Sunday, 19 August 2018

Movie Review:- Satyameva Jayate

 Veer is on the mission to astonish the corrupt cops due to haunted by some incidents from his past.He turns into a bad man and prepares the revenge plan.Meanwhile, honest and intelligent inspector Shivansh is given the dangerous task of tracking down the cop killer.

Movie deals with the theme of anti-corruption and misuse of the power more and often. Movie works on the emotions of angry young man fighting against the system.Movies with themes of anti-corruption and misuse of power are relevant to our times, now more than ever before. 
Movie is an action thriller that works on the simple premise of an angry man.In film we see the John as a hard core burning man Due to  some of the past incidents he plans to finish the entire corruption in the system which latter follows on by the opposition of Manoj Bajpayee. Story of the film seems to be often repeated often. There is nothing new in the story to watch out. Someone should tell the director and story writer of this film that film consists of the story. It doesn't work simply on six pack abs and intense patriotism feeling and dialogues. If you cannot write simple story then  it's useless to make film like Satyamev Jayate.

Movie tells very hard to sell the age-old idea  but audience is smart enough to know it. With John on screen, I expected it has good action but sometimes it was worst and bloody. Straight a way, story writer and director fail to write proper script and they have wasted talented actors like John and Manoj. Showing John Abraham in six packs doesn't make your product defect free.Audience don't always like new recipe in the old bottle.

It is excruciating film.Director should be thought that you cannot put anything and show it in the film. It should have a flow. It should have at least minimum basics of storytelling.

Please John and Manoj. You are such a talented creative guys. Don't do such crap films.

0.25 Stars


त्याच त्याच जुन्या कथांना भडक मसालापणा देऊन विचित्र डायलॉग देऊन कथा वगळून सादर करण्याचा केविलवाणा प्रयत्न.कथा कशी लिहावी आणि सिनेमा मध्ये कथा असते  हे बहुदा कुणीतरी ह्या सिनेमा च्या दिग्दर्शकाला किंवा लेखकाला सांगावे.

पावशेर स्टार

©
Kaushik Shrotri

Sunday, 5 August 2018

Movie Review: Mission Impossible- Part 6


उडणार्या गाड्या...सदैव चिरतरुण राहणारा आणि हवेतून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत जाणारा(नाही उडणारा)  नायक...कधीच म्हातारा न होणारा...सदैव आजूबाजूला अप्सारांमध्ये असणारा नायक...वय फक्त नावाला असते हे ब्रीधवाक्य घेऊन जन्माला आलेला टॉम क्रूज.  

 मिशन इम्पॉसिबल  ही फिल्म सिरीज त्याचे वय आणि काम ह्याचा काडीमात्र संबंध नाही हे दर्शवत आहे.सिनेमा ची कथा एका plutonium धातू चोरण्यापासून होते आणि हा धातू काही कट्टर अतिरेक्यांच्या हाती लागून भयानक विध्वंस घडवण्याचा प्रयत्न सुरु होतो आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याची जबाबदारी येते कधीही म्हातारा न होणारा टॉम क्रूज  वर.

टॉम क्रूज ;पुरुषाने किती आकर्षक असावे ह्याचे उत्तम उदाहरण.दमदार कथा आणि थरार ह्या गोष्टी मिशन इम्पोसिबल मध्ये उत्तम रित्या साधल्या गेल्या आहेत.फिल्म मध्ये तो काय..काय..करतो. स्वतःचा पाय मोडतो,पंचवीस हजार उंचीवरून विमानातून जमिनीवर उडी मारतो,चक्रीवादळालाही लाजवेल अश्या वेगाने BMW ची मोटारसायकल पॅरिस  च्या रस्त्यांवरून अक्षरशः पळवतो(इतका पळवतो की काही वेळेला रस्तेच टॉम च्या मागून पाळतात की काय असे वाटू लागते).माणूस पाठलाग करत हेलिकॉप्टर वर सुद्धा ताबा घेऊ शकतो आणि हेलिकॉप्टर वर लटकत शाळेत शिकवलेले सर्व नियम पायदळी तुडवू शकतो आणि काही सेकंदात वेळेला तीनशे साठ अंशात फिरवू शकतो हे देखील ह्या सिनेमा मधून नायक दाखवून देतो.फक्त आणि फक्त टॉम क्रूज पूर्ण सिनेमा फिरवतो. 

