेत मी स्वतःबद्दल विचार करू लागलो . रात्र स्वप्न पाहायला शिकवते ,त्रास विसरायला शिकवते ,स्वतःबद्दल विचार करायला शिकवते ,भविष्याची आखणी करायला शिकवते ,आपल्या सर्व चुकांची आपल्याला जाणीव करून देते,जास्त कष्ट करायला शिकवते , ,स्वतःकडे लक्ष द्यायला शिकवते ,स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते ,आपल्याला कामाची जाणीव करून देते ,कधीच कुठलीच गोष्ट कायमची नसते ह्याचीच पारख रात्र करून देते ,रात्री नंतर दिवस आहे तस कुठलीच परिस्तिथी कधीच कायमस्वरूपी राहत नाही . मध्यरात्र व संगीत ह्याचे नातं किती अतूट आहे ह्याचा प्रत्यय मला येत होता . मध्यरात्री १.ला मी अत्यंत हळुवार आवाजात संगीत लावले .घरात सर्व जण झोपलेले होते. गोल्डन सॅक्सओफोन च संगीत एक प्रकारचा हुरहूर लावत होते. ती हुरहूर मला आणखीन स्वतःची स्वप्न पाहायला शिकवत होती . त्या हुरहूर लावणाऱ्या संगीतमय रात्रीच्या वातावरणात ती रात्र मला जणू हेच सांगत होती ,''किती हि त्रास ,कष्ट.अपयश आले तरी खचून जाऊ नको चिकाटीने प्रयत्न करत राहा परिस्तिथी नक्की बदलेल स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत राहा ,"'
वातावरण इतक शांत,गूढ होते की मला नंतर हळुवार भान आले . शेवटचं पेपर ची कमिटमेंट होती माझी स्वतःशीच . असे वातावरण व हुरहुरी संगीत परत अनुभवायचेच असे ठरवून मी परत अभ्यासाला लागलो . 
तर मित्रानो आपल्या दिवसभराच्या कंमिटमेंट्स नि आपण स्वतःचे अस्तित्वच विसरतोय . आपण माणसे आहोत रोबोट नव्हे . प्रत्येकाने स्वतः साठी नक्की वेळ काढावा . 



तर मित्रांनी कसा वाटलं लेख नक्की कळवा . 

वितरणाचे हक्क अबाधित . 

कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३  

Thursday 15 September 2016

अविस्मरणीय बॅचलर लाईफ

जुलै  २०१६
नुकतंच माझा इंजिनीरिंग चा वर्ग मित्र चिंटू चे लग्न ठरले होते . पहिल्यावहिल्या वर्गमित्राचे लग्न असल्यामुळे आमच्या मित्रमंडळात जाम उत्साह होता .  लग्नाच्या २ दिवस  एक जोरदार बॅचलर पार्टी आम्ही ठेवली होती . त्या पार्टी ला माझे सर्व इंजिनीरिंग चे  मित्र आले होते . आम्ही एक बॅचलर ट्रिप करायची प्लँनिंग केले होते . पण अचानक  आलेल्या पाऊसाने सगळं बेत फसला . पार्टी ला आम्ही सर्व बॅचलर मुले एकत्र जमलो .
रात्री १० ला पार्टी ची सुरवात झाली . सर्व बॅचलर असल्यामुळे उत्साह ,आनंद ,धमाल ,मस्ती ,काट्या ,धुडगूस ,दंगा ,घोषणा ह्यांना सुरवात झाली होती . प्रत्येक जण चिंटू चे अभिनंदन करत होते .त्याची शाब्दिक कोट्या करत होते .जसजशी रात्र वाढत होती तस तशी धम्माल ,उत्साह ,जोक्स ,डान्स ,कॉलेज च्या फसलेल्या प्रेमप्रकरण व त्याची गॉसिप याची चर्चा वाढत होती . चिंटू ला हा क्षण ,ही वेळ ,ही धम्माल ,जोश परत कधीच मिळणार  नाही याचे भान ठेऊन पार्टी चे पुरेपूर प्लांनिंग केलेलं होत . मला हळू जाणीव होत होती आज चिंटू च
लग्न आहे काही वर्षांनी माझं पण असणार आहे .जसजसे लग्नाची वेळ जवळ येते तशी प्रत्येक मुलाला  एक जबाबदारी ची जाणीव होत असते .समुद्राच्या लाटे सारखे असणारे बॅचलर चे जीवन संपणार हे कुठल्याही मुलाला सहसा पचत नाही .समुद्रा सारखे लाट  येईल तसे पोहायला शिकवणारे,बेधुंद वाऱ्यासारखे बेभाम जगायला स्वयंशिस्त,बचत करायला ,मनसोक्त निसर्गाला आलिंगन देऊन निसर्गाची खुललेली हिरवळ पाहायला ,रात्रीचा राजा,वर्तमान काळात जगायला शिकवणारे ,वेळ पाळायला शिकवणारे ,जबाबदारी ची वस्तूंची किंमत ठेवायला शिकवणारे ,आई बाबांचा आदर करायला ,चिंता न करायला शिकवणारे वय ,बेधुंद होऊन काळाबरोबर जगायला शिकवणारे,मुलांची निर्णय क्षमता विकसित करणारे ,एकत्र राहायला शिकवणारे,मनसोक्त वागायला शिकवणारे ,कुणाच्या हि दबावाखाली न यायचे शिकवणारे ,येणाऱ्या सर्व प्रसंगांना न घाबरता भिडायला शिकवणारे ,सर्व मुलींबरोबर  बोलायला शिकवणारे असं हे धम्माल चित्त-तरुण ,अथांग समुद्रासारखे ,विशाल ,सुसाट एक्सप्रेस  सारखे ,निर्मल वाहणाऱ्या झऱ्यासारखे बॅचलर वय कधीच कुठल्याच मुलांचं संपू नाही . हे कटुसत्य आहे की एक ना एक दिवस हे दिवस जाणार आहेत आणि प्रत्येकजण बंधनात अडकणार आहेत . बॅचलर प्रमाणे फार पुढचा जास्त विचार न करता आम्ही सर्व जण झिंगाट  ह्या गाण्यावर बेभाम डान्स सुरु केला व झिंगाट पार्टी ची धमाकेदार सांगता झालो .

