Saturday, 27 January 2018

Film Review:Padmavat

प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे मोर्चा वळवला.तेराव्या  शतकातली पूर्ण कथा आहे. मेवाड चे महाराज राजा रतन सिंग ह्यांची शिकारीच्या दरम्यान राणी पद्मावतीची भेट होते. नैसर्गिक सौंदर्याची भरभरून देणगी असलेली राणी पद्मावती राजा रतन सिंग ह्यांच्याबरोबर विवाह करून  चित्तोर ला येते. दिल्ली मध्ये असलेला अत्यंत क्रूर असा अल्लाउद्दीन खिलजी च्या कानावर राणी पद्मावती च्या सौंदर्याबद्दल बातमी पोहोचते. अत्यंत क्रूर आणि प्रत्येक गोष्टीची  हाव सुटलेला असा अल्लाउद्दीन खिलजी राणी पद्मावती ला भेटण्यासाठी मेवाड कडे कूच करतो आणि युद्धाची सुरवात होते.अभिनयाच्या बाबतीमध्ये रणवीर सिंग जिंकला आहे. क्रूर आणि महाभयंकर असा  खिलजी  त्याने पूर्णपणे  झोकून देऊन पडद्यावर उतरवला आहे.शाहिद कपूर देखील मेवाड चा राजा च्या भूमिकेत उत्तम फिट्ट बसला आहे.दीपिका ने राणी पद्मावती ला आपल्या पूर्णपणे देहबोली मध्ये आणि अभिनयामध्ये तंतोतंत उतरवले आहे. तिचा अभिनय शेवटपर्येंत थेट परिणाम कारक ठरतो. 
आता काही खटकणाऱ्या गोष्टी 
१. चित्रपटाच्या सुरवातीला एक चित्रविचित्र पक्षी येतो जो पाहून पोट धरून हसू येते. 
२. पूर्ण सिनेमा हिंदी मध्ये असताना त्यात काही मराठी शब्द घुसवण्याचा केलेला प्रयत्न... 
३. काही प्रसंगांमध्ये तर सिनेमाची कथाच  बेपत्ता होते. 
४. VFX,Special Effects हे जरा ओरिजिनल वाटले असते तर कथेमध्ये अजून फुंकर मारता आली असती. २०१७ ला आलेल्या एका मेगा ब्लॉक बास्टर च्या सिनेमाच्या VFX ची पद्धत आहे अशी उचलण्याची काय गरज होती?
५. गाण्यांची गरज होती का... 
६. संगीत अजून चांगलं होऊ शकलं असतं जर ते दुसऱ्या संगीतकाराने जर का दिले असतं तर... 
काही जमलेल्या गोष्टी 
१. भव्यता 
२. Cinematography
३.तिन्ही कलाकारांचा अभिनय विशेषतः दीपिका ने पूर्ण बाजी मारली आहे. 
४. राणी पद्मिनी आणि समस्त राजपुतांचा गौरव. 
सिनेमा पूर्ण पाहून झाल्यावर मला एक म्हण आठवली.Engineering च्या भाषेत ''Quality comes first''सर्व क्षेत्रात ही  म्हण प्रचिलित आहे.कुठल्याही परिस्थितीमध्ये दर्जा(Quality) ह्या गोष्टीची आपण तडजोड करता कामा नये.Quality शी तडजोड केली की Product चे काय होते ह्याचा अनुभव मी नुकताच सिनेमा हॉल मध्ये घेतला. 
दर्जा:-पाहायचा असेल तर पहा नाहीतर नका पाहू. 
समीक्षण:-कौशिक
©

