Thursday 29 November 2018

Film review:-2.0

Film review-2.0
One sentence review:- Perfect entertainer
but it fails to maintain the expectations of part 1 robot.
Stars:-2.5
Story could be elaborated much in detail.

दक्षिण भारतात तयार होणारे सिनेमे म्हणजे अचाट कल्पनाशक्ती.'गुरुत्वाकर्षण' ह्या गोष्टीला छेद देऊन उंच हवेत उडणारी माणसे,सरळ रेषेत उडणाऱ्या पेप्सी च्या बाटल्या, 180 डिग्री मध्ये फिरणारे चिल्लर,हवेत उंच उडी मारून परत जमिनीवर येणारा नायक,सामजिक संदेश,टेक्नॉलॉजी चा वापर करून खुळ लावणारे कथानक...आणि बऱ्याच गोष्टी दक्षिणेत तयार होणाऱ्या सिनेमात पाहायला मिळतात. 'रोबोट' ह्या सिनेमा ने असेच काहीसे खूळ लावले होते आणि 'रजनीकांत'  ह्या व्यक्तीला माणसापेक्षा मोठे केले होते.
2.0 हा देखील तसाच सिनेमा आहे.ह्या सिनेमा मध्ये अचाट Vfx ची दृश्य आहेत.पण हा सिनेमा कथेच्या बाबतीत काठावर पास होत आहे.
मोबाईल आणि मोबाईल टॉवर मुळे होणारे परिणाम आणि त्यातून घडणारे कथानक....असा एकूण सिनेमा चा पसारा आहे.संगीताच्या बाबतीत सिनेमा पूर्ण निराश करतो.सिनेमा पूर्णपणे 'अक्षय' आणि 'रजनीकांत' ह्या दोघांच्या कॅरॅक्टर भवती फिरत राहतो.कथा अजून खुलवता आली असती.'अक्षय' लाजवाब.अखेर 'रजनीकांत' नावाचे वादळ हे कथेच्या कमकुवत बाजू पण खाऊन टाकते.
कथेच्या बाबतीत:-काठावर पास
2.5स्टार्स
©Kaushik

Tuesday 13 November 2018

राजीनामा

   
दुपारचे एक वाजलेले होते.जोरात fan चा आवाज ऐकू येत होता.अधूनमधून हळूच टिंग...टिंग असा आवाज ऐकू येत होता.मधूनच मच....मच...सुरर...ढूररर....असा आवाज येऊ लागला.काही वेळेनंतर मोठ्या वी.एम.सी मशीनचा आवाज येऊ लागला.वी.एम सी मशीन चा आवाज आल्यावर  बेल चा आवाज आला आणि एका मोठ्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर मधून पायांचा आवाज येऊ लागला.तीन मोठ्या पदावरचे अभियंते नुकतेच दुपारचे जेवण करून ग्राउंड फ्लोअर वरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आले आणि तिथे असलेल्या Washroom कडे गेले.
तिथून काही वेळाने बाहेर आल्यावर तिघे शतपावली करायला आपापल्या मिशींना पीळ देत कंपनी च्या आवारात असलेल्या जागेत फिरू लागले.काही वेळ फिरल्यानंतर तिघे परत आपापल्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑफिस मध्ये परतले.तिघांचे वेगळे ऑफिस होते.पहिला इंजिनिअर त्याच्या ऑफिस च्या बाहेर येऊन थांबला.तिथे थांबून त्याने त्याचा अवतार पाहिला.दुपारी भर पेट जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती.त्याने त्याचा विस्कटलेला शर्ट परत ईन केला आणि केसांवरून हाथ फिरवत आपली केशरचना व्यवस्थित करत तो त्याच्या केबिन मध्ये शिरला.त्या तिघांपेकी पहिला प्रोडक्शन हेड होता;दुसरा क्वालिटी; आणि तिसरा प्लांट हेड.
तिथे त्याच्या केबिन मध्ये ३ जुनिअर इंजिनिअर बसलेले होते.त्यांच्याजवळ तो पहिला इंजिनिअर जाऊन बसला.
“जेवण झाले काय?”
पहिल्या इंजिनिअर ने प्रश्न विचारला.
कुणीच उत्तर दिले नाही.
सर्व जण तोंड पडून बसले आहेत हे त्याच्या लक्षात आले.
“अरे...काय झाले?”
सर्व जुनिअर इंजिनिअर लोकांचे पडलेली तोंडे पाहून त्यांच्या साहेबांना काळजी वाटू लागली.
“साहेब..आपल्या जुन्या maintainance इंजिनिअर ने राजीनामा दिला.”
पहिला जुनिअर इंजिनिअर ने उत्तर दिले.
“का...”
“माहित नाही.”
“कुठे आहे राजीनामा...”
“हा माझ्या हातात...”
“मला दाखव...”
जुनिअर इंजिनिअर ने त्याच्या साहेबांना राजीनामा दाखवला.साहेब तो राजीनामा वाचू लागले.
 