तर


मित्रानो मी पण एक बॅचलर आहे . अजून मला बंधनात अडकायला अजून थोडा वेळ आहे . पण आपण फार पुढचा विचार करून जास्त चिंता करत बसण्यापेक्षा येणारे प्रत्येक क्षण हा प्रत्येक बॅचलर नि बेधुंद मनाच्या प्रमाणे मनसोक्त जगावं व पुढच्या काळाची पेरणी ह्या बॅचलर वयात करून ठेवावी .असे हे बॅचलर वय परत कधी आपल्या आयुष्यात परत येत नाही .

माझ्या सर्व बॅचलर मित्रांना हा लेख .

प्रतिक्रिया नक्की कळवा .

वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत

कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३



Monday 12 September 2016

She and me

I had just arrived in Pune at 4.00 A.M.It's always good to be back in your favourite city.I had my  paper  Legal Aspects of Supply Chain Management scheduled in Symbiosis. Pune has special place in my heart and soul.I had always dream to get settled down in Pune.(soon it will come true).I reached my room early in morning at 6.00 A.M. Chilling winter season welcomed me with the misty fog. This paper was last one in my education career so I had to clear my paper and finish my formal education in happiest manner.
After warm shower and breakfast I had to reach Symbiosis at 9.00 A.M I had no bike to travel in Pune. Without much of thinking I  choose best mode of transport PMT. I had to catch PMT bus in hurry towards Symbiosis. I enjoyed breakfast of famous Katakirr Misal near Symbiosis under chilling winter morning.I reached at 9.30 a.m in Symbiosis where I had my paper scheduled at 5.00 P.M. I had got enough time for revision.Cheerful climate inside the Campus,Premium looks,Body language of Girls,Strict and Corporate environment stunned me for while and it made positive impact on my mindset.I felt little unusual about myself  after I noticed bold attitude of girls studying in campus. I   came to knew  Why Symbiosis being  called as Premium Brand??
I went towards library.I took my book on desk to begin revision.I needed to clear  paper since it was tricky Legal aspects of Supply Chain Management.As I was about to begin studies I had glimpse of girls coming in Library.I ignored it and began my studies. I kept memorising for 1.5 hrs.

At 11.00 A.M I had glimpse in library. It was just me and library attendant and girls gang had leaved library. Time was moving much faster.

At 11.30 A.M a girl entered in library. She was carrying bunch of reference and textbooks.She took seat beside me. I had short glimpse on her.She had books of legal aspects of Supply Chain Management.She was beauty. I was shy guy since FYJC who never talked much with girls. I wished I had just said hello to her. But  I continued studies since I had to remind myself I am here to give exam.

