Monday, 26 December 2016

इंजिनीरिंग

माझा दिवस रोज सकाळी ६. ०० ला सुरु होतो . सकाळी निद्रेतून बाहेर आल्यावर सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स ,टाइम्स ऑफ इंडिया वाचल्याशिवाय दिवसाची सुरवात सध्या कुणाचीच होत नाही . सकाळ व महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी सध्याच्या बातम्या ,आर्थिक बातम्या ,नोकरीच्या बातम्या वाचत होतो . पेपर वाचत असताना काही बातम्या माझे लक्ष वेधून घेत होत्या . कमी होत असलेल्या नोकऱ्या ,चालू असलेली जागतिक मंदी ,तडकाफडकी काढून टाकलेले इंजिनिअर ,ह्या  बातम्यांनी सध्या दिवस सुरु होत होता . आणखी एका बातमीने मला अस्वस्थ केले . सकाळ मध्ये पहिल्या पानावर एका दुसऱ्या वर्षी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने नस कापलेली बातमी होती व टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एका तिसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिल्डिंग  वरून उडी मारलेली बातमी होती . हि बातमी वाचून  माझ्या काळजात धस्स झाले . मी चहा बाजूला ठेवला व पूर्ण बातमी वाचली . हे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीरिंग ला शिकणारे होते  . सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले असल्याने मला  हायसे वाटले . त्यांनी एवढ्या टोकाचा  घेतलेला निर्णय ह्यामागचे कारण होते त्यांना शिक्षणात आलेले अपयश .हे कारण वाचल्यावर मला त्या दोघांचा खूप राग आला . त्यांनी का आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला ?ते नर्वस होते का ?त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम नव्हते ?त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हेच सर्वोच्च  मानले ?

ह्या नकारात्मक बातम्या वाचून मी पुढे पेपर वाचन केले नाही . मी चहा पिऊन आवरलो व सॅक घेऊन सकाळी ६.३० ला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो . जिम ला  जाताना मी विचार करत होतो . मला त्या दोन मुलांची दया आली . अपयश पचवायची त्यांच्यात हिम्मतच  नव्हतीच का ?त्यांच्याकडे कुणी शिक्षकांनी लक्ष का नाही दिले ?त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असणार  ?एवढ्या टोकाला जायचे काय कारण होते ?

मला माझं मेकॅनिकल इंजिनीरिंग चे दिवस आठवले . मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी तीनदा नापास झालो होतो . बऱ्याचदा मला काही ठराविक शिक्षकांनी बोलून बोलून माझे जोरदार
खच्चीकरण  करत होते .तोंडी परीक्षण च्या वेळेस बऱ्याचदा मला तोंडावर अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागले होते . मी नापास झाल्यावर माझ्यावर झालेला त्याचा नकारात्मक परिणाम  मी अनुभवला आहे ,नापास होणे म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हा करणे असे हावभाव असलेले चेहरे मी पाहिले आहेत .माझ्या कॉलेज च्या एक सिनियर शिक्षकाने मला शिक्षण पूर्ण करण्याचे थेट आव्हान दिले होते . पण ह्या सर्व गोष्टीना मी पुरून उठलो व माझा शिक्षण हे फर्स्ट क्लास नि पूर्ण झाले . ह्या सर्व माझं खचीकरण करणार्यांना मी खोटे ठरवले व निव्वळ जिद्दीवर माझं शिक्षण पूर्ण झाले होते . 
इंजिनीरिंग हे कधीच सोप्पे नसते व कधीच अवघड नसते व कुणीही इंजिनीरिंग गृहीत धरून चालू नये . नस कापणे,आत्महत्या करणे हा समस्यांवर उपाय नाही . आपल्या आयुष्यात यश अपयश व नोकरी कधीच कायमची नसतात . नापास होणे हे नैसर्गिक आहे . जो माणूस काम करतो तोच अपयशी होती . स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास असल्यावर ह्या जगात अशक्य असे काही नाही . कुणी हुशार नसतो व कुणी ढ नसतो सर्वाना समान बुद्धिमत्ता असते . शिक्षण घेताना किंवा नोकरी करताना अपयश येणार ते कुणी टाळू शकत नाही पण तेच अपयश पचवून धक्के खाऊन जो पुढे जात राहतो तोच नंतर जिंकतो .मला शिक्षण पूर्ण करायचेच होते त्यामुळे सर्व आलेल्या धक्क्यांना पुरून उठून पुढे जात राहिलो व ३ डिग्री पूर्ण करून स्वतःच्या नजरेत मी कधीच अपयशी झालो नाही . अंगात जिंकण्याचा किडा असल्यावर येणाऱ्या अपयशाने आपण कधीच खचून जात नाही . मी विचार केला आता हि दोन मुले काय करणार ?त्यांच्या आई वडिलांना काय वाटणार ?त्यांना धीर कोण देणार ?आता येणाऱ्या टोमण्यांना ते कसे तोंड देणार ?
मी तळवलकर ला पोचलो . हे जिम माझे आवडते आहे . मी माझा पोशाख बदलून थेट जिम Floor ला  गेलो . तिथे असलेले काही सुविचार मला उत्साहित करीत होते . 
''I am neither clever, nor intelligent but i am successful bcoz i kept going and going and going'.
''Every champion was once contendor who refused to give up''
हॉलिवूड च्या रॉकी सिनेमाची हे सुविचार अनुभवाचे बोल होते . असे सुविचार आपला दिवस नक्कीच आशादायी करतात . मी मनातल्या मनात प्रार्थना केली ती दोन मुले सुखरूप असतील व मी  रॉकी बाल्बोआ  च्या गाण्यावर वोर्क आऊट ला सुरवात केली . 

