Thursday 16 April 2020

७५ लाख

बराच गजबजाट ऐकू येत होता.लांबून बऱ्याच दोन-चाकी गाड्या विचित्र हॉर्न वाजवत वेगात येत होत्या आणि त्याच वेगाने जात होत्या.शेजारी बरेच कॉफीशॉप दिसत होते.एकएक कॉफी शॉप ओलांडत दुचाकीस्वार निघाला होता.त्याला घाई दिसत होती.एकएक गल्ली त्याला दिसत होती.गाली क्रमांक.१...२...३...४.....असे करत तो ९व्या गल्लीजवळ आला.तिथे आल्यावर त्याने परत यु-टर्न घेतला आणि तो परत मागे फिरला.आणि चौथ्या गल्लीजवळ आला.तिथून परत त्याने टर्न घेतला आणि एकएक घर शोधत पुढे जाऊ लागला.

आजूबाजूला मोठे बंगले होते.त्यावर सुचनांचा पाऊस होता.एका बंगल्यावर लिहिले होते ‘बेल न वाजवता आत येणे.’ दुसऱ्या  बंगल्यावर ‘सुज्ञ माणसे दुपारी वामकुक्षी घेतात.’ पुढे गेल्यावर तिसऱ्या बंगल्यावर ‘कुत्रापासून नाही तर माणसापासून सावध राहा.’

तो दुचाकीस्वार एकएक सूचना पाहत जात होता.त्याला प्रचंड हसू येत होते.अखेर तो गल्लीमध्ये शेवटचा असलेल्या बंगल्याजवळ थांबला.त्याची गाडी त्याने बाहेर पार्क केली आणि तो गेटजवळ थांबला.गेटला लागून वॉचमनचे केबिन होते.

दुचाकीस्वार, “साहेब आहेत का?’’

वॉचमन, “आपण कोण?’’

दुचाकीस्वार,“मी साहेबांचा लांबचा पाव्हना.फोन केला आहे साहेबांना.’’

वॉचमनने इंटरकॉमवर फोन लावला.आणि काही वेळात फोन ठेवला.

वॉचमन,“तुंम्ही साहेबांच्या अगदी वेळेत आला आहात.जावा.’’

दुचाकीस्वार बंगल्यात गेला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे दोन वाजले होते.तो बंगला निरखू लागला.बंगल्यात दोन महागड्या चारचाकी होत्या आणि दोन अत्यंत महागड्या दोन चाकी होत्या.

बंगल्याला लागून जिना होता.तो चालत जिने चढू लागला आणि पहिल्या मजल्यावर गेला.तिथे गेल्यावर त्याला बंद खोली आणि बेल दिसली.तिथे त्याला सूचना दिसली.

“दुपारी बेल वाजवू नये.दारावर टकटक करावे.’’

त्याने दारावर टकटक असा आवाज केला.

दार उघडले गेले.

समोर ४५ वर्षाचा माणूस उभा होता.बहुतेक गडी असावा.

दुचाकीस्वार, “साहेब आहेत का?’’

“या.बसा आहेत.’’

दुचाकीस्वार बंगल्यात हॉलमध्ये गेला.बंगला मोठा वाटत होता.हॉलमध्ये महागडे फर्निचर दिसत होते.तिथे तो दुचाकीस्वार बसला.

तेवढ्यात साहेब आले.त्यांनी हॉलमध्ये असलेला ‘ए.सी’ सुरु केला.पांढरेकेस,अंगभर पांढऱ्या रंगाचे कपडे,हातात नॅपकीन आणि...धीरगंभीर डोळे.५५-५७ वर्षाचे साहेब असावेत.तो दुचाकीस्वार साहेबांकडे पाहत होता.

साहेब आल्यावर तो दुचाकीस्वार उभा राहिला.

“अरे.बस..बस..राहुल.’’

राहुल बसला.

साहेब, “अगं,एकतीस का...राहुल आलाय.आपल्याकडे.’’

साहेबांचे बोलणे ऐकून साहेबांच्या सौ पळतपळत बाहेर आल्या.

“कसा आहेस राहुल?’’

“मजेत काकू.काकांना बरेच दिवस भेटलो नाही.म्हणून आलो.’’

राहुलच्या हातात पुस्तक होते.साहेबांच्या सौ पुस्तकाकडे पाहत होत्या.

सौ,“नवीन पुस्तक.’’

राहुल, “हो.’’

साहेब,“कसे आहे रे पुस्तक?’’

राहुल, “मस्त आहे.तुमच्यासाठी गिफ्ट.खास.व्यवसाईक लोकांना खूप चांगले.’’

राहुलने साहेबांना पुस्तक दिले.

साहेब, “मनापासून धन्यवाद राहुल.’’