ह्या सर्व सर्कशी करत असताना सिनेमा ची कथा कुठेही रेंगाळत नाही.कथा उत्तम रित्या बांधलेली असल्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षक इंटर्वल ला सुद्धा हलत नाही.पाश्वसंगीत देखील क्लास आहे.हॉलीवूड मध्ये  कथेला आणि तंत्रज्ञानाला महत्व देत असल्यामुळे दर्जेदार सिनेमे उगीचंच बनत नाहीत.

तर वय हे फक्त सांगण्यासाठी असते हे पाहण्यासाठी आणि उडणार्या गाड्या आणि वेग ह्यांचा उत्तम ताळमेळ कसा असतो त्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.

Rating-5 stars
कौशिक

©

Sunday, 29 July 2018

पुस्तक परीक्षण:- मृत्युंजयी; लेखक:- श्री.रत्नाकर मतकरी


मरणाला जिंकता यायला हवे.हे मरण भयानक असते.या मरणाने मला दोनदा निराधार केले.मी....मी...त्याचा सूड घेईन!मी जिंकेन मरणाला!
मला कैवल्यवाणी येते....
निरामयीने पोथी समोर धरली आणि हाथ जोडले.त्याक्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदागदा हलला.क्षणमात्र!
आणि..दुसर्या क्षणी घराचे छप्पर कोसळले.आजूबाजूच्या भिंतींना मोठे तडे गेले.निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूने सुटली आणि खाली येऊ लागली.भयचकित होऊन निरामयी पहातच राहिली.त्या क्षणी तिला बाजूला व्हायचे भान राहिले नाही.वरून खाली येणाऱ्या मृत्यूकडे ती डोळे फाडून पहातच राहिली.तिने मृत्यूला डिवचले होते.ती पोथी वाचायची असा निश्चय करून!

रात्रीचे बारा वाजले होते.अमावस्येची रात्र होती
मी गाडीत एकटाच होतो.रस्ता अगदी शांत होता.एका बाजूला काय ती वस्ती.तीदेखील दूरदूर बांधलेल्या बंगल्यांची.मध्ये बरीच जागा रिकामी सोडलेली.काही ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे विटांचे ढीग पडलेले होते.
रस्त्यांच्या दुसर्या बाजूला अशीच मोकळी जागा.त्यापलीकडे खाडी.
खाडीतले पाणी दिसतसुद्धा नव्हते.अंधाराच्या समुद्रात ते मिसळून गेले होते.वारे भन्नाट होते.दूरवरचे बंगले चोरट्या माणसांसारखे गुपचूप उभे होते.पांढर्या रंगाच्या आकृती अमानुष वाटत होत्या.
मी गाडीचा वेग वाढवला.
असल्या वाऱ्यामध्ये गाडी जोरात पळवायला काय मजा येते!
मी वेग वाढवला आणि....अचानक समोर ती उभी राहिली.


रत्नाकर मतकरींच्या सीरीज ची आणखीन एक गूढ कथा.मृत्युंजयी;भक्ष्य;किडे;जंगल;हुशारी;टोक-टोक पक्षी;डायरी..अश्या अनेक सरस कथा आहेत.सर्व कथा अत्यंत वेधक आणि लोभस आहेत.कथा मानवीभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.योग्य वेळेला कथेला टर्न बसतो आणि कथा जास्ती समृद्ध होत जाते.प्रत्येक कथेमधून मानवी जीवनाचे कांगारे पाहायला मिळतात.कथा वाचत असताना येणारा पुढचा ट्वीष्ट पाहून डोके  अक्षरश्या चक्रावून जाते.कथा वाचत असताना मानवी जीवनाचे खोल दर्शन घडत राहते.सर्व कथा वाचत असताना हुरहूर...भीती...थ्रील...अनामिक...गूढ...ह्या सर्व भावना आपल्याला घेरून टाकतात आणि व्यवहारी जगातून दूर एका अनामिक अश्या जगात घेऊन जातात.

माझ्याकडून अनेक स्टार्स ***********
कौशिक श्रोत्री
©







Tuesday, 17 July 2018

पुस्तक परीक्षण-बाई,बायको,कॅलेंडर;लेखक-व.पु.काळे

"..अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉम्बचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली.प्रत्येक मजल्यावर पासष्ट बिऱ्हाड धरून एकूण दोनशेसाठ बिऱ्हाडे रमाकांत लघाटेच्या घरी निघाली.अनेक वर्ष ह्या चाळीमध्ये सनसनाटी काही घडलं नव्हते आणि पुढच्या वर्षी घडेल अशी शक्यता नव्हती..."

उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला.माझा हात अशा काही आवेशाने खेचला, की लहाणपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळून पडला असता.मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पहातच राहिलो.पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती.मला बाहेरच्या खोलीत ओढीत नेता नेता तो म्हणाला,"बाहेर कोण आलंय बघ."...

सुंदर इमारत,सुंदर सजावट,सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे सुंदर कथा संग्रह.संसारीसुंदरतेच्या भवती फिरणाऱ्या सर्व कथा आहेत.

बाई,बायको,कॅलेंडर;पांढरा हत्ती तोही लोकांचा;टाईट प्यांट;आयत्या ब्लॉकवर नागोबा;मीच तुमची वहिदा...अश्या एकाहून एक सरस कथा आहेत.सर्व कथांमध्ये सत्याची किनार लाभली आहे.काही कथा वाचत असतांना मनाला शल्य भिडत राहते आणि चटका लावून जाते.

सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे पुस्तक अजिबात चुकवू नये.

*******

कौशिक

Saturday, 7 July 2018

सिने परीक्षण-संजू;Film review-Sanju

संजय दत्त...विक्षिप्त कारणांसाठी वीस वर्षे अखंड चर्चेत असणारे...ललनी आयुष्य जगणारे आणि विषारी आणि कडू घोट प्यायलेले व्यक्तिमत्त्व.एका आयुष्यात अनेक आयुष्य जगणाऱ्या  व्यक्तीवर सिनेमा आल्यावर तो पाहण्याची उत्सुकता प्रत्येक सिने रसिकांच्या मनात नैसर्गिक रित्या निर्माण होते.

तर...संजू हा सिनेमा संजय दत्त च्या पूर्ण आयुष्यावर बेतलेला आहे.त्याचे तरुणपणीचे आयुष्य,त्याच्या गलफ्रेंड्स,वडील सुनील दत्त ह्यांचा त्याच्यावर असलेला प्रभाव ह्या गोष्टींपासून सिनेमा ची सुरवात होते.पाचही बोटे तुपात अश्या घरात जन्म झाल्यावर त्याचे तरुणपण भरकटायला सुरू होते.मित्रांची वाईट संगत, ड्रग्स चे सेवन आणि अतिरेक आणि बॉम्ब ब्लास्ट व इतर गोष्टींवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.तरुणपणी कोणत्या गोष्टी करू नयेत हे सिनेमा पाहून जाणवते.

रणबीर कपूर ने संजय दत्त चा रोल करत असताना पूर्णपणे स्वतःला झोकून दिले आहे.संजय दत्त ची प्रत्येक गोष्ट,हालचाल,चालणे आणि बोलणे ह्या सर्व गोष्टी त्याने हुबेहूब साकारल्या आहेत.

रणबीर कपूर, परेश रावल, दिया मिर्झा आणि विकी कौशल यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. रणबीर हा कसलेला अभिनेता आहे हे परत सिद्ध झालेले आहे.गाणी ठीक आहेत.लेखन आणि दिग्दर्शन च्या बाबतीत राजकुमार हिरानी ह्यांचा कुणीही हात धरू शकत नाही.स्टोरीटेलर कसा असावा ह्याचे उत्तर म्हणजे राजकुमार हिरानी.

काही प्रश्न?संजय दत्त किती इनोसंट आहे ह्यावर सिनेमा मध्ये भर का दिला गेला?वास्तवता का दाखवली नाही.?नेमका काय संदेश देणार होते सिनेमा मधून...आणि बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात.पण सिनेमा कुठेही बोअर करत नाही.

म्हणून संजय दत्त कसा होता?... डोक्याला त्रास न घेता कोल्ड ड्रिंक आणि सामोसे खात एकदा सिनेमा पाहावा.