Rising up, back on the street

Did my time, took my chances

Went the distance, now I'm back on my feet

Just a man and his will to survive

So many times it happens too fast

You trade your passion for glory

Don't lose your grip on the dreams of the past

You must fight just to keep them alive

It's the eye of the tiger

It's the thrill of the fight

Rising up to the challenge of our rival


लेखन -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३
©

Friday, 23 December 2016

सिने परीक्षण -दंगल

आमिर खान एक अष्टपैलू कलाकार व हिंदी सिनेमा च एक अजब रसायन व सिनेमाचं विद्यापीठ .!!तब्बल २ वर्षांनी ह्या अष्टपैलू कलाकाराचा सिनेमा पाहायचा योग आला आणि प्रतिवर्षी प्रमाणे हाही सिनेमा आपल्या अपेक्षा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरतो  . सिनेमा ची कथा सुरु आहे तरुण असलेला कुस्तीपटू महावीर फोगत (आमिर खान) व त्यांचे  कुस्ती प्रेम ह्या २ गोष्टींभवती फिरते . ऐन उमेदीचा काळात अत्यंत चिकट व तडफदार असलेला महावीर फोगट ना काही कारणास्तव कुस्ती सोडावी लागते  व त्यांचे गोल्ड मेडल जिंकायचे स्वप्न भंगते .कुस्ती ला सर्वस्व मानणारे व भारतासाठी गोल्ड मेडल चे स्वप्न असलेले महावीर फोगट कालांतरानंतर हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढी कडून  पूर्ण करून घ्यायचे ठरवतात . पण  मुली असल्याने त्या  हे स्वप्न पूर्ण करू शकतील काय हि शंका महावीर ह्यांना सतावते . पण एका प्रसंगामुळे महावीर ह्यांचा आपल्या मुलींवर विश्वास बसतो व ते आपल्या मुलींना कुस्ती साठी बालपणापासून तयार करायला सुरु करतात . पण मुली असल्याने मुलं /मुली अश्या भेदाला त्यांना सामोरे जावे लागते . कुस्ती हि पुरुषांची मक्तेदारी असल्याने ती मुलींना जमेल काय ? हा असलेला गैरसमज व भेद महावीर फोगत ह्यांच्या मुली गीता व बबिता (सानिया मल्होत्रा व फातिमा शेख )ह्या खोडून काढतात व त्या कुस्तीमध्ये प्रत्येक लेवल ला पदक जिंकतात . पण गोल्ड मेडल जिंकायचे असलेल स्वप्न हे गीता(फातिमा  ) पूर्ण करते . सिनेमा ची कथा हि वडील व मुलींचे असलेलं हळुवार नाते ह्यावर प्रकाश टाकते . अखेर हा आमिर खान चा सिनेमा आहे त्यामुळे सुरवातीपासून फक्त आमिर खान ह्या नावाचा काय प्रभाव आहे हे जाणवत राहते . एक तरुण कुस्तीपटू ते २ मुलींचा पिता हा बदल थेटर मधेच जाऊन पाहावा . एक अभिनेता आपली भूमिका व अभिनय करण्यासाठी कसे अपार कष्ट घेतो हे पदोपदी जाणवते. Best or Nothing हा नियम वापरल्यास काही अशक्य नाही हे आमिर खान दाखवून देतो . गीता (फातिमा  )चा अभिनय हा देखील वाखाणण्याजोगा  आहे . सिनेमा ची कथा आपल्याला पूर्ण कुस्ती ह्या खेळामध्ये गुंतवून ठेवते व कुस्ती न पसंद करण्याऱ्यांना हा सिनेमा पाहताना कुस्तीची मनापासून आवड निर्माण होते .काही मिनिटे अभिनय केलेले गिरीश कुलकर्णी आपली छाप पडतात . आमिर खान ह्या  सर्वोत्कृष्ठ कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी व आपले शरीरावर प्रेम करण्याऱ्या कुस्तीपटूंनी व आपले वजन वाढलेले असताना ते कमी देखील होऊ शकते हे पाहण्यासाठी नक्की एका नाही दोनदा हा सिनेमा पहाच .
***** ५ स्टार्स 
लेखन -कौशिक श्रोत्री 
संपर्क -९९२१४५५४५३