सौ, “राहुल काही घेणार का?’’

राहुल, “नको.’’

सौ, “लाजतोस  काय?’’

राहुल, “नाही.तसे काही नाही.’’

साहेब, “राहुलला एकवाटी आमरस दे.’’

राहुल, “चालेल.’’

सौ आमरस आणायला स्वयंपाघरात गेल्या.

राहुल घर पाहू लागला.

राहुल, “काका.घर सुंदर आहे.’’

साहेब, “न पाहताच कसे काय सुंदर आहे म्हणतोस.चल पूर्ण घर दाखवतो.’’

साहेब त्याला आधी बाल्कनीमध्ये घेऊन गेले.बाल्कनी मोठी होती.तिथे दोन झोपाळे दिसत होते.

साहेब, “इथे आम्ही दोन झोपाळे बांधलेले आहेत.इथे येऊन सर्वांना मोकळी हवा मिळते.हृदयाला चांगली असते मोकळी हवा.तेवढीच सध्या फुकट मिळते.फुकट गोष्ट सोडायची नाही.आणि चहा पिण्यासाठी आणि पुस्तक वाचण्यासाठी बाल्कनीसारखी जागा नाही.बाकी आमच्या दोन २५ लाखाच्या गाड्या आम्ही पार्क करून ठेवतो.दोन्ही बाल्कनीमधून दिसत असतात.आमची नजर देखील राहते.’’

राहुल मान डोलवत होता.

नंतर दोघे हॉलमध्ये आले.तिथे फर्निचर दिसत होते.मोठे झुंबर दिसत होते. एका बाजूला टेबल दिसत होते.तिथे पुस्तक रचून ठेवलेली होती.

साहेब, “इथे आम्ही सर्वजण एकत्र टी.व्ही पाहतो.पुस्तक वाचतो.बातम्या पाहतो.सीरियल पाहतो.शक्यतो मी सिरीयल पाहत नाही.आमच्या सूनबाई आणि आमच्या सौ पाहतात.विरंगुळा म्हणून चित्रपट पाहतो;जुने;राज कपूरचे;नाहीतर हल्लीचे सिनेमे....हा ‘टी.व्ही’ आम्ही डिस्काउंट मध्ये घेतला आहे.आमचे तब्बल ५००० रुपये वाचले.आमचे नातवंड टी.व्ही पाहत असतात. बाकी हे फर्निचर महाग आहे.आमच्या सूनबाईंचा चॉइस.हौशी आहेत खूप.हॉलमध्ये उकाडा वाढला कि आम्ही ‘ए.सी’ लावतो.कुटुंब म्हंटले कि ए.सी आलाच.तो देखील आम्ही डिस्काउंटमध्ये घेतला.त्यात आमचे २५०० रुपये वाचले.’’

राहुल, “(मनात)काय माणूस आहे!फर्निचरला ५०००० खर्च करतोय आणि टी.व्ही मध्ये ५००० वाचवतोय.’’

राहुल, “सुंदर आहे हॉल.’’

साहेब, “हे वरती लावलेले झुंबर.ते सुद्धा सुनेने आणलंय.हौसेला मोल नाही.किंमत तब्बल ८००००.’’

राहुल ऐकत होता.

हॉलमधून दोघे स्वयंपाघरात आले. स्वयंपाघर पाहून दोघे साहेबांच्या खोलीजवळ गेले.

साहेब, “स्वयंपाघर आमच्या सुनबाई आणि सौंची लाडकी जागा.इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे.फ्रीज आहे.ओव्हन आहे.बाकीच्या आधुनिक सुविधा आहेत.फ्रीज आहे.तब्बल ५००००चा.त्यात रंगीत पेय देखील आहे.’’

राहुल स्मितहास्य करत होता.

राहुलला तिथे ठेवलेले आंबे दिसले होते.

राहुल, “तिथे आंबे..’’

साहेब, “हो.सुनेकडून येतात.कोकणातून.भरपूर येतात.तिचे माहेर कोकण.अगदी कमी किमतीत.कधीकधी आम्हाला फुकट सुद्धा मिळतात.तिच्या वडिलांकडून.फुकट कधीतरी आम्ही घेतो.आंबे मात्र सुंदर.आम्ही रोज आमरस करून पितो.एक वाटी.’’

राहुल, “वाह!.’’

साहेब, “रोज एक वाटी.उन्हाळा संपेपर्येंत.’’

राहुल, “काय...!’’

साहेब, “हो.नाहीतर सर्वांचे वजन वाढते.मग ते कमी करायला खर्च.’’

राहुल ऐकत होता.