After 15 minutes -
She said,"Hi which paper do you have ? ".
It was surprise for me.
Me,"Hi I am here for legal aspects of Supply Chain Management and yourself?
She said,"ohhhh me too same. Isn't it tricky?
Me,"Yes much tricker for me.''
She,"So your preparation is over?I am preparing since last 2 days but I still feel preparation is not enough."
She wanted to talk with me.It is always harder for guys to stay out of frame when pretty girl wants to have chat with you.
Me,"Same here I am preparing since 7 days with balance in my work and study. Some concepts  require deep understanding"
She kept talking.  I noticed she was eager to have conversation with me.Fortunately her voice was at lower tone which didn't library attendant. Her dressing sense reminded me Deepika Padukone and Katrina Kaif equipped with gorgeous looks,cute and confident eyes,Pouty Lips, Heart-Melting voice, sweet and charming smile with black spectacle on her eyes for a moment caught my attention.
She, "Hi I am Priyanka from Pune working in TCS as Mechanical Engineer and yourself?
Me,"I am Kaushik Shrotri Mechanical Engineer from Ichalkaranji. We had warm handshake.
She,"Oh you are too Mechanical Engineer!!!! Ichalkaranji in Kolhapur Sugarcane District yeah?? She raised her eyebrows.
Me,"Yes Sugarcane District how do you know????
She,"I often visit Kolhapur. My grandmother stays there''.
Me,"That's great great to hear where do she stays''.
She," She stays in Nagala Park,Heee I heard Ichalkaranji is famous for Mira Car right?
I was surprised by her knowledge.
Me,'' Yes That Car was made by man called Shankarrao Kulkarni who wasn't Theoretical Engineer''.
She,'' Yeah I know my mother always tells me about it I am sure he is Idol for all Young Engineers and he is inspiring to all today's bookish engineers''.
Me,'' Yeah he was''.
She,'' He btw where do you work?''.
I was getting irritated for while.
Me,"I work in Fie group btw letz study we are having Paper in Evening,".
She, "Oh Yes sure".
I continued my revision beside me she continued her studies.
At 1.00 P.M I went for lunch. After 20 minutes I came back  I saw her studying.
She gave me a pleasant smile.
Me,"Didn't you had lunch?
She,"Yes just now ".
Me,'' Where here itself in library''.
She,'' No I went home its near to Symbiosis
I continued my studies.She was busy in her studies.
At 5.00 P.M
She said,"All best to you."
Me,"Thanks all best to you too,".
I entered exam hall equipped with all modern facilities..
After exam-
She said , "hee how was it, "
Me,"Fine,Easy hoping for best score and yours?
She said ,"hopefully I'll score distinction.
Me,"that's great congratulations. "
Girls love compliments.
She said,"thanks".
We were sitting in reception area. She said ,"So how's your life going on?
Me,"Pressure,Targets,Customer Satisfaction and repeat actually no life exists in Private Sector."
She smiled, "Life do exists if we can find it.  TCS has taught me how to balance your life and work.''
Me,"Since it is TCS it is a brand it teaches and moulds you."
She,"Yes it is brand but after-all starting of any work is important.I am much prouder to be part of Tata group since it had taught me everything from Corporate Ethics to Personal Ethics. You have to be proud of your organisation as it is your second home.I ll continue in TCS.I heard Kolhapur is Foundry hub right?
Me,"Yes core hub."
She said, "You can get best foundry experience in Kolhapur.I loved Metallurgy during my second year. So are you planning to continue your Job in Kolhapur.?
I was surprised.This pretty Young,Beautiful girl who meet me early in morning is asking me about my career choices and my life.
Me,"Yeah but after some experience actually I always wanted to be writer.''
She neither laughed nor she got surprised which made me surprised.
She said, "Great what sort of ".
Me,"I would love to write love Stories,Travelling Diaries,Inspiration Stories,Fitness Books, which would motivate people. My content should be hero if it doesn't have any hero and I am much confident readers will love my books. My books will definitely help people to make there life happiest and life changer,".
She said,''That sounds cool."
It was around 6.30 P.M
We came out of Symbiosis. I noticed She was quiet since  she heard my wish.
She said, "He Kaushik your writing idea it sounds great.Not much are lucky to write what they feel about themselves and follow their heart. Keep writing what you feel by heart it will be purest writing you could ever have done.All the Best,I will be waiting for your first Book. It was so nice to meet you by.
Me,"Thanks lot for kind words, "
She took her bike and she left away within fraction of seconds. I kept looking at her.  I got involved in her in such manner that  I forgot to take her contact no.She was much pretty,hot,sensible,caring,bold,beauty with brain. I had noticed enough of girls in Pune.But She was unique. Who was She? What was the thing which got connected me to her?  Was She any angel sent to Symbiosis to change my views??I wanted to know everything about her. Later on after 15 minutes I came to know I didn't asked her no. I went on way towards E-Square where I could find her but she wasn't there. I searched her on FB,Insta and Twitter but still she had no account on this sites. I found 1 Priyanka on FB but it wasn't active account. I couldn't trace her on social media. I dared to enquire about her in Symbiosis where I could get her contact number  but her number was not in working.I loved way she talked with me,her soft voice,her sweet smile was hard to forget.
This is life you meet Unknown Persons at Unknown Events,Unknown Places and they can teach you,change your approach towards life. Yet it was hard for me to forget her.
 I was looking forward to have friendship with her. I had chance where I could  meet her during Campus drive after 2 months in Symbiosis . With hope to meet Priyanka again I left Symbiosis  to travel towards my room.
(all views are personal).
Honest feedbacks suggestions are welcomed
All rights reserved
Kaushik shrotri
9921455453

Monday 5 September 2016

Engg-Path Of Fire.

My Mornings began at 6.30 A.M with a cup of tea and newspaper in hand. It's hard to start your routine without a newspaper nowadays. I was reading all Latest News, Trends in Times of India and Sakal.
While glancing newspaper suddenly two news caught my attention. There was news about vacant seats of Mechanical Engineering in Colleges and recession. Second News made me curious from the Times of India. A Boy 21 years of age tried to high jump from the terrace, and one more boy 19 years of age tried to jump in front of the railway. After reading it, I was all tensed. I read the news in detail.

Fortunately, both guys were badly injured but they were safe. Other side of this news made me angry. The reason they tried to do such worst thing was a failure in academics. Surprisingly they were students from second-year Mechanical Engineering.

I was very angry with these guys.

What made them end there life?

 Didn't they love there life?

Did they prefer there marks more than there life?

I closed the newspaper and I went into my room. I packed my bags for my early morning workout and I left towards the gym. While going I felt pity for this guys. Didn't they had courage in themselves? Why professors did not pay personal attention to such guys? Didn't they had guts to face failure?

I remembered my Mechanical Engineering days. I had failed twice. I was harassed by professors many times during orals. It never discouraged me. I still remember the negative impact of my failure during my college on me. Mechanical Engineering was never easy and neither it is difficult but it should not be taken for granted. One senior person from college had given me the challenge to finish my education. But I proved him wrong. I finished my mechanical engineering with first-class in a decent manner.  Ending your life is not an answer to failure. Nothing is permanent nor failure nor success nor your job in life. You should have intense courage. You should be persistent and sting like a bee. Failing will never decide your future goal, destination. You have to keep going and going and going.. Each and every guy has equal talent, guts to move ahead. Engg and life are a Mind Game.

