Sunday 29 July 2018

पुस्तक परीक्षण:- मृत्युंजयी; लेखक:- श्री.रत्नाकर मतकरी


मरणाला जिंकता यायला हवे.हे मरण भयानक असते.या मरणाने मला दोनदा निराधार केले.मी....मी...त्याचा सूड घेईन!मी जिंकेन मरणाला!
मला कैवल्यवाणी येते....
निरामयीने पोथी समोर धरली आणि हाथ जोडले.त्याक्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदागदा हलला.क्षणमात्र!
आणि..दुसर्या क्षणी घराचे छप्पर कोसळले.आजूबाजूच्या भिंतींना मोठे तडे गेले.निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूने सुटली आणि खाली येऊ लागली.भयचकित होऊन निरामयी पहातच राहिली.त्या क्षणी तिला बाजूला व्हायचे भान राहिले नाही.वरून खाली येणाऱ्या मृत्यूकडे ती डोळे फाडून पहातच राहिली.तिने मृत्यूला डिवचले होते.ती पोथी वाचायची असा निश्चय करून!

रात्रीचे बारा वाजले होते.अमावस्येची रात्र होती
मी गाडीत एकटाच होतो.रस्ता अगदी शांत होता.एका बाजूला काय ती वस्ती.तीदेखील दूरदूर बांधलेल्या बंगल्यांची.मध्ये बरीच जागा रिकामी सोडलेली.काही ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे विटांचे ढीग पडलेले होते.
रस्त्यांच्या दुसर्या बाजूला अशीच मोकळी जागा.त्यापलीकडे खाडी.
खाडीतले पाणी दिसतसुद्धा नव्हते.अंधाराच्या समुद्रात ते मिसळून गेले होते.वारे भन्नाट होते.दूरवरचे बंगले चोरट्या माणसांसारखे गुपचूप उभे होते.पांढर्या रंगाच्या आकृती अमानुष वाटत होत्या.
मी गाडीचा वेग वाढवला.
असल्या वाऱ्यामध्ये गाडी जोरात पळवायला काय मजा येते!
मी वेग वाढवला आणि....अचानक समोर ती उभी राहिली.


रत्नाकर मतकरींच्या सीरीज ची आणखीन एक गूढ कथा.मृत्युंजयी;भक्ष्य;किडे;जंगल;हुशारी;टोक-टोक पक्षी;डायरी..अश्या अनेक सरस कथा आहेत.सर्व कथा अत्यंत वेधक आणि लोभस आहेत.कथा मानवीभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.योग्य वेळेला कथेला टर्न बसतो आणि कथा जास्ती समृद्ध होत जाते.प्रत्येक कथेमधून मानवी जीवनाचे कांगारे पाहायला मिळतात.कथा वाचत असताना येणारा पुढचा ट्वीष्ट पाहून डोके  अक्षरश्या चक्रावून जाते.कथा वाचत असताना मानवी जीवनाचे खोल दर्शन घडत राहते.सर्व कथा वाचत असताना हुरहूर...भीती...थ्रील...अनामिक...गूढ...ह्या सर्व भावना आपल्याला घेरून टाकतात आणि व्यवहारी जगातून दूर एका अनामिक अश्या जगात घेऊन जातात.

माझ्याकडून अनेक स्टार्स ***********
कौशिक श्रोत्री
©







Tuesday 17 July 2018

पुस्तक परीक्षण-बाई,बायको,कॅलेंडर;लेखक-व.पु.काळे

"..अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉम्बचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली.प्रत्येक मजल्यावर पासष्ट बिऱ्हाड धरून एकूण दोनशेसाठ बिऱ्हाडे रमाकांत लघाटेच्या घरी निघाली.अनेक वर्ष ह्या चाळीमध्ये सनसनाटी काही घडलं नव्हते आणि पुढच्या वर्षी घडेल अशी शक्यता नव्हती..."

उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला.माझा हात अशा काही आवेशाने खेचला, की लहाणपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळून पडला असता.मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पहातच राहिलो.पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती.मला बाहेरच्या खोलीत ओढीत नेता नेता तो म्हणाला,"बाहेर कोण आलंय बघ."...

सुंदर इमारत,सुंदर सजावट,सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे सुंदर कथा संग्रह.संसारीसुंदरतेच्या भवती फिरणाऱ्या सर्व कथा आहेत.

बाई,बायको,कॅलेंडर;पांढरा हत्ती तोही लोकांचा;टाईट प्यांट;आयत्या ब्लॉकवर नागोबा;मीच तुमची वहिदा...अश्या एकाहून एक सरस कथा आहेत.सर्व कथांमध्ये सत्याची किनार लाभली आहे.काही कथा वाचत असतांना मनाला शल्य भिडत राहते आणि चटका लावून जाते.

सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे पुस्तक अजिबात चुकवू नये.

*******

कौशिक

Saturday 7 July 2018

सिने परीक्षण-संजू;Film review-Sanju

संजय दत्त...विक्षिप्त कारणांसाठी वीस वर्षे अखंड चर्चेत असणारे...ललनी आयुष्य जगणारे आणि विषारी आणि कडू घोट प्यायलेले व्यक्तिमत्त्व.एका आयुष्यात अनेक आयुष्य जगणाऱ्या  व्यक्तीवर सिनेमा आल्यावर तो पाहण्याची उत्सुकता प्रत्येक सिने रसिकांच्या मनात नैसर्गिक रित्या निर्माण होते.

तर...संजू हा सिनेमा संजय दत्त च्या पूर्ण आयुष्यावर बेतलेला आहे.त्याचे तरुणपणीचे आयुष्य,त्याच्या गलफ्रेंड्स,वडील सुनील दत्त ह्यांचा त्याच्यावर असलेला प्रभाव ह्या गोष्टींपासून सिनेमा ची सुरवात होते.पाचही बोटे तुपात अश्या घरात जन्म झाल्यावर त्याचे तरुणपण भरकटायला सुरू होते.मित्रांची वाईट संगत, ड्रग्स चे सेवन आणि अतिरेक आणि बॉम्ब ब्लास्ट व इतर गोष्टींवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.तरुणपणी कोणत्या गोष्टी करू नयेत हे सिनेमा पाहून जाणवते.

रणबीर कपूर ने संजय दत्त चा रोल करत असताना पूर्णपणे स्वतःला झोकून दिले आहे.संजय दत्त ची प्रत्येक गोष्ट,हालचाल,चालणे आणि बोलणे ह्या सर्व गोष्टी त्याने हुबेहूब साकारल्या आहेत.

रणबीर कपूर, परेश रावल, दिया मिर्झा आणि विकी कौशल यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. रणबीर हा कसलेला अभिनेता आहे हे परत सिद्ध झालेले आहे.गाणी ठीक आहेत.लेखन आणि दिग्दर्शन च्या बाबतीत राजकुमार हिरानी ह्यांचा कुणीही हात धरू शकत नाही.स्टोरीटेलर कसा असावा ह्याचे उत्तर म्हणजे राजकुमार हिरानी.

काही प्रश्न?संजय दत्त किती इनोसंट आहे ह्यावर सिनेमा मध्ये भर का दिला गेला?वास्तवता का दाखवली नाही.?नेमका काय संदेश देणार होते सिनेमा मधून...आणि बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात.पण सिनेमा कुठेही बोअर करत नाही.

म्हणून संजय दत्त कसा होता?... डोक्याला त्रास न घेता कोल्ड ड्रिंक आणि सामोसे खात एकदा सिनेमा पाहावा.

2.99 स्टार्स

कौशिक


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...