“आदरणीय मालक
मी 'मन्सूर खान' आपल्या कंपनीत सुरवातीपासून आहे.सुरवातीपासून मी अत्यंत शिस्तबद्ध;कर्तव्यदक्ष;आणि कामाप्रती निष्ठा असलेला माणूस आहे.तथापि गेल्या काही वर्षापासून मला खूप त्रास होत आहे.माझे साहेब मला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत.ते मला 'ए नाग्या,,,बोक्या....ह्रिथिक...अंडी घालणारा कोंबडा' असे म्हणतात.कधीकधी मला ते 'गड्डापाव' असे म्हणतात.मला भर मिटिंग मध्ये ते 'नाम लावलेला गणपती' असे म्हणतात.मी सिनिअर असून सुद्धा साहेब असे का करतात ह्याचा मला प्रश्न पडतो.कधीकधी ते आम्हाला केबिन मध्ये बोलावतात आणि उगाचच आमच्यावर रागावतात.रागवत असताना आम्हाला हसू आले का हसलास; म्हणून पुन्हा रागावतात.रागवत असताना माणूस मान खाली घालून उभा राहतो.तसा मी मान खाली घालून  उभा राहिलो की, माझ्याकडे बघ; खाली मान घालू नकोस असे परत म्हणतात आणि रागावतात.कधीकधी ते मला 'शार्कमासा' म्हणतात.कधीकधी मला 'बदक' म्हणतात.कधीकधी मला बुट्टीने मारीन असे म्हणतात.कधीकधी मला ते सकाळी ६.०० वाजता फोन करतात आणि अजून झोपला आहेस म्हणून रागावतात.त्यांना राग अनावर झाला कि मला ते बोक्या;टग्या...मासा...नाग्या...ह्रिथिक असे म्हणतात.

मालक;एक वेळ ह्रिथिक ठीक आहे पण मासा...बोक्या...नाग्या....गड्डापाव..ह्याला काय म्हणावे.

मालक; कधी कधी मला असे वाटते की मी माणूस नाही प्राणी आहे.नाग्या...बोक्या....असे शब्द मला आता स्वप्नात पण ऐकू येत आहेत.मालक; मला आता फक्त मांजर आणि उंदीर म्हणायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे.काम करून सुद्धा साहेब ह्या सर्व नावांनी मला हाक मारत असतात.त्यामुळे मी मानसिक रित्या खचलेलो आहे.कधीकधी मला आपण प्राणी आहोत की काय असे उगीचच वाटू लागत आहे.म्हणून मी माझ्या साहेबांच्या मानसिक त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे.
स्वीकार करावा.
आपला नम्र
मन्सूर”


राजीनामा पूर्ण वाचून त्या पहिल्या इंजिनिअर ने तो टेबल वर ठेवला.काही सेकंद त्यांनी दीर्घ श्वास घेतला.श्वास घेऊन त्यांनी केबिन मध्ये असलेल्या इंजिनिअर लोकांकडे पाहिले आणि काही सेकंदात सर्वांचा सुरु झाला जोराचा आणि न थांबणारा हास्यस्पोट...
©