 We all guys are blessed with equal intelligence, equal talent, equal opportunities. After failing twice in Engg, I was successful to remove the fear of failure.

 I was thinking. What these guys will do now? How will they gather courage? Is high jump an answer to all the failures? There are guys who failed in early ages, but they are now successful and they have turned life inside out.

I was lost in a flashback while going for a workout. In a hurry, I parked my bike and I went to the gym. I went inside the changing room. After changing the clothes, I came on the floor in a hurry. Sound of Rocky balboa was turned on at the floor. I looked at Rocky Balboa Poster in the gym.

'Every Champion was once a contender who refused to give up'.
' I am neither clever nor intelligent but I am successful bcoz I kept going and going and going'.

 You need such motivating lines during the early morning to kick your butt for all-day activities. I prayed in mind about the safety of those 2 guys and I started my workout with a full swing with a song on the gym floor.

Risin' up, back on the street.
Did my time, took my chances.
Went the distance, now I'm back on my feet.
Just a man and his will to survive.
So many times, it happens too fast.
You trade your passion for glory.
Don't lose your grip on the dreams of the past.
You must fight just to keep them alive.
It's the eye of the tiger, it's the thrill of the fight.
Risin' up to the challenge of our rival.
Honest feedbacks suggestions are welcomed

All Rights Reserved.©

Kaushik V Shrotri
9921455453



Friday 2 September 2016

नयनरम्य पन्हाळगड

नुकताच माझा वीकएंड सुरु होता . जसा रोजचा दिवस धावपळीचा असतो तसा हा नव्हता . धावपळीचा दिवस कसा जातो ते कळत  नाही व सुट्टीचा दिवस कसा संथ गतीनं सुरु होतो ते समजत नाही . अतिशय संथ व कासवाच्या गतीने माझा दिवस सुरु होता . कासवाच्या गतीने आवरल्यावर आता माझ्यासमोर प्रश्न होता आता दिवसभर काय करायचं ?हा प्रश्न कामात असताना कधीच येत नाही .
नुकताच पाऊस देखील काही दिवस विश्रांती घेऊन परत आला होता . माझ्यासारखा भटक्या सुट्टीला घरात बसणं शक्यच नव्हत. नुकताच मी एक मोठी रोडट्रीप करून आलो होतो जुलै २०१६ मध्ये . आत्ता मी परत रोडट्रीप करायची म्हणल्यावर घरातून काय प्रतिक्रिया येईल ह्याचा मी विचार करत होतो . मी घरी बाबांना विचारणार एवढ्यात आई बाबानी मला विचारला आज बाहेर जाऊया काय ?मला तर जास्तच आनंद झाला . घरच्यांबरोबर फिरण्याच्या आनंद काही औरच असतो . एक शॉर्ट ट्रिप करायची ह्या हिशोबाने आम्ही पन्हाळा ला निघालो . 

जाताना घाटात पावसाने आमचे दिलखुलास स्वागत केले . आजूबाजूच्या हिरव्यागार पर्वतरांगा,हिरवीगार झाडे 
पिसारा फुलवलेला मोर न्याहाळत आम्ही पन्हाळा ला पोचलो . धुक्यात हरवलेला पन्हाळा पाहणे हे मला अतिशय आनंदित करून गेले . पाऊस सुसाट सुटलेला होता . कोल्हापूर जिल्ह्यात  ज्यांना जम्मू काश्मीर कुलू मनाली ला जायला जमत नाही त्यांनी पन्हाळा हेच आपले जम्मू समजावे .मी बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याजवळ थांबलो . पुतळा पूर्णपणे धुक्यात हरवलेला होता . पण बाजीप्रभू देशपांडेंच्या इतिहास माझ्यात रोमांच उभा करत होता ,
तसाच मी पुढे पुसाटी बुरुजाकडे गेलो . झिंगाट करत असलेला पाऊस ,हुडहुडी लावणारा गारवा सुसाट सुटलेला गार वारे अशा वातावरणात गरम चहा,कांदा भाजी,गरमगरम कणिस,व अस्स्सल कोल्हापुरी मिसळ चा मोह कुणाला नाही आवडणार ?मनसोक्त आस्वाद घेऊन मी  आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत बसलो . एका शांत सुरात कोसळणारा पाऊस ,पक्षांचा किलबिलाट ,चहूबाजूस पसरलेली हिरवळ मला परमोच असा आनंद देऊन गेले . मी पाऊसात अर्धा भिजलो होतो पण मी जास्त काळजी करत बसलो नाही . अश्या मुक्त पाऊसात भिजायचे  भाग्य कधीच लाभत नाही . धुक्यात हरवलेले डोंगर ,त्यात एखादी हळूच दिसणारी पायवाट,एका बाजूला दिसणारे कोल्हापूर जिल्हा व दुसऱ्या बाजूला दिसणारे नयनरम्य कोंकण हि दृश्य मी माझ्या नजरेत कैद करत होतो . रात्री आमचा पिटले ,खर्डा ,भाकरी असा बेत ठरला . आम्ही जिथे बेत ठरवलं त्या हॉटेल पासून रात्रीचा कोल्हापूर चे विहंग दृश्य दिसत होते . बरेच आंतर पायी फिरल्यामुळे मला खूप भूक लागली होती . मी खात असलेले भाकरीची चव हि ५ स्टार हॉटेल ला हि फिकी पडावी अशी होती. रात्री पाऊस पूर्ण थांबला होता . मी निसर्ग न्याहाळत होतो .शांत वाहणारे वारे ,ती निरव शांतता ,लांबून दिसणारे वाहनांचे दिवे व एका बाजूस उगवणारा चंद्र ,जस काळोख आणखीन गडद होत होता तस आणखीन मुक्तीच्या दिशेने उगवणारा चंद्र मला जणू एक शिकवण व  ताजेतवाने करून गेले
 . परत पन्हाळा ला यायचेच असा बेत आखून मी परत निघालो . 