साहेब, “आता ही आमची खोली.शेजारची आमच्या मुलाची.दोन्ही खोलीत ए.सी. आहेत.जोडून बाथरूम आहेत.भारतीय पद्धत आणि पाश्चिमात्य पद्धत.दोन्हीची सवय असावी माणसाला.तिथे अंघोळीला पाणी आहे.चोवीस तास.’’

राहुल ऐकत होता.उरलेल्या दोन खोल्या साहेब त्याला दाखवत होते.दोघे शेवटच्या खोलीजवळ आले.

साहेब, “ही संगीत रूम.आमच्या चिरंजीवांना संगीताचा नाद.बाकी त्यांना कसला नाद नाही.संगीत म्हणजे त्यांचे जीव की प्राण.इथे सर्व वाद्य आहेत.ह्या खोलीला २ लाख रुपये खर्च आला.आमचे चिरंजीव घरचा व्यवसाय पाहतात.रात्री घरी आले की वाद्य वाजवत बसतात.’’

दोघे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गच्चीवर गेले.

साहेब, “ही माझी आवडती जागा.इथे मी दुपारी ३.०० ते ३.४० वामकुक्षी घेतो.’’

साहेब, “तर....राहुल कसे वाटले घर?आत्ता बोल.’’

राहुल, “खरंच मस्त आहे.’’

साहेब, “असे घर तुला बांधायचे असेल तर ७५ लाख खर्च येईल अंदाजे.’’

राहुल, “इतक्यात नाही.काका.’’

दोघे स्वयंपाघरात आले.

तिथे साहेबांच्या सौ होत्या.

साहेब, “राहुल घे आमरस.’’

सौ,’’तू जेवलास..’’

साहेब, “तो असणार जेवलेला.’’

राहुल काहीच बोलला नाही.

राहुल, “काका तुम्ही आमरास घेत...’’

साहेब, “मी जेवत असताना घेतो.आणि आमचे स्वयंपाघर आम्ही दुपारी दोनला बंद करतो.तू दोनला आलास म्हणून तुला आमरस मिळाला.एक वाटी.दुपारी अडीचला आला असतास तर आमचे स्वयंपाघर बंद असते.तुला काहीच मिळाले नसते.आमच्या वेळेत आले कि भरपूर आम्ही खायला घालतो.’’

राहुल, “ठीक आहे.’’

राहुल आमरस संपवतो.

साहेब, “मग...राहुल कसे सुरु आहे व्यवसाय आणि संसार.’’

राहुल, “उत्तम काका.तुम्ही घरी या.’’

साहेब, “येतो ना.’’

राहुल, “काकूला देखील घेऊन या.’’

साहेब, “नक्की.’’

राहुल, “निघतो मी.निघतो काकू.’’

साहेब, “ अगं.एकतीस का.राहुल निघाला आहे.’’

साहेबांच्या सौ हॉलमध्ये आल्या.

सौ, “ये परत.’’

राहुल बाहेर पडला आणि त्याच्या बाईकजवळ आला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे ०३.०० वाजले होते.

राहुल, “नुसता मी...मी...दुसरे काही सुचत नाही ह्या माणसाला.जाऊन काहीतरी खातो बाहेर.’’

विचार करत तो निघाला.

काही दिवसांनी:-

वेळ:-दुपारी १.३०ची

ठिकाण:-पुण्यात कुठेतरी

“येऊ का राहुल...?’’

साहेबांचा आवाज आला.

राहुल, “काका.या की.’’

साहेब राहुलच्या घरी आले होते.राहुल आणि साहेब दोघे हॉलमध्ये बसले होते.साहेब राहुलचे घर पाहत होते.एकएक गोष्ट पाहत होते.हॉलमध्ये ए.सी....महागडा टी.व्ही....इम्पोर्टेड फर्निचर...

राहूल, “काका, काकू आल्या नाहीत.’’

साहेब, “अरे ती आली नाही.मी आलो होतो कामासाठी.खूप महत्वाचे काम होते.हे काम झाले कि माझा व्यवसाय सुसाट.जाताजाता तुझ्याकडे आलो.’’

राहुल, “तुम्ही असताना कुठे काम अडते काका.तुम्ही काम फत्ते करूनच जाता.’’

तेवढ्यात राहुलची बायको हॉलमध्ये आली आणि दोघे साहेबांच्या पाया पडले.

साहेब, “अरे..असू दे...’’

साहेब, “काय करतीस गायत्री?’’

गायत्री, “घरगुती मेस आहे.ती मी बघते.राहुल त्याचा व्यवसाय पाहतो.मला देखील मदत करतो.’’

साहेब, “अरे वाह! एकंदरीत सुंदर चालू आहे.’’

राहुल आणि गायत्री दोघे साहेबांकडे पाहून स्मितहास्य करतात.

गायत्री लगेच स्वयंपाघरात जाते आणि साहेबांना सरबत करून आणते.तिघे सरबत  पीत गप्पा मारत होते.