2.99 स्टार्स

कौशिक


Saturday, 23 June 2018

किल्ली

मध्यरात्रीचे २.०० वाजलेले होते.समस्त इचलकरंजी मध्ये पाऊसाचा जोरदार दणका सुरु होता.सर्वत्र काळोख पसरलेला होता.आजूबाजूला असणाऱ्या इमारती काळोखात चिडीचूप उभ्या होत्या.त्या इमारतींच्या शेजारी असलेले बंगले काळोखात हरवलेले होते.सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते.लांब एखाद्या बंगल्याचा दिव्याचा ठिपका दिसत होता.सर्वत्र भयाण शांतता पसरलेली होती.मधूनच चमकणारी वीज ह्या भयाण शांततेला मुक्त वातावरण निर्माण करत होती.आजूबाजूला असणारी  झाडे वाऱ्याने आडवीतिडवी होत कोणत्या ही क्षणी कोसळतील अश्या बेतात होती.रस्त्यावर लांबून एखाद दुसरी बस दिसत होती.हळूहळू रस्त्यांवर पालापाचोळा आणि चिखल जमायला सुरु झाला.
रात्री ३.१५ ला पाऊसाचा दणका थांबला होता.एव्हाना आकाश मोकळे होऊन चंद्रदर्शन होत होते.सर्व रस्त्यांवर पालापाचोळा साठलेला होता.मधूनच कुत्र्यांचा भुंकण्याच्या आवाज येत होता.सर्वत्र मातीचा सुगंध पसरलेला होता.
हळूहळू कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाज वाढला आणि रस्त्यावर पसरलेली शांतता लुप्त होण्यास सुरवात झाली.हळूहळू फाडफाड... असा आवाज येऊ लागला.रस्त्याच्या लांबून एक ३२ वर्षाचा युवक त्याच्या बुलेट वरून हेल्मेट घालून येत होता.तो बुलेट वरून इचलकरंजी च्या मुख्य रस्त्यावरून निघाला होता.काही वेळानंतर तो एका अपरिचित रस्त्यावरून निघाला आणि एका मोठ्या टोलेजंग बंगल्याच्या बाहेर थांबला.शहरातच पण एका अपरिचित अश्या जागी तो बंगला होता.बंगल्याच्या आजूबाजूला बरेच बंगले होते.सर्व शहरात लाईट नसताना ह्या बंगल्यात लाईट सुरु होती.लगेचच त्याने बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या केबिन च्या बाहेर आवाज दिला.झोपेतून जागा होत आणि जांभ्या देत तो उठला आणि त्याने केबिन मधूनच स्वयंचलित यंत्राच्या मदतीने लगेचच बंगल्याचे गेट उघडले.त्या युवकाने लगेचच त्याची बुलेट बंगल्याच्या आत घेतली.त्याने बुलेट आत घेतली आणि एक मिनिटांनी गेट लगेचच बंद झाले.
पहाटेचे ३.२५ वाजलेले होते.त्या युवकाने त्याची बुलेट बंगल्याच्या आत पार्क केली आणि तो बंगल्याच्या तळमजल्यावर गेला.तिथे त्याने बेल वाजवली.बंगला खूप मोठा होता.तळमजल्यावर असलेल्या एका खोलीत दिवा सुरु होता.बाहेर चिडीचूप शांतता असताना त्या तळमजल्यावर पहाटे “रॉकी बाल्बोआ” ची गाणी ऐकू येत होती.त्याने बेल वाजवल्यावर कुणीही दार उघडले नाही.परत तो बेल वाजवणार तेवढ्यात बाहेर असलेला सुरक्षा रक्षक म्हणाला
“अहो,दाराला लॉक केले नाही.बिनधास्त जा.’’
त्या सुरक्षा रक्षकाचे ऐकून त्या युवकाने दार उघडले आणि तो बंगल्याच्या तळमजल्यावर असलेल्या “शंभर वर्ष आयुष्य” असे नाव असलेल्या खोलीत गेला.तिथे त्याला विलक्षण दृश्य दिसले.रॉकी बाल्बोआ च्या गाण्यांवर ५२ वर्षाचे इचलकरंजी चे उद्योजक डी.के व्यायाम करत होते.लगेचच त्याने तळमजल्यावर असलेले दार बंद केले आणि तो तळमजल्यावर असलेल्या सोफ्यावर बसला.डी.के.बैठका मारत होते.बैठका मारून झाल्यावर त्यांनी लगेचच जोर मारायला सुरु केले.एक हात जमिनीवर आणि एक हात कंबरेच्या जवळ अश्या अवघड रीतीने ते जोर मारत होते.एका बाजूला रॉकी बाल्बोआ चे अमर्याद उर्जा निर्माण करणारे गाणे“आय ऑफ द टायगर” सुरु होते आणि एका बाजूला डी.के अखंडपणे उर्जा लावत व्यायाम करत होते.