तर मित्रानो हा होता माझा छोटा आनंदायी प्रवास .आपल्या प्र्यत्येकाच्या आनंददायी कल्पना ह्या वेगळ्या असतात. हि होती माझी कल्पना एका हिलस्टेशन गावी केलेला अचानक प्रवास , व एका झाडाखाली ठेवलेली खुर्ची व त्यावर बसलेलो मी व माझा सोबती वही पेन आणि संगीत व समोर असलेला निसर्ग !! कशी वाटली कल्पना ?

प्रतिक्रिया नक्की कळवा . 

वितरणाचे सर्व हक्क  आहेत 

कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

Saturday 27 August 2016

CORPORATE-HOOK /CROOK-

I had just reached to my Office at 8.45 A.M Tuesday. It was bright sunny day with worm Weather.I parked my bike in parking area and I left for my cabin. It was just a beginning of week.
It is really hard to come to office after 3 days long break,But we are bound to come since CUSTOMER is OUR GOD.Our goal was to keep our GOD Happy.
As soon as I entered my cabin I saw it was overcrowded with supervisors,line Inspectors.All were surrounded with our Production Head. Looking at everyone's body-language and stormy faces i got to knew situation is not OK. My Day began with brain washing of all supervisors by our production incharge. Later on I asked to our Production Engineer what was problem? Is there any Customer Problem?
Production Engineer informed me that there was major problem found at customer end which was informed by our customer to our C.E.O Directly First Time. I took detail information about problem occurred at the customer end. It was newly problem occured due to excess material.I asked our production Engineer," Sir this is not our Problem this is foundry problem".
" Just Keep Quiet Let me do analysis btw Our CEO has called Meeting in just 30 min Be Ready".
I looked at my production engineer. He was in Deeply Tensed. I imagined what would be condition of our Boss.
After 30 Min CEO called Meeting in OFFICE. We 3 Mechanical Engineers+2 Senior Persons+Supervisors entered in OFFICE.I imagined what would happen next? We all took our places for meeting. Everybody was Quiet.I wondered was it CALM BEFORE STORM?.No one dared to look at face of CEO.
CEO,'' What you people are doing here are you guys working people or shamless people or idiots''.
No one dared to speak.
CEO,'' I think everyone knows about Customer problem right yes or no? He pointed towards me.
"Yes sir'' I replied.
CEO,'' Now tell me how it happened? Why such Defects are not arrested here? What you guys are doing? Are you Careless,Dumb Engineers?This problem is serious problem. Remember we are Top Supplier to Our Customer.In Today's sinario if there is just one problem you are out of competition. Do you guys want us to be same way out of competition?''.Voice of CEO spread around 10m from office..
Sir,'' Our production Engineer tried to explain." I am not here to hear any excuses.Does Customer listens to excuses why should i hear?All Engineers are DUMB people here. . I want this problem to be eliminated today or You people will be eliminated today Choice is Yours Prove Your Best or Be Prepared for Worst".
We 4 people finally came out of CEO Office. Such words from CEO were as like Bullet,firing at 150 kmph I got angry,'' What is he thinking of Mechanical Engineers who is he? I spoke angrily to our production Engineer.
Producton Engineer,'' Relax and do what he says,Our first job is to Cool down CEO then our Customer OK,''
In Evening Our Team came back to office with elimitation of problem with solution on it.
We presented it to CEO and CUSTOMER. After watching results finally CEO spoke worm words with a smile. I got lil shocked. Was he same guy who was in office in morning? In Evening i watched our all team was in chilling mode with smiles on faces including production  engineer. I kept thinking on it.Is this way people work everywhere? All private office guys are always tensed? Dont these people have life? Why cant even they have just smile on there faces while working?Instead of such harsh words why cant CEO tell in sweet language? This was my first experience.
This is the way only people work in private industry. People work here under pressures. They will only work if you constantly keep pushing them. But that means that people from private industry should be always tensed, carring BP tablets in pockets,Suger Insulin injections in there bags? No Not at all.Everyone works for survival of there families  It's ok for youngsters who leave private industry earliest in 30s but people who are 35+.They can't leave easily since there loan payment is more then there age. Every work should be done with smile on face. We are human beings we do have emotions. No one wants to take all tensions back to home from office and get affected by diseases called Blood Pressure,Suger. Enjoy work enjoy life.
Cherssss to all Private Sector persons

Soo guys how is my article? Do inform Suggestions,Comments.