kaushik


Sunday 4 November 2018

हाय जम्प

सायंकाळचे ५.०० वाजले होते.आजूबाजूला जोरदार वारे सुटले होते.पक्षांच्या किलबिलाट ऐकू येत होता.अधूनमधून गारेगार वाऱ्याची झुळूक जाणवत होती.लांबून सूर्यास्त दिसत होता.मधूनच स$रररर... असा आवाज ऐकू येत होता.अजस्त्र आणि भयावह वाटणाऱ्या पर्वतरांगा आजूबाजूला गुपचूप उभ्या होत्या.पर्वतरांगांमधून दिसणारी दरी अधिकच भयावह वाटत होती.लांबून एखादी गाडी आणि एखादी बस दिसत होती.मधूनच वाऱ्याचा वेग वाढत होता आणि कमी होत होता.जसजसे वेळ वाढत होता तसे आजूबाजूला भयावह वाटणारी अशी निःशब्द... अशी शांतता पसरत होती.पक्षांच्या किलबिलाट हळूहळू वाढत होता.

अजस्त्र अश्या असणाऱ्या पर्वतांमधून पायवाट दिसत होती.तिथून हळूहळू पायांचा आवाज येऊ लागला.२८ वर्षाचा तरुण तिथे असणाऱ्या पायवाटेवरच्या लहान झाडांवर पाय देत पुढे जात होता.पायवाटेवरून वाट काढत आजूबाजूला असणाऱ्या दगडांना धरत तो डोंगराच्या टोकाशी गेला आणि तिथे असणाऱ्या एका मोठ्या दगडाला टेकून उभा राहिला.त्याने वेळ पाहिली.सायंकाळचे ५.४५ वाजले होते.तो बराच उदास वाटत होता. त्याचा चेहरा बराच उदास आणि त्रासिक झाला होता.तो काही वेळ जमिनीवर विसावला आणि मनातल्या मनात विचार करू लागला.

“कधी संपणार हा त्रास...”

“किती प्रयत्न केले पण काही केल्या मार्ग दिसत नाही.आधी शिक्षणात अपयश;मग व्यवसायात अपयश...न संपणारा कर्जाचा डोंगर...”

तो खचून गेला होता.

“आयुष्यात आता काहीच उरले नाही.”

“कशाला जगायचे असे आयुष्य...”

“ह्या सर्व गोष्टींचा मला वैताग आला आहे.मला मुक्तता हवी आहे ह्या सर्वांमधून...”

विचार विचार करून तो पार खचून गेला.हळूहळू त्याच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागले.

“मी एवढ्या सर्व धार्मिक गोष्टी करतो तरी पण माझ्याच वाटेला हा त्रास...”

तो रडू लागला.रडूनरडून त्याचा चेहरा सुजला आणि त्याचे डोळे लालबुंद झाले होते.

त्याला सारेकाही संपले असे वाटत होते.

तो उठून उभा राहिला.त्याच्या मनात हा त्रास आता कायमचा संपवायचा असा भयानक विचार येऊ लागला.त्याने घड्याळ पाहिले.सायंकाळचे ५.५५ वाजले होते.तो हळूहळू डोंगराच्या एकदम टोकापाशी आला.त्याच्या कानावर सु$$$ई अश्या आवाजात गार वारे येऊ लागले.लांबून त्याला एका बाजूला सूर्यास्त दिसू लागला.त्याने आजूबाजूला दगडांवर अनेक प्रेमात बुडालेल्या व्यक्तींचे नाव पाहिले.स्वराजाची आठवण आणि साक्षीदार असलेल्या डोगरांच्या दगडांवर अनेक सैराट प्रेमींची नावं पाहून त्याला खटकले.तो आता दरीच्या अगदी जवळ गेला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला.लांबून सूर्य त्याला आता लालेलाल दिसू लागला.त्याने आजूबाजूला मनसोक्त शेवटचे पाहिले...आणि त्याने उंच खाली उडी मारायची ठरवली.तो उंच उडी मारणार तेवढ्यात त्याला  तिथे एक दगड दिसला.त्याचबरोबर त्याला इतिहासाची साक्ष असणारा असा एक सुप्रसिद्ध गड पर्वतरांगांमधून दिसू लागला.

त्या दगडावर काहीतरी लिहिले होते.त्याने ते पाहिले.