Wednesday, 21 December 2016

नोटबंदी

८ नोव्हेंबर २०१६ हि तारीख भारताच्या इतिहासात गणली जाईल .ह्याच दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी ५०० व १००० च्या नोटा ह्या भारतीय चलनातून रद्द होणार अशी अधिकृत घोषणा केली .अर्थव्यस्थेत असलेला काळा पैसे बाहेर काढण्यासाठी व अर्थव्यस्था नोटावीररहित करण्यासाठी घेतलेलं   ह्या निर्णयाने भारतीय अर्थकारण हे पूर्णपणे बदलून जाणार होते . असा हा धडाकेबाज निर्णय भारतीय जनतेने पहिल्या वेळेस पहिला .असा धडाकेबाज निर्णय भारतात घेतले जाऊ शकतात ह्यावर भारतीय जनतेचा विश्वास बसू लागला . ह्या निर्णयाने पूर्ण देशभरात काही ठिकाणी कौतुक,उत्साह,स्वागत  व काही ठिकाणी हाहाकार,विरोध होत होता . हा निर्णय झाल्यावर जनतेला ३ महिने ५०० व १००० च्या नोटा जमा करायची मुदत देण्यात आली . ह्या निर्णयाने नक्कीच एका नवीन पर्वाची सुरवात होणार होती. ATM व बँकेतून पैसे काढण्यावर काही अंशी बंदी आली . ९ नोव्हेंबर पासून हा निर्णय अमलात आल्यावर मी १५ नोव्हेंबर ला idbi बँकेत १०० च्या नोटा घेण्यास गेलो . तिथे प्रचंड गर्दी होत होती . ५०० व १००० च्या नोटबंदीनंतर २००० ची नवीन नोट येणार होती . त्यामुळे मला १०० च्या नोटा घेण्यास गत्यंतर नव्हता . मी रांगेत उभा राहिलो . रांगेत उभा असताना मला तिथे आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या . 
सोने चांदी व्यापारी ,''हे सध्याचे सरकार म्हणजे काय करेल नेम नाही . ह्या सरकारने टप्पाटप्प्याने निर्णय घेतला असता तर खूप चांगले झाला असते .ह्यांनी जर आधी सर्वाना सूचना केल्या असत्या की १००० व ५०० च्या नोटा आम्ही ह्या महिन्याअखेर बंद करणार आहोत तर आम्हाला पुढचे नियोजन करता आले असते . आमचा व्यवसाय पूर्ण शांत झाला आहे  .त्यात आणि दिवसाला ४००० पैसे   बँकेतून काढण्याचे लिमिट आहे . ऐन सणासुदीच्या काळात जर गिर्हाईक नसेल तर  आम्हाला दुकानाला कुलूप घालावे लागेल.उद्या ह्यांनी सोने चांदी च्या बाबतीत निर्णय घेतल्यावर कल्याणच आहे आमच!!!! आधीचे सरकारच बरे असे वाटत आहे . ह्या निर्णयाने छोटे खानी सराफ व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे .

यंत्रमागधारक -''एक तर आम्ही आधीच अडचणीत आहोत त्यात आणि हि मोठी तलवार म्हणजे आम्हाला पण घरीच बसावे लागेल . आम्हाला आधीच वीजबिलाची अडचण ,कामगारांची अडचण ,मंदीचं वारा आणि हे आणि नवीन कॅशलेस म्हणजे आम्ही एक तर दुसऱ्या देशात जावे किंवा दुसरा व्यवसाय करावा ''.  

मी,''ह्या सरकारचा हा निर्णय घेण्यामागे हेतू अतिशय प्रामाणिक व स्पष्ट आहे . सर्व काळा पैसे ,भ्रष्टचार ,दहशतवाद थांबवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नक्षलवादी ,स्मुग्लर ,दहशतवादी ,दंगलखोर ह्यांचा आर्थिक पुरवठा ५०० व १००० च्या नोटांवर होता तो ह्या निर्णयाने पूर्ण थांबणार आहे . इनकम टॅक्स लपवणारे व अमली पदार्थ व्यावसायिक ह्यांचा पतपुरवठा पूर्णपणे थांबून हा सर्व पैसे उजेडात येणार आहे . हा निर्णय आल्यापासून जम्मू काश्मीर ची परिस्तिथी पूर्ण पणे शांत आहे   जे लोक आपल्या जवानांवर दगडफेक करत होती ते पूर्णपणे थांबले आहे''. 

कॉलेज ची विद्यार्थिनी ,''तरी पण असे अचानक निर्णय घेऊन सरकारने काय साधले ?इथे मला अभ्यास सोडून इथे रांगेत पैसे काढण्यासाठी उभे राहावे लागत आहे . बाहेर एक हा हि ATM  मध्ये १०० व ५० च्या नोटा नाहीत त्यात आणि ५०० च्या जुन्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत .मला  निर्णय पटत आहे पण वेळ व पद्धत चुकीची वाटत आहे . आता अजून ३ तास मला इथेच बसावे लागणार आहेत . 

वाहतूक व्यावसायिक ,'' आमची तर पूर्ती हजामत झाली आहे राव . एक तर आमचा व्यवसाय पूर्ण हा ५० टक्के रोखीवर चालतो . लांब पाल्याची वाहतुकीला आम्हाला ड्राइवरला काही रोख पैसे द्यावे लागतात . आता आमचे ड्राइवर लांब पाल्यावर गेले आहेत त्यांनी आता काय करावे अवघडच होऊन बसले आहे .कॅशलेस व्यवहार हा आम्हाला सुद्धा आवडेल उलट आमची आर्थिक कामे जास्तच सोप्पी होतील . त्यांच्याकडे असलेल्या ५०० च्या नोटांच त्यांनी काय करावे आता ?''हा व्यावसायिक बराच त्रस्त वाटत होता . 
जशी रंग पुढे सरकत होती तसं प्रतिक्रिया वाढत होत्या . माझ्या पुढे मागे असलेल्या काही लोक व एका कॉलेज विद्यार्थिनी मध्ये संवाद सुरु होते . त्यात आता बाकीचं लोक पण प्रतिक्रिया देत होते . 