All Rights Reserved

Kaushik V Shrotri


Friday 26 August 2016

गूढरम्य गणपतीपुळे


सध्या  सर्वत्र  हिवाळा अगदी फॉर्मात आहे. अश्या मस्त व हुडहुडी हिवाळ्यात २ दिवस एकाद्या हिल स्टेशन ला भेट द्यायचा विचार मनात आला नाही तर नवलच .  हिवाळ्यात मी गणपतीपुळे ला निघालो .गणपतीपुळे हे अगदी बालपणापासून आवडीचे ठिकाण व  गणपतीवर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे मी गणपतीपुळे कधीच चुकवत नाही . मी सकाळी इचलकरंजी हुन निघालो व सायंकाळी पर्येंत आंबा घाट व कोकणातल्या निसर्गाचा पाहत  गणपतीपुळे ला पोचलो .गणपती ची दुसऱ्यादिवशी भल्यापहाटे पूजा असल्याने मी मुक्काम करणार होतो  
रात्री हॉटेल वर सामान ठेऊन व फ्रेश होऊन  मी पायी चालत मोदकाचा प्रसाद घ्यायला निघालो . जशी रात्र वाढत होती तशी थंडी मी म्हणत होती . कोकणात थंडी नसावी ह्या विचाराने मी आलो होतो पण थंडी पडत होती . मग मी अंगावर जाकीट चढवले व प्रसाद ला निघालो . 
प्रसाद व जेवण करुण  तृप्त होऊन  मी मंदिराकडे निघालो . रात्रीचे ८ वाजले होते . मंदिर आणि समुद्र कधी एकदा पाहीन असे झाले होते . पटकन सस्याच्या गतीने  मंदिरात आलो . दुसऱ्यादिवशी पहाटे ५. ला पूजा होती त्याची तयारी,सूचना करून व गणपती चे दर्शन करून मी बाहेर आलो व माझा मोर्चा समुद्राकडे वळवला. पण रात्र झाल्यामुळे मला समुद्र पाहता आला नाही . पण मी काही काळ तिथे एका बाकड्यावर बसलो . मला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत होता . एका विशिष्ट सुरांमध्ये लाटा चा आवाज येत होता .मी व काही पर्यटक सोडल्यास तिथे कुणीच नव्हते .एकेक जहाजांचे दिवे मला समुद्रामध्ये दिसू लागले . आजूबाजूची शांतता आणखीनच गडद होत होती . एक गूढरम्य वातावरण पसरलेले होते . त्या गूढते मध्ये एका बाजूने उगवणारा चंद्र व नौदलाचा नॅव्हिगेटवर आणखी भर घालत होता . पौर्णिमा ला अजून ५  दिवस असल्याने मी उगवता चंद्र पाहत होतो . लेखकांचे व निरवशांततेचे एक वेगळेच नातं आहे . असे वातावरण कधीच शहरात अनुभवायला मिळत नाही. सर्वदूर पसरलेली गूढ शांतता मनाला वेगळ्याच जगात घेऊन जात होती. मी परत हॉटेल कडे निघालो पण माझा पाय काय हालत नव्हता . ,एका शांत सुरात येणारा लाटांचा आवाज ,सर्वत्र,सर्वदूर पसरलेली गूढरम्य शांतता, व  फोन मधील जगजीत सिंग ह्यांचे गाणे ह्या सर्व गोष्टी मला परिपूर्ण चार्जे करत होत्या. परत येताना मला काही अस्सल कोकणी टुमदार घर दिसली जिथे पुढे अंगण ,मध्ये नारळाची झाडे ,अंगणात गाय चा गोठा व त्यात २ गाय व १ झोपलेले वासरू ह्या गोष्टी मला पुरेपूर आनंद देऊन गेल्या . अश्या घरात गेलेल बालपणाची मजा फ्लॅट व बंगल्यात अजिबातच नाही . मी दुसऱ्यादिवशी लवकर पूजा असल्याने निद्राधीन झालो . दुसऱ्या दिवशी पहाटे ५.. ००ला  पूजेचा अनुभव पण मला शब्दात सांगता येणार नाही.गाभाऱ्यात मी ,पुजारी व समोर असलेली शांत व तेजस्वी व जागरूक असलेली गणपतीची मूर्ती ;पूजे नंतर माझ्या मनातल्या शंकाकुशंका चिंता भीती सर्व काही नाहीसा झाला व निशंक होऊन करियर च्या पुढील वाटचालीसाठी मी परत इचलकरंजी चा रास्ता धरला . 
तर मित्रानो असा आहे गणपतीचं महिमा .
 गणपती बाप्पा मोरया 

कसा वाटलं लेख कळवा . 
वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत . 