तब्बल एक मिनिटांनी ते जोर मारायचे थांबले आणि त्यांनी हाताच्या खुणेनेच त्या तरुणाला त्यांच्याबरोबर जोर मारण्याचे आदेश दिले.नाक मुरडत तो तरुण डी.के साहेबांबरोबर जोर मारू लागला आणि साहेबांना मनातल्या मनात कोल्हापूरी शिव्या देऊ लागला.पण त्याला डी.के साहेबांच्या वेगाने जोर मारणे जमले नाही.काही मिनिटांनी तो सोफ्यावर बसला आणि डी.के साहेब जमिनीवरून उठले.साहेब उठल्यावर जमीन घामाने ओली झाली होती.डी.के म्हणजे इचलकरंजी चे सुप्रसिद्ध उद्योगपती.सहा फुट उंची,ह्रिथिक रोशन ला लाजवेल असा गोरा वर्ण आणि तब्येत,तीक्ष्ण असे करारी आणि बोक्यासारखे डोळे आणि भेदक नजर,उजव्या हातावर मोठा tattoo, पन्नास च्या पुढे वय असूनही पांढरे न झालेले केस,दोन्ही हातात चारही बोटात असलेल्या अंगठ्या,चेहऱ्यावर दिसणारा तणाव आणि पडलेल्या आठ्या आणि सतत गंभीर चेहरा,कमवलेली शरीरयष्टी व प्रयोग आणि काम ह्यांचे उत्तम मिश्रण म्हणजे डी.के.
डी.के,“लवकर आलास महेश.’’
तो,“हो.’’
“बस थोडावेळ.’’
असे म्हणून डी.के आवरायला गेले.१५ मिनिटात आवरून डी.के बाहेर आले.एव्हाना सकाळचे ४.०० वाजले होते.
“चल आपल्याला पुण्याला लवकर पोहोचायचे आहे.’’
दोघेही पहाटे ४.१५ वाजता बंगल्याच्या आवारात आले.
बंगल्यात ३ गाड्या होत्या.एक बी.एम.डब्लू होती आणि एक ऑडी Q-७ होती आणि एक मर्सिडीज होती.महेश त्यांचा ड्राईवर होता.महेशने नेहमीची ऑडी च्या गाडीची किल्ली ची विचारणा साहेबांकडे केली.
“आज मर्सिडीज घेऊन जाऊ.’’
किल्ली घेऊन महेश गाडीच्या जवळ गेला आणि त्याला गाडीची अवस्था पाहून धक्काच बसला.
‘’हे काय केलंय साहेब?.’’
नुकतीच महिन्यापूर्वी घेतलेल्या नव्या कोऱ्या मर्सिडीज मध्ये महेशच्या साहेबांनी प्रचंड प्रयोग केले होते.गाडीचा असणारा पांढर्या रंगावर त्यांनी काळा रंग मारलेला होता आणि गाडी चा मधला काही भाग ओपन टू एअर केला होता.नव्या गाडीची अशी हालत पाहून महेश च्या कपाळावर आठ्या पडल्या.“आणखीन काय काय केले आहे ह्या मर्सिडीज मध्ये  वेड्या माणसाने कोण जाणे”?असे मनातल्या मनात म्हणत तो गाडीमध्ये बसला.डी.के साहेब गाडीच्या मागे बसले आणि ते बंगल्याच्या बाहेर पडले आणि सुसाट वेगाने रस्त्यावरची शांततेची अक्षरशः चिंधड्या उडवत पुण्याच्या दिशेने निघाले.
मध्यरात्री २.४५ ला फोन केला म्हणून महेश डी.के साहेबांना मनातल्या मनात बेधडक शिव्या घालत होता.डी.के हे सध्याच्या कलयुगाचे इचलकरंजी चे एडिसन चे अवतार होते.नवनिर्मिती चा त्यांना प्रचंड ध्यास होता.नवीन गाडी खोलून त्यातून काहीतरी नवनिर्मिती करणे हा त्यांचा आवडता पेशा होता.
१०० च्या वेगाने महेश गाडी चालवत निघाला होता.गाडीमध्ये रेडीओ सुरु होता.त्याच्या मागे साहेब बसले होते.गाडी इचलकरंजी पास करून कोल्हापूर च्या जवळ आली होती.गाडीच्या मध्ये असलेल्या काचेतून तो मागे असलेल्या साहेबांकडे पाहू लागला.गाडीच्या मागे बसून साहेब चालत्या गाडीत घरचा वेळ वाचवून दंत मंजन वापरून दात घासत होते आणि गाडीच्या काचा खाली करून चूळ भरत होते.हे सर्व दृश्य महेश वेड्यासारखा पाहतच राहिला.तरीही तो गाडी चालवत राहिला.काही वेळाने साहेब ओपन एअर च्या भागातून थोडेसे डोके वर कडून बाहेर पाहू लागले.