इंजिनीरिंग व्यावसायिक - इथे आम्हाला जास्त त्रास झाला नाही . आमचे सर्व व्यवहार हे चेक व क्रेडिट वर होत असल्यामुळे व इंजिनीरिंग चा व्यवसाय असल्यामुळे जास्त त्रास जाणवला नाही . फक्त आम्ही ज्या कामगारांचे पगार रोखीने करतो ते करताना थोडा त्रास आम्हाला सहन करावा लागला बाकी आमच्या स्टाफ चे पगार थेट बँक अकाउंट मध्ये जमा होतात . पण ह्या निर्णयाने देश नक्की पुढे जाणार आहे . सोने चांदी व बांधकाम क्षेत्र ह्या २ व्यवसायांमध्ये वस्तूंच्या किमती ह्या खूप कमी होणार आहेत व त्याचा आपल्यालाच होणार आहे . सर्व बँक कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देतील कारण ह्या निर्णयाने बँकेमध्ये ५०० व १००० च्या प्रचंड नोटा जमा होत आहेत व व्याज दर देखील कमी होत आहेत . 

गृहिणी-घरात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे पगार कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे .घरात काम करणारे कामगार काय डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन फिरणार आहेत ??एवढे तरी समजायला हवे ह्या सरकारला त्यात आणि कहर म्हणजे २००० ची नोट हे सरकार बाजारात आणणार म्हणजे १०० आणि ५० रुपये च्या खरेदीसाठी आम्ही काय २००० ची नोट घेऊन फिरू काय ?कोणाकडे २००० चे सुटे पैसे असतात?उगीचच सरकारनं अमेरिका मधील कॅशलेस  पद्धत इथे मुळीच घेऊन येऊ नये. 
त्या गृहिणींचा रोकठोक संवाद ऐकून बऱ्याच जणांनी त्यांना दाद दिली . मला कॅश काउंटर वॉर जायला २ तास लागले .त्या वेळेमध्ये रांगेत उभे असलेले लोकांच्यात  अर्थव्यवस्था व कॅशलेस ह्या विषयावर खूप चर्चा चालू होती . कुणाला निर्णय आवडला कुणाला नाही आवडला कुणी त्याचा समर्थन केले . एक फरक मला जाणवला ८ नोव्हेंबर आधी मी जेव्हा बँक किंवा ATM मध्ये जात होतो तेव्हा पण थोडी गर्दी असायचे पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते . पुढे उभा असलेला माणसाला मागे कोण उभा आहे कल्पना पण नव्हते . पण ८ नोव्हेंबर नंतर समोरचा ओळखीचा नसला तरी त्याचाशी ५ शब्द लोक बोलत आहेत . नोटबंदी हा निर्णय ९०% लोकांना पटला होता फक्त त्याची अंमलबजावणी ची वेळ व पद्धत चुकीची आहे असा तिथे आलेल्या सर्वांचं म्हणणे होते .ह्या निर्णयाने कमी पैशामध्ये कसे जगावे ह्याचा देखील एक धडा मिळत होता .शेवट माझा कॅश काउंटर ला नंबर आला . मी १०० च्या नोटा मोजल्या व त्या माझ्या पाकिटात ठेवल्या व जाताना तिथे असलेल्या कॅशियर च्या चेहऱ्यावर असलेला तणाव पाहून त्याला एक मार्मिक हास्य दिले व बँकेतून बाहेर पडलो . 