“हे ही दिवस जातील.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...”

त्याने ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचले.एक ते दोन मिनिटे तो ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचू लागला.फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याची विचारचक्रे बदलू लागली.त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा उमेद दिसू लागली.त्याने परत दरीत पाहिले.त्याला लांबून एक पक्षी उंच आकाशात झेप घेताना दिसला.त्याने परत तो इतिहासाची साक्ष देणारा गड पाहिला.त्याच्या अंगावर रोमांच येऊ लागले.

तो गड पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला.त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने स्वतःचे डोळे पुसले.परत त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिथे असलेली माती त्याने हातात घेतली आणि कपाळावर लावली आणि  पुन्हा नवीन उमेदीने अंगात बारा हातींचे बळ घेऊन तो डोंगर उतरू लागला.

©Kaushik shrotri.
#ichalkaranji

Thursday 1 November 2018

बहिणी...

सायंकाळचे ४.०० वाजलेले होते.इचलकरंजी मध्ये रस्त्यावर बरीच वर्दळ सुरु होती.बऱ्याच सरकारी बसेस रोड वरून जात होत्या.बुलेट आणि यामाहा वरून २५-२७ वर्षाचे तरुण ट्रीपल सीट वरून बेफिकीर होऊन गाडी चालवत जात होते.अधूनमधून ट्राफिक पोलिसांच्या शिट्टीचा आवाज येत होता.बऱ्याच गृहिणी गाडी वरून रोड वरून जात होत्या.
दुपारी ४.१५ ला एक मोठी शाळेची बस आली.ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलनी जवळ थांबली.त्या बस चे दार उघडले गेले आणि त्यातून ४ मुली आणि आणखीन काही मुली खाली उतरल्या.चारही मुली आणि इतर मुली १० ते ११ वर्षाच्या होत्या.त्या त्यांच्या कॉलनीत असलेल्या घरी चालत निघाल्या होत्या.त्यांचे घर जेमतेम ५० मीटर अंतरावर होते.कॉलनीत थोडीफार वर्दळ जाणवत होती.आजूबाजूला कॉलनीमध्ये बऱ्याच टोलेजंग इमारती आणि गर्भश्रीमंतीने सजलेले असे बंगले होते.त्या ४ मुली एकमेकींशी गप्पा मारत निघाल्या होत्या.बहुदा शाळेतल्या गप्पा मारत असाव्यात असे त्यांच्या हावभावावरून दिसत होते.चारही मुली एकमेकींच्या चुलत बहिणी होत्या.पहिल्या मुलीचे नाव अनन्या;दुसरीचे स्वप्ना;तिसरीचे संजना;चौथीचे जान्हवी.चौघींच्या मम्मा शेजारी शेजारी उभ्या राहून त्यांची वाट पाहत लांब थांबल्या होत्या.अनन्या आणि स्वप्ना एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या आणि संजन,जान्हवी देखील एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या.त्याचबरोबर अनन्या.स्वप्ना ह्या संजना आणि जान्हवी च्या मामेबहिणी होत्या आणि संजना,जान्हवी ह्या अनन्या आणि स्वप्ना च्या आत्तेबहिणी होत्या.
काही वेळानंतर अनन्या,स्वप्ना,संजना आणि जान्हवी एकमेकींशी भांडायला लागल्या.अनन्या ने संजना ची चेष्टा-मस्करी केली.त्याच्या बदल्यात जान्हवी ही अनन्या शी भांडू लागली आणि त्याचे रुपांतर हळूहळू जोरदार भांडणात होऊ लागले.
संजना,’’ए ढमे!तू का माझे केस ओढत होतीस?.’’
संजना अनन्या कडे पाहत चिडली.
अनन्या,’’तू मला काल का चिडवत होतीस?.’’
स्वप्ना,’’संजे...अनन्या शी भांडायचे नाही.”
