Sunday 12 April 2020

मराठी म्हणी

असतील शिते तर जमतील भूते:- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

 

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ:- दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

 

अडला हरी गाढवाचे पाय धरी:- एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते

 

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा:- जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही

 

अति तेथे माती:- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

 

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे:- दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

 

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज:- गरजवंताला अक्कल नसते

 

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे:- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.

 

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण:- मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

 

अंधारात केले, पण उजेडात आले:- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

 

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था:- अशक्यकोटीतील गोष्टी

 

अतिपरिचयात अवज्ञा:- जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

 

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे:- कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

 

हपापाचा माल गपापा:- लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.

 

आयत्या बिळावर नागोबा:- एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

 

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे:- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे

आपलेच दात आपलेच ओठ:- आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

आपला हात जगन्नाथ:- आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

 

 

 


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...