लेखन -कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३







Sunday, 18 December 2016

सिने परीक्षण ROGUE STAR WARS

ह्या आठवड्यात मी STAR WARS च परीक्षण ना पाहता थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . एकंदर नावावरून ह्या सिनेमाची कथा हि उत्कृष्ट असणार अशी खात्री होती . माझ्या लेखन करिअर मध्ये सर्वप्रथम मी दिग्दर्शक व सिने अभिनेता ह्यांच्या कडे न पाहता व स्टार वॉर बद्दल जास्त माहिती नसताना थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . ह्या सिनेमाची सुरवात एका वैज्ञानिकाच्या(GALEN ERSO) आयुष्यापासून होती.एक अत्यंत हुशार असलेला वैज्ञानिकाच्या आयुष्यात एक वादळ येते . एका अंतराळ संस्था चा अध्यक्ष गॅलेन ला पळवून नेतो व आपल्या अत्यंत धोकादायक अश्या SHUTTLE तयार करतो जे पूर्ण एक ग्रह उध्वस्त करू पाहतो. त्याचा वापर करून अध्यक्ष जेधा नावाच एक गाव उध्वस्त करतो . नंतर ग्लेन ची मुलगी पुढे वडिलांचा वारसा पुढे न्हेत एक पायलट व एक मानवी अँड्रॉइड रोबोट व तिच्या मदतीने त्या अध्यक्षाला शोधून काढून बाहेर काढती व सिनेमा संपतो . सदरचा सिनेमा हा सुपरसॉनिक अंतराळ मधला आहे . सिनेमाच ऍनिमेशन व सिनेमॅटोग्राफी नक्की कौतुकास पात्र आहे . आधुनिक इलेक्ट्रॉनिक मधले अविष्कार व अंतराळ मधले गती व दिवा ची स्पर्धा दाखवतील . सदर सिनेमाची कथा हि पटकन उमजत नाही त्यामुळे नक्की काय चालू आहे हे समजायला सिनेमाचा शेवट येतो . मध्यंतरानंतर कथा सुमार होऊ लागते व आपल्याला कधी एकदा सिनेमा संपतो अशी जाणीव होते. फार काही खोलात न जात ज्यांना स्टार वॉर बद्दल माहिती आहे त्यांनीच हा सिनेमा पाहावा बाकीच्यांनी आपल्या मर्जीवर जावे .
१.५ स्टार
9921455453
लेखन -कौशिक श्रोत्री 
©



Friday, 25 November 2016

सिने परिक्षण -डिअर ज़िन्दगी

इंग्लिश विंग्लिश सिनेमा आठवतोय ???? काही वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता.गौरी शिंदे ह्यांच्या अफलातून दिग्दर्शनामुळे व् श्रीदेवी ह्यांच्या अभिनयामुळे सिनेमा प्रचंड गाजला होता. सध्या गौरी शिंदे ह्यांचा डिअर जिंदगी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे . बऱ्याच वर्षांनी गौरी शिंदे ह्यांचा सिनेमा येत असल्यामुळं त्याकडून अपेक्षा निश्चित होत्या व हा सिनेमा आपल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करतो.  सिनेमा च्या कथेची सुरवात होती कायरा (आलिया भट ) पासून जिच्या आयुष्याची उमेदीची सुरवात हि भरकटत जाते . मुळात एक सुशिक्षित व उत्साही असलेली कायरा ला आत्मविश्वास हा नसल्यामुळेतिचे ऐन उमेदीचे आयुष्य हे नियोजन न केल्यामुळे भरकटत जाते . सर्व गोष्टींमध्ये नकार हा बऱ्याच अंशी पचवता न आल्यामुळे व मॉडर्न विचारसरणी असल्यामुळे कायरा चा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक होऊन जातो .निराशा व चिडचिडेपणा नि ग्रासल्यानंतर व आयुष्य एका टोकाला गेल्यावर  तिला जहांगीर खान (शाहरुख खान ) हा मेंटॉर भेटतो. अत्यंत व्यावहारिक असलेला व प्रत्येक प्रश्नांची सहज उत्तर शोधणाऱ्या जहांगीर खान मुळे कायरा च्या  आयुष्याला हि पूर्ण कलाटणी मिळते . सिनेमा हा पूर्णपणे आजची तरुणमुले व मुली व त्यांची विचारसरणी ह्यांचे अतिशय उत्तमरीत्या मांडणी करतो . सिनेमा ची कथा हि अतिशय सरळ ,साधी व उत्कृष्ट रित्या मांडली आहे ज्यात कुठेही फिल्मी थिल्लरपणा व मसाला नाही . बऱ्याच वर्षांनी शाहरुख खान मधला अभिनेता उठून दिसला आहे . एका मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेला त्याने न्याय दिला आहे . सध्याच्या पिढीची आलिया भट्ट चा अभिनय हा सर्वोत्कृष्ट आहे . एक फॉरवर्ड,अल्लड,उत्साही व काही अंशी चिंतेने ग्रासलेल्या मुली चा अभिनय हा तिने अतिशय उत्कृष्टपणे केला आहे . सिनेमाच्या शेवटी तिचा मेंटॉर जहांगीर खान मुळे तिच्या आयुष्यात झालेला बदल, त्याला निरोप देताना तिचा अभिनय हा नक्कीच पाहण्याजोगा आहे . एका मुलीला कुटुंबाने सहकार्य केल्यावर ती काय करू शकते ह्यावर सिनेमा भाष्य करतो . संगीत हा सिनेमा चा आत्मा आहे . सर्व गाणी व पाश्वसंगीत अतिशय उत्कृष्ट आहेत व  पाश्वसंगीत हे  सिनेमाच्या आशयाशी बरोबर जुळून आले आहे . सिनेमा मध्ये कुणाल कपूर ,आदित्य रॉय कपूर व  अली जफर ह्यांचा अभिनय फक्त चेहरा दाखवण्यापुरताच आहे . आयुष्य हे खूप साधे व सरळ आहे ते सरळपणे मनसोक्त जगा व जगू द्या हा संदेश देण्याऱ्या एक साधा सरळ व आयुष्यावर असलेला सिनेमा नक्की पाहावा . 
३ मिरच्या 
परीक्षण - कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