Friday, 26 January 2018

Book Review:-Dubhang,पुस्तक परीक्षण:-दुभंग लेखिका:-स्नेहल क्षत्रिय



राधिका देसाई ह्या तरुण मुलीच्या आयुष्यावर पूर्ण कथानक  फिरते.शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या राधिकाचे खासगी आयुष्य मात्र अनेक प्रश्नांनी घेरलेले असते.घरच्या अनेक रूढी परंपरेत आणि बंधनात ती पूर्णपणे खचून गेलेली  असते.चित्रकार असलेल्या राधिकाच्या कलेवर आणि जगण्यावर बऱ्याचदा घरातून बंधनं येऊ लागतात.घरच्या बंधनात ती अक्षरशः स्वतःची ओळख आणि स्वतंत्र गमावून बसते.उभरत्या वयामध्ये मिळणाऱ्या फ्रीडम वर बंधनं येत असल्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागतो.फ्रीडम च्या शोधात असलेल्या आणि बंधनाचे जाळे तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या राधिकाच्या आयुष्यात हिमांशू चे पदार्पण होते. लेखक असलेला हिमांशू आणि चित्रकार असलेली राधिका ह्यांच्यात छान मैत्री चे नाते जमते. मैत्रीच्या पुढे नाते जात असताना राधिका एका वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकून बसते.फारसे नाव न ऐकलेल्या  आजाराचा राधिकाला सामना करावा लागतो.हा आजार तिची कसोटी पाहणारा ठरतो.ह्या न ऐकलेल्या आजारापासून डॉक्टर हेमंत(राधिकाचे फॅमिली डॉक्टर ),समीर कारखानीस(राधिकाचा बालमित्र ),मॉडर्न ईशा(राधिकाची मैत्रीण) राधिकाला पूर्णपणे बाहेर काढतात. नेव्ही ऑफिसर असलेल्या समीर आणि राधिका ह्यांच्यात तिच्या आजारादरम्यान  मैत्रीच्या ही पुढे नाते निर्माण होऊ लागते.मुलींवर घरातून येणारे दडपण आणि रूढी बंधनं ह्यावर कथेमध्ये प्रखर प्रकाश टाकण्यात आला आहे.राधिका ची मानसिक अवस्था आणि  भावना अतिशय पॉवरफुल पद्धतीने मांडल्या आहेत.पूर्ण कथेमध्ये राधिकाच्या भावनांचे जब्राट पद्धतीने सादरीकरण केले आहे.पारंपरिक विचारांचे असलेले तिच्या वडिलांचा आणि भावाचा तिच्यावर असणारा बंधनांचा दरारा,राधिकाला पुरुषांबद्दल वाटणाऱ्या भावना रोखठोक पद्धतीने मांडल्या आहेत.कोण होता हिमांशू?काय आहे हा विचित्र आजार ?कोण आहे समीर कारखानीस?
माझ्याकडून ****
लेखन:-कौशिक 
इचलकरंजी 
©
लेखिका:-स्नेहल क्षत्रिय 
उपलब्ध :-ऍमेझॉन किंडल,बुकहंगामा.कॉम 

Thursday, 25 January 2018

पुस्तक परीक्षण :-फाशी बखळ ; लेखक:रत्नाकर मतकरी


सदरच्या पुस्तकाच्या कथा ह्या रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांच्या कथांशी जराही relate होत नाहीत .सर्व च्या सर्व कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत.प्रत्येक गूढकथेला मानवी कंगोरे दिले गेले आहेत. सर्व च्या सर्व कथा भीषण ,करुण ,गूढ ,भयंकर अश्या भावनांनी भरलेल्या आहेत. प्रत्येक कथेचे स्वतःचे अस्तित्व आहे. काही कथांमध्ये कल्पनाशक्तीचा कहर म्हणजे काय असतो ह्याचा पुरेपूर अनुभव येतो.
शेवटची बस ह्या कथेचा शेवटच्या टोकाला येणारा ट्विस्ट,फाशी बखळ ह्या कथेमध्ये बोचणारी भीती,फँटॅस्टिक ह्या कथेमधील फँटसी... सर्व च्या सर्व कथा सर्व तरुण कथाकारांना आणि स्टोरीटेलरना जणू मुक्त विद्यापीठ आहे. मानवी निरीक्षण आणि मानसशास्त्र ह्यावर आधारित कथा सुद्धा किती दर्जेदार असू शकतात हे आपल्याला कथा वाचून कळते.
*****
कौशिक 
इचलकरंजी 
लेखक:-रत्नाकर मतकरी 
उपलब्ध:-ऍमेझॉन,बुकगंगा आणि ऑफलाईन बुक स्टोअर्स . 