गाडी कोल्हापूर पास करून पुढे निघाली.सकाळचे ६.४० वाजले होते.गाडीत बसल्या बसल्या डी.के साहेबांनी ब्रेड बटर त्यांच्या पिशवीतून बाहेर काढले आणि ते खाऊ लागले.महेश ला पण भूक लागली होती पण त्याला डी.के साहेब काहीच बोलले नाहीत.ते पाहून महेश मनातल्या मनात चिडला.साहेबांचा अचानक सुनामी सारखा असलेला चिडका स्वभाव माहिती असल्यामुळे तो काहीच बोलला नाही.गाडी चालवत असताना महेश ला खूप ताकद लाऊन गाडी चालवावी लागत असल्याचे जाणवत होते.लगेचच त्याने ओळखले ह्या ५२ वर्षाच्या माणसाने इंजिन मध्ये खूप काही प्रयोग केले असणार.माणसाने किती सर्किट असावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याचे साहेब डी.के असे त्याला वाटू लागले.मर्सिडीज वर कुणाच्या ####**** ने देखील प्रयोग केले होते का असे महेश मनातल्या मनात म्हणत होता.
गाडी ने आता वेग पकडला होता.गाडी कराड जवळ आली.कराड जवळ आल्यावर साहेबांनी महेश ला गाडीच्या काचा खाली घ्यायला सांगितल्या आणि साताऱ्याजवळ असलेल्या रजतात्रे ह्या हॉटेल जवळ गाडी थांबवण्यास सांगितले.महेश ने काच खाली घेतली.काही वेळाने साहेबांनी गाडीमध्ये असलेला रेडीओ बंद करण्यास सांगितले.काही वेळाने साहेबांनी त्यांच्या जवळ असलेला टेप सुरु केला आणि त्यांचे आवडते गाणे “मे जिंदगी का साथ निभाता चला गया...’’ लावले आणि ते गुणगुणत त्यांच्या जवळ अत्यंत महागडी असलेली चिलीम ओढण्यास सुरु केली  आणि चेहरा निर्विकार करून विचार करत साहेब बसले.गाडी मध्ये ए.सी असतानाही तो बंद करून काचा खाली घेणे,गाडी मध्ये इम्पोर्टेड रेडीओ असतानाही स्वतःचा टेप लावणे ह्याला काय म्हणावे ह्या विचारात महेश पडला.
काही वेळाने पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झाली आणि पाण्याचे थेंब आता गाडीत पडू लागले.मग साहेबांनी त्यांनी प्रयोग केलेल्या गाडीच्या वरच्या भागात असलेल्या ओपन एअर चा भाग लहानश्या स्लायडिंग दरवाज्याने बंद केला.
एव्हाना गाडी साताऱ्याजवळ आली होती.अचानक स्वतःजवळ असलेला टेप बंद करून साहेबांनी स्वतःच मायकेल jackson चे इंग्रजी गाणे “Thrillar rise” म्हणायला सुरवात केली.ते गाणी ऐकून महेश मनातल्या मनात म्हणत होता हा माणूस स्वतःला अष्टपैलू समजतो काय...?
गाडी साताऱ्याजवळ रजतात्रे हॉटेल जवळ थांबली.सकाळचे ७.४५ वाजले होते.हॉटेल ला फारशी गर्दी दिसत नव्हती.दोघांना बसण्यास जागा लगेचच मिळाली.वेटर पळतपळत आला.दोघांनी ऑर्डर देण्यास सुरवात केली.
डी.के साहेब,’’एक डोसा,इडली,पोहे,उपीट,ब्रेड बटर आणि एक कप कॉफी.’’
वेटर ऑर्डर लिहून घेत होता.
महेश ने काहीच ऑर्डर दिला नाही.
‘’अरे महेश,तुला काही भूक नाही का?ऑर्डर दे की..’’
“साहेब,आत्ता तुम्ही दिली ना...’’
‘’अरे,ती माझी ऑर्डर होती.’’
साहेब निर्विकारपणे महेश ला सांगत होते आणि महेश ला विचित्रपणाचे धक्केवर धक्के बसू लागले.
तब्बल अर्ध्या तासाने डी.के साहेब आणि महेश पोट भरून बाहेर पडले आणि पुढे निघाले.
सकाळी १०.५५ ला दोघेही पुण्यात पोहोचले.साहेबांची दुपारी १.३० ला मिटिंग असल्याने दोघेही लवकर पोहोचले.मिटिंग ची सर्व कागदपत्रे आणि महत्वाच्या फाईल्स डी.के साहेबांच्या कोथरूड ला असणार्या flat मध्ये होते.दोघेही कोथरूड ला पोहोचले.नळ stop जवळ असलेल्या घराजवळ दोघेही पोहोचले.दोघेही गाडीतून खाली उतरले आणि जिने चढून flat च्या दिशेने जाऊ लागले.पहिल्या मजल्यावर असलेल्या flat च्या जवळ दोघे पोहोचतात तेवढ्यात