थोड्यावेळाने:-

राहुल, “काका..घर बघूया.’’

साहेब, “चल.’’

दोघे घर निरखू लागले.गायत्री स्वयंपाघरात गेली.

पूर्ण घर पाहून झाल्यावर दोघे हॉलमध्ये बसले.

साहेब, “मस्त आहे घर राहुल.सर्व सोयीयुक्त.साधारण किती खर्च...’’

राहुल,(स्मितहास्य करत) “९० लाख.मी एकही रुपया खर्च केला नाही.’’

साहेब,(आश्चर्यचकित होऊन) “कसे काय रे?’’

राहुल, “काका.लग्न झाले तेव्हा माझ्या सासरेबुवांनी हे थ्री ‘बी.एच.के’ घर गिफ्ट म्हणून दिले.’’

साहेब, “काय सांगतोस काय?’’

राहुल, “हो.’’

राहुल हसत हसत उत्तर देत होता.

राहुल, “आणि मला त्यांनी....६० लाखाची गाडी देखील दिली.मी कधीतरी ती बाहेर काढतो.’’

साहेब काहीच बोलले नाहीत.

तेवढ्यात गायत्रीने साहेबांना आणि राहुलला खीर आणली.

राहुल, “काका.घ्या ना खीर.’’

साहेब, “खीर...आत्ता...’’

राहुल, “कसे आहे काका...आम्ही दोघे दुपारी एकलाच स्वयंपाघर बंद करतो.तुम्ही लवकर आला असता तर तुम्हाला आमरस आणि जेवण दोन्ही मिळाले असते.आमची जेवणाची वेळ १२.३० ते १.००.एक नंतर येणाऱ्या मंडळींना आम्ही असेच काहीतरी गोड करून देतो.उपाशी ठेवत नाही...आणि काका...दुपारी तुम्ही कमीच जेवा...त्यात तुमचे वय...तुमचा तो आजार...तुमची तब्येत....म्हणून गोड म्हणून मस्त पेकी खीर खा..दोघे मिळून मस्त पेकी दुपारी ३.००-३.४० वामकुक्षी घेऊ.’’

साहेब खीर खात अवाक झाले आणि राहुलकडे निर्विकार नजरेने पाहू लागले.

 

©

Kaushik



Wednesday 15 April 2020

पुस्तक परिचय:-पावनखिंड

‘आबाजी,मागं हो!’

आबाजीने मागं पाहिले तो, आपल्या धारकर्यांसह शिवाजीराजे धावत येत होते.राजांच्या हातात तळपती तलवार होती.

राजांच्या आज्ञेनुसार आबाजी बाजूला झाला.बाजी आणि शिवाजीराजे एकमेकांसमोर उभे होते.

शिवाजीराजांच्या भवती धारकऱ्यांचे कडे होते.मशालधारी दोन्ही बाजूला उभे होते.

बाजी प्रथमच शिवाजीराजांना पाहत होते.

वय तीस,जिरेटोप घातलेली,शिवगंधाने विशाल कपाळ रेखलेले,तेजस्वी वेध घेणारे डोळे बाजी पाहत होते.तीस वर्षाचे वयाचे भान त्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.नजरेत भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.चेहऱ्यावर तेज दिसत होते.

बाजी शिवाजीराजांचे रूप निरखत होते.

.....

हेलकावे घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते.पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हते.

बाजींचा आवाज येत होता, ‘चला’

चला!

कुठं जायचं?

........

रणजीत देसाई ह्यांचे लिखाण आणि...बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज....ह्यांच्या पावनखिंड मोहिमेचा पराक्रम अनुभवण्यासाठी अवश्य वाचाच.

 

👉 खरेदी करायला क्लिक करा

 

 


Sunday 12 April 2020

मराठी म्हणी

असतील शिते तर जमतील भूते:- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

 

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ:- दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

 

अडला हरी गाढवाचे पाय धरी:- एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते

 

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा:- जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही

 

अति तेथे माती:- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

 

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे:- दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

 

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज:- गरजवंताला अक्कल नसते

 

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे:- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.

 

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण:- मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

 

अंधारात केले, पण उजेडात आले:- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

 

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था:- अशक्यकोटीतील गोष्टी

 

अतिपरिचयात अवज्ञा:- जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

 

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे:- कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

 

हपापाचा माल गपापा:- लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.

 

आयत्या बिळावर नागोबा:- एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

 

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे:- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे

आपलेच दात आपलेच ओठ:- आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

आपला हात जगन्नाथ:- आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

 

 

 


Thursday 9 April 2020

श्रीगुरुचरित्र : पारायण-पद्धती

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.

३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

 


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...