Sunday, 14 January 2018

Book Review:-Bombay Beats;पुस्तक परीक्षण:-बॉम्बे बिट्स

सदर पुस्तकाची कथा ही  तीन तरुण मुलींच्या आयुष्याभोवती फिरते.सई,इरा,ग्रेष्मा ह्या तिघीजणी आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबई मध्ये येतात.सई डॉक्टर होण्यासाठी धडपडत असते;इरा पत्रकारितेमध्ये नाव कमवण्यासाठी धडपडत असते;ग्रेष्मा ही सिनेअभिनेत्री होण्यासाठी धडपडत असते.योगायोगाने हा धडपडीचा  प्रवास ह्या तिघींना  एका छताखाली एकत्र घेऊन येतो.एकमेकींच्या अगदी अनोळखी असणाऱ्या सई ,इरा ,ग्रेष्मा  काळाच्या ओघात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतात. हा मैत्रीच्या  प्रवासामध्ये  तिघी आपआपल्या  ध्येयाच्या दिशेने कूच करत आपले ध्येय  पूर्ण करतात.कथेमध्ये प्रत्येक पात्र प्रचंड ताकदीचं आहे.तिघींचा आपले ध्येय साध्य करण्याचा प्रवास अतिशय भावनात्मक पद्धतीने मांडला आहे.त्यांच्या प्रवासामध्ये येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांना सामोरे जात असताना त्यांच्या होणारा भावनिक कोंडमारा भावनेच्या पलीकडे जाऊन मांडला आहे. पुस्तक वाचत असताना काही प्रसंगांमध्ये Dr. Vibha हे पात्र आपली प्रेमाची परिभाषा पार बदलून टाकते आणि वाचणाऱ्याला स्वतःच्या प्रेमात पाडते. मॉडर्न गर्ल ग्रेष्मा,बेधडक स्वभावाची इरा आणि डॉक्टर असणारी सई ह्या तिघीही सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत वाचकांच्या नजरेत भरतात. कथा काही बाबतीत सामाजिक विषयांवर देखील वाचकांचे चिमटे काढते.हे विषय  वाचून आपल्याला थोडेचे अस्वस्थ वाटत राहते.पुस्तकातील सर्व पात्र सई,इरा,ग्रेष्मा,अलोक,विभा,विक्रम आपापल्या जागेमध्ये फिट्ट बसतात.पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर वाचक सर्व पात्रांच्या विशेषतः मुंबई शहराच्या आणि स्वतःच्या स्वप्नांच्या प्रेमात नक्की पडतात.
कथेसाठी माझ्याकडून 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
माझ्याकडून पुस्तकाला Distinction.
लेखक:-भाग्यश्री भोसेकर-बिडकर
संपर्क:-Facebook
Book Source:-Amazon Kindle
Reviewer:-Kaushik
©


Saturday, 13 January 2018

Film Review:-ये रे ये रे पैसा ...Director:-Sanjay Jadhav


Solid entertainers in the Marathi Film industry can be counted on your fingertips.2017 was not great year for Marathi Film Industry. But 2018 January has filled certain gap of 2017 and Ye Re Ye Re Paisa fills it.
The Sanjay Jadhav directorial is star-studded and largely delivers on its promise of being a complete entertainer. 
Aditya (Umesh Kamat) and Babli (Tejaswini Pandit) are strugglers who are willing to make big name in film industry while Sunny (Siddharth Jadhav) is a ticket-seller at a cinema hall. Anna (Sanjay Narvekar) is a agent who happens to receive a payment of Rs 20 crore but ends up losing all the money to these three. This begins chasing for money.
Film mainly works because of good direction and performances. Siddharth and Sanjay are master owners of their scenes.There is special shouts for Umesh Kamat and Tejaswini.Also there is surprise role of  Mrunal Kulkarni which could have been better. Surprisingly at certain stage director tries to copy Rohit Shetty's style which was not at all necessary.
In case there are some illogical scenes but film is entertaining and most happiest thing was that theatre was housefull for Ye re Ye re Paisa.
3 Stars
Reviewer:-Kaushik
All rights reserved.

Monday, 25 December 2017

Film review-Tiger Zinda hai

He is back again and probably he has not disappointed at all.Tiger Zinda hai is full of bunch of actions and bullets and machine guns and Salmanism....Film is based on some true incidents from Syria where team of nurses is kidnapped by powerful organization from Syria.Mission is planned by RAW to release these nurses from Syria under authority of Tiger (Salman).Story is impressive and doesn't look unrealistic.Chase sequences are superb.In state of surprise Katrina has acted very well.....Cinematography is at highest peak in movie.It will remind us disasterous situation from Syria.Salman will never let you down.Some sequences don't make any sense where Salman is carrying heavy loaded gun full of magazines just as toy.But he roars till end.
Don't think too much.... enjoy Salmanic roar.....
4 stars
Kaushik
All rights reserved

Thursday, 21 December 2017

Book Review:-निर्मनुष्य, Writer:-Ratnakar Matkari

सदर कथांमध्ये गूढता आणि मानसशास्त्र ह्यांचे उत्तम मिश्रण आहे. सर्व कथा ह्या मानसशास्त्र(Human Psychology) आणि वास्तवता ह्यावर आधारित आहेत.निर्मनुष्य,शनचरी,प्रार्थना ह्या कथा अंगावर भीतीने गारठून येतात. सर्व कथांमध्ये वास्तवतेवर उभारलेले जग आणि उत्कंठा  वाढवणारी भीती  ह्यांच्याबरोबर पात्रांना मिळणारा अंतिम न्याय ह्यांचे उत्तम विश्व साकारलेले आहे.प्रत्येक कथा वाचकाला वास्तवातून उठवून वेगळ्या अनामिक,गूढ,भयप्रद प्रदेशात घेऊन जातात जिथे वाचक झपाटल्यासारखा प्रत्येक पान आणि पान उलटत जातो... प्रत्येक कथांमधून मानवी जीवनावर काही प्रमाणात भाष्य केले गेले आहे.सर्व चा सर्व कथा ह्या तरुण लेखकांसाठी कथालेखन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण आहेत.
*****
लेखन:-कौशिक
©
Ichalkaranji
21.12.2017.

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...