लहान बहिण म्हणून स्वप्ना ही संजना शी भांडू लागली.
जान्हवी,’’ए खुळे! कशाला भांडत आहात...चला ना घरी.”
अनन्या,’’कोण खुळी?शाळेत सारखे संजना मला ड्रेस वरून चिडवत असती.सारखे माझे पेन्सिल आणि रब्बर मागून घेती.तू खुळी...संजना पण खुळी...”
जान्हवी ने अनन्या ला रस्त्यावर जोरदार ढकलून दिले.चार बहिणी आपापसात शुल्लक कारणावरून भांडू लागल्या. चौघींचा आवाज वाढू लागला.त्यांचे भांडण रस्त्यावरून जाणारे लोकं पाहू लागले.त्यातले काही जेष्ठ व्यक्ती चौघींना रागवू लागल्या.चौघींचे भांडण पाहून त्यांच्या मम्मा त्यांच्यापर्येंत धापधाप पळत गेल्या.
अनन्या,’’मम्मा,जान्हवी मला खुळी म्हणाली.”
संजना,’’मम्मा,अनन्या ने माझे केस ओढले.”
स्वप्ना,’’मम्मा,संजना माझ्या दीदी शी भांडत होती.”
चौघींच्या मम्मा त्यांच्या कन्यांना धरून आपआपल्या घरी घेऊन गेल्या आणि घरी जात असताना एकमेकींकडे डोळे वटारून पाहत मनातल्या मनात बोलू लागल्या.योगायोगाने दोघी शेजारी-शेजारी होत्या.
अनन्या आणि स्वप्ना ची आई जान्हवी च्या आईकडे पाहत,’’काय ही संजना आणि जान्हवी....असे रस्त्यावर कोण भांडत असते का....काय शिकवलेच नाही हिने हिच्या पोरींना.नुसते लाडावून ठेवले आहे.तिच्यापेक्षा माझ्या मुली खूप सिन्सिअर आहेत.मी बोलणारच नाही हिच्याशी.”
संजना आणि जान्हवी ची आई अनन्या च्या आई कडे पाहत,’’माझ्या मुली खूप साध्या आणि सरळ आहेत.त्या कशाला भांडत असणार?.ह्या अनन्या ने नक्कीच संजना ची चेष्टा केली असणार.थांब आता मी पण बोलणारच नाही हिच्याशी.”
चौघी एकमेकींच्या घरी गेल्या आणि त्यांच्या घराचे दार फा$ड असा आवाज करत बंद झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता...
अनन्या आणि स्वप्ना शाळेसाठी आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची वेणी घालत होती.
शेजारी असलेल्या जान्हवी आणि संजना आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची bag भरत होती.
अनन्या आणि स्वप्ना आवरून bag घेऊन घराबाहेर आल्या.तेवढ्यात अनन्या आणि स्वप्ना च्या मम्मा ने त्यांना थांबायला सांगितले आणि ती घरात काहीतरी आणायला गेली.
शेजारी संजना आणि जान्हवी देखील तयार होऊन बाहेर आल्या.त्यांची मम्मा देखील “थांबा मी बस पर्येंत सोडायला येते” असे म्हणत परत घरात गेली.
दोन मिनिटांनी दोन्ही मम्मा घराबाहेर आल्या.सकाळचे ७.१२ वाजले होते.दोघींनी बाहेर नजर फिरवली.दोघींना आपआपल्या मुली दिसल्या नाहीत.दोघींनी शेजारी-शेजारी डोळे वटारून पाहिले.त्यांना स्वतःची कन्या कुठेच दिसत नव्हत्या.दोघीही पळतपळत घराबाहेर पडल्या आणि कॉलनीत असलेल्या बस stop जवळ जाऊ लागल्या.तिथे गेल्यावर त्यांना दृश्य दिसले.
काल भांडत असणार्या चौघी बहिणी आज सकाळी एकमेकींचा हात हातात धरून बस stop च्या दिशेने जात होत्या.त्यांच्या मम्मा पळतपळत बस stop पर्येंत आल्या.तेवढ्यात बस आली आणि चौघी बहिणी एकमेकींना हात देत बस मध्ये चढल्या आणि “बाय मम्मा” असे म्हणत त्या बस मध्ये बसल्या आणि त्यांच्या मम्मा ते दृश्य आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे बघत पाहू लागल्या.
©
#Kaushik Shrotri
#Ichalkaranji#Feelfreetoshare#


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...