कौशिक श्रोत्री 









Monday 22 August 2016

मध्यरात्र व पाऊस

सध्या श्रावण महिना व सणवार जोरात सुरु आहेत . अश्या श्रावण महिन्यात येणारे अनुभव आपल्याला सर्वगुणसंपन्न करून जातात . नुकताच मी ऑफिस मधून घरी आलो होतो . दिवसभर कंमिटमेंट्सनि मन आणि शरीर  पिळून काढले होते . पण  काय करणार ?कंमिटमेंट्स कधीच संपत नसतात .. 
डिनर नंतर उद्या कायकाय करणार ह्याची उजळणी करत बसलो होतो . 
उजळणी करता करता मध्यरात्रीचे १२. कधी आले समजलंच नाही .. 
  जस जस घड्याळाचा काटा कासवाच्या गतीने पुढे जात होता तस तसं मला आलेला थकवा हळूहळू कमी होत होता . मी एकटाच माझ्या खोलीत बसलो होतो . मी latenight गिटार संगीत लावले होते . जशी रात्र वाढत जात होती तशी  निरव शांतता व संगीत  आणखीन गद्गद होत गेली . मी अशी निरव शांतता पहिल्यांदाच अनुभवत होतो .कासवाच्या गतीने पुढे सरकणारा काटा,रातकिडयांच्या चरचर आवाज,रिकामे झालेले रस्ते,हळूहळू शांत होणारे कुत्रांचे आवाज ,इंच एवढी देखील न हलणारी झाडांची पाने ,पटापट बंद होणारे फ्लॅट मधले दिवे ,मधूनच येणारे वटवाघूळ चा आवाज अशी शांतता माझ्या मनाला हुरहूर लावत होती. काय होती ती शांतता ?अशी शांतता पाहून मला एका सिनेमा मधली ओळ आठवली . '"निली निली सी खामोशिया कहे राही हें बस तुम हो यह सिर्फ मे हू मेरी संस  धडकणें ऑर मे "'. 
अश्या निरव हुरहूर लावणाऱ्या शांततेत अचानक ढगांचा गडगडाट होऊन पाऊस आला . श्रावण महिन्यात निसर्ग आणि पाऊस ह्या दोघांना attitude च ग्रहण लागलं की काय ?असा प्रश्न पडतो .. ऊन पाऊसाचा खेळ हा दिवसभर सुरु असतो .. जसा पाऊस वाढत गेला तसा गारठा वाढत गेला . 
अश्या वातावरणात मी एका जागी बसूच शकत नव्हतो . हातातील लॅपटॉप बंद करून मी गॅलरी उघडली मध्यरात्री १. ला . निसर्गाचा दानशूरपणा मी पुरेपूर अनुभवत होतो . मी फ्लॅट ची गची च दार उघडले . विजांचा कडकडाट ,ढगांचा गडगडाट ,माझे संगीत ,हुडहुडी लावणारा गारठा,लाल मातीचा सुगंध,एका सुरात पडणारा पाऊस,मुंगीच्या वेगाने पुढे जाणारा घड्याळाचा काटा व मी आणि माझ्या हातातली कॉफी ... मी बराचवेळ एकटक पावसाचा आनंद घेत होतो . पडणारा पाऊस व निसर्ग जणू काही मला हेच सांगत होते . 
"कुठलीच गोष्ट कायमची कधीच नसते यश ,अपयश,ह्या एका नाण्याच्या २ बाजू आहेत.माझ्यासारखा मोकळा ढाकळा मनसोक्त राहा "'.. ह्या पावसानं मला परमोच असा आनंद मिळून दिला . 

पाऊस काय थांबत नव्हता आणि माझा पाय हालत नव्हता . पण मला दुसऱ्यादिवशी च्या कंमिटमेंट्स होत्या . परत असा अनुभव घ्यायचाच असा ठरवून शांतपणे मी निद्राधीन झालो . 

तर मित्रांनो कसा वाटलं लेख प्रतिक्रिया नक्की कळवा . 

वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत . 