‘’ अर्रर्र...मी घराची किल्ली इचलकरंजी ला विसरलो.एक काम करू,मी थांबतो आणि मिटिंग ची वेळ उद्याची घेतो तेवढ्यात तू इचलकरंजी ला जा आणि किल्ली आण.’’
महेश मनातल्या मनात राग ठेवून आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत बाहेर पडतो आणि गाडी मध्ये बसतो.त्याच्याबरोबर त्याचे साहेब पण गाडीजवळ येतात.महेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते.तो लगेचच गाडीला स्टार्टर मारतो आणि इचलकरंजी ला निघतो.
हाथ-पाय आपटत आणि दात-ओठ खात महेश निघाला असतो.त्याच्या आज सहनशक्तीचा अंत झालेला असतो.८० च्या वेगाने तो रागारागाने पाय आपटत निघाला असतो.एव्हाना तो शिरवळ पास करून साताऱ्याच्या दिशेने निघाला असतो.शिरवळ पास करून तो खंबाटकी घाटात पोहोचतो.तेवढ्यात त्याला डी.के साहेबांचा फोन येतो.
“महेश, कुठे आहेस आत्ता?’’
“मी शिरवळ पास केले आहे.”
“अरे...दुसरी किल्ली मिळाली.माझ्या पाकिटात होती.तू परत ये पुण्याला’’.
फोन आल्यावर महेश लगेचच गाडी थांबवतो.गाडीच्या बाहेर उतरतो.दुपारचे १२.१५ वाजले असतात.रागारागाने तो त्याच्या साहेबांच्या गाडीच्या टायरवर दोन-तीन दणके देतो आणि लगेचच गाडी स्टार्ट करून परत पुण्याला निघतो....

©
KAUSHIK

Thursday, 7 June 2018

Book Review:-Sandeha; Writer:-Shri.Ratnakar Matkari

I think that I am Shreenath…. I still think so… From within we are one and the same. Sometimes he uses the mask with my name while at others I do to fool people.’ A jeep passed by speedily and very closely. It would have brushed up. ‘They are out to kill us!’ the terror in Shreenath’s voice was unmistakable. ‘They are out to kill us! Is this some kind of game that destiny is playing with us? What will the destiny do? It wants to kill us together; both the original and the duplicate. What is going to happen now? We three are set upon the journey. Where...? No one knows. How long...? Who knows... We are the puppets of the destiny. Destiny will now watch us mere closely.

Ten breathtaking stories! Each one creating doubt beyond imagination which kicks up the tension. Ten stories that would really create doubt! Shaded with games played by human minds and emotions these stories take us to an immeasurable height. Matkari has once again proved that his stories are not just entertaining or pleasing. They take us beyond that where it is impossible to comprehend. They are terribly frightful and mysterious. These ten stories have proved once again his command over the words,mystery and ideas. Stories are an excellent combination of humour, thrill, mystery which finally turns out biggest twist to the story.

unlimited stars

Kaushik
©

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...