कौशिक श्रोत्री 





Friday 19 August 2016

गगनबावडा एक अविस्मरणीय भटकंती

नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे शक्यच नव्हतं.घराबाहेर पडताना आई बाबांच्या भरपूर सूचना आल्या ,"अरे एवढ्या पावसात का जातोस आजारी पडशील ,सर्दी खोकला ताप येईल जाताना हेल्मेट घालून जा गाडी फास्ट मारू नको "वगैरे वगैरे...."
पण माझ्या भटक्या ला मी थांबू शकवत नव्हतो. मी सर्व पावसाळी किट घेऊन "संध्याकाळी लवकर घरी येईन" हे आश्वासन देऊन मी व माझा निसर्गवेडा भटक्या मित्र मयूर इचलकरंजी हुन बाहेर पडलो.बाहेर पडल्यावर पावसाने आमचे खुल्या दिलाने स्वागत केलं. २ चाकी  वरून चाहोबाजूचा निसर्ग न्याहाळत ,राष्ट्रीय महामार्ग वरून आम्ही कोल्हापूर ला आलो . कोल्हापुरात तर पाऊस पुरता सुसाट सुटला होता. साहजिक मनात विचार आला आता कुठे जायचे चोहीकडे ढगांचा गडगडाट ,हिरवीगार झालेले झाडे,गारेगार वारे पाहून माझ्या मनात सहज कोल्हापूर जिल्यातील गगनबावडा आलं . माझा मित्र मयूर पण पक्का निसर्ग प्रेमी,भटक्या. मयूरच्या पण डोक्यात गगनबावडाच होत. 
एका क्षणाचा हि विलंब ना लावता आम्ही गाडीवरून गगनबावडा ला मोर्चा वळवला . गगनबावड्याला हे महाराष्ट्र मधलं २ क्रमांक चे जिथे पाऊस पडतो आणि क्रमांक १ ला महाबळेश्वर .गगनबावडा हे कोल्हापूर पासून ६० KM म्हणजे कोकण ची सुरवात हे वर्णन मला माहिती असल्यामुळे माझी उत्सुकता जास्तच ताणली होती आणि आमच्या गगनबावडा चा प्रवास सुरु झाला .रास्ता,निसर्ग  तोच होता पण काहीतरी वेगळा सांगत होता "माझ्याकडं पहा उघड्याडोळ्यांनी,किती स्वतःला कंमिटमेन्ट मध्ये गुतंवून ठेवशील थोडा वेळ काढ माझ्यासाठी मग तुज्यातला तू कोण आहेस ते कळेल तुला ".  धुवाधार पाऊस,चोहीकडे हिरवळ,हवेतला गारवा ,शेतात भर पावसात जाणारे शेतकरी ,दरी डोंगर,धबधबे  डोंगरांना कवेत घेणारे धुके,आणि अस्सल कोकणातली टुमदार घरे  पाहून आमचे मन पूर्ण चार्जे होत होते .अश्या पावसात गरमागरम चहा,कांदाभजी,मिसळ  चा आस्वाद एका कोल्हापुरी माणसाने नाही घेतला तर नवलच!मस्तपैकी कांदाभजी,गरम चहा वर ताव मारून आम्ही भर पावसात मनसोक्त आनंद घेतला.असा  हा निसर्गरम्य प्रवासात कानाला हेडफोन ना लावता मी तो मनसोक्त अनुभवला . अखेर गगनबावडा आले ,तिथे  तर पाऊस तर बेभान सुटला होता. निसर्ग किती उदार आहे ह्याचा अनुभव मला क्षणक्षणाला येत होता. दुष्काळामुळे पिळून गेलेलो सर्वजण ह्या पावसाची चातकाप्रमाणे वाट वाट पाहत होतो .. निसर्ग पण पदोपदी जाणवून देत होता  "देर हें लेकिन अंधेर नही ". 
डोंगरांना कवेत घेतलेलं धुकं ,धुक्यात हरवलेला रास्ता पाहत आम्ही गगनगिरी गडावर पोचलो . तिथे पोचता पोचता एका क्षणात  शांत,पवित्र  धीरगंभीर जगात आम्ही पोचलो . "चोहीकडे झिंगाट करत असलेला पाऊस ,वाढत जाणारे धुकं ,गारठा ,समोर दिसणारे नयनरम्य कोकण,आम्ही स्तब्ध होऊन पाहत होतो . गगनगिरी गडावर मिळणार तृप्त करणारा शिरा,भात  हा ५ स्टार हॉटेलपेक्षा हि  सर्वात्कृष्ठ होता .. गडावरचे धीरगंभीर वातावरण ,सोसाट्याचा वारा,झिंगाट सुटलेला पाऊस,वाढलेल धुकं,नयनरम्य होऊन दिसणारे धबधबे जणू काही मला आणि माझा मित्र मयूर ला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. 
पाय हालत नव्हता पण काय करणार दुसऱ्या दिवशी परत आमच्या कंमिटमेंट्स होत्या . तिथे  निसर्गकडे पाहून मला एका सिनेमा मधले एक ओळ आठवली ."दिलो मे तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम हवा के झोको जैसे आझाद राहेन सीखो दारियो के लहेरो जैसे लहेरो मे बहेना सॅखो हर लम्हे से तुम मिलो खुल क अपनी बाहे हर पल एक सम देखे निगाहे".. ह्या ओळींन मला तृप्त स्वर्गीय आनंद मिळून दिला .. 
परत यायचे हे मनात ठरवून मी परतीच्या प्रवासाला लागलो. 

तर मित्रानो प्रत्येकाने एकदा तरी रोडट्रीप न प्रवास कराच . तुम्हाला आवडेल त्या ठिकाणे 

ह्या लेखावर प्रतिक्रिया नक्की कळवा...
वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत. 

कौशिक श्रोत्री 






Monday 15 August 2016

Unpredicted Marriage Age

Marriage is most beautiful gift in our life.There is a certain time in between 24 -30 when you (boys) prefer to get married and girls get married in between 21-26.
Luckiest ones get married earliest at 24-25,and rarest get married at 28-31.
But today there is unpredictable age of marriage .
What is perfect age of marriage??

20-30 age  is most challenging,daring, Crutial,Pathbreaking,Turning period in our life.We(boys) finish our education till age 23 and max age 27 but pressure for marriage emerges in home since at age 25 for boys.I think boys don't want to end their bachelor life so eazy since bachelor's life is never gonna come back. Our parents are always eager for settlement of their kids at earliest, every parents wish the same.
Marriage is the difficult decision for boys then girls.We(boys) should have good salary,good house,owned house on name of son, seven digit fix deposits in bank,some acers of farm, to get wife. House and salary are important during marriage.Some questions come in my critic mind.

We should extend our marraige age till we don't get good 6 to 7 digit salary?Do girls prefer 6-7 digit salary per month guys?????Is Salary,Money important thing?Don't things like boys family,boys nature,his education,his thoughts,his attitude matter?????????????
Most of my bathmates have got married but most of them are working professionals with 5 digit salary per month and I am looking at there happily married life they are happy married couples.
When should we(boys) get married???

In today's materialistic world you should
get married when you are mentally ready whether it is 25 or 28 or 31,you are self-confident about yourself regarding marraige and your career,you are confident about your thoughts have been matching with thoughts of her,your parents are confident with you,she believes in your qualities, abilities rather then money.
Never miss such beautiful gift of our life.
(All this views are my personal views )

Hope you liked it

Cheerrsss

Kaushik

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...