Wednesday, 23 November 2016

Eye of the Tiger

 I came back to home with Burning Mind and Muscular Hands. I didn't have great day in an office. Private People are getting unsatisfied by satisfying customers since Customer is God. Today's Private sector is turned out as 80:20 Ratio of (Politics: Work) in small Industries. Little Urge with a Boss had lightened fire inside me. Patience and Sweetness in language will surely help you in such situations. Yet at young age it is difficult to handle such situations since we are not aware of it. Sudden Aggression can make situations Worst. I switched on TV to watch Rocky Series. I always watch movie twice a day on my desktop. Movies take away my Anger, Regression. I loved Sylvester Stallone as an Actor.  Rocky and Rambo Series is one of best series of movies of Sylvester. After switching On TV I began to have a punch on punching bag in my Room. This helps to light off fire inside you and surely helps you to calm down. I was watching Rocky 4. Larger than Life Elements of Movie, Underdog who keeps Fighting with Dragoon, Motivational words given by Tony Burton To Sylvester During Fights to keep Rocky’s Moral High caught my Attention. I watched Movie from start to end. Rise of Rocky as Winner even after losing initial rounds in boxing match Kicked my Butt. We (Youngsters) are facing situations when our talent is not recognized by C.E.O, Plant Head, Senior Persons due to Insecurity and Politics. We even get frustrated many times at Office Premises. Even at many hard times we think to have some punches to senior guys. Surely this is not the answer. Many times Talented People are kept aside in Private Sector and People who pretend to work are promoted ahead. We are not taught in school a topic how to deal with a people. Many times our Confidence and moral is not awarded by seniors. During such situations don’t get tensed and frustrated. We are guys gifted with Equal Talents and Equal Opportunities.  As said by Rocky,'' If you know what your worth then go out and get that worth'' when a guy has a talent it will definitely come to face of world. Private Sector is a Boxing Match you will get different kinds of Hard Punches on Daily Basis. Don’t get blown away by such punches. Your Senior Person is just a man he is not Machine. People who are insure pretend to pressurize there juniors. Do not forget “When you're scared, when you're hanging on, when life is hurting you, then you're going to see what you're really made of.".

This is life where you will be meeting people who will pressurize you, screw you, throw you, frustrate you, and dominate you. You will fail; loose job but your ability to get HIT by these things and keep moving forward will surely make you at the end WINNER. 
Written by- Kaushik Shrotri
9921455453
©

Saturday, 19 November 2016

सिने परीक्षण -फोर्स २

मागच्या आठवड्यात ११ नोव्हेंबर ला रॉक ऑन २ सिनेमा आला होता आता फोर्स २ आला आहे . एखाद्या सिनेमा चा २रा भाग बनवताना बऱ्याचदा कथेवर जास्त लक्ष दिले जात नाही . सध्या प्रदर्शित झालेला फोर्स २ च्या बाबतीत असेच काही अंश पाहायला मिळते .२०११ ला आलेला फोर्स चा हा २रा भाग . सिनेमा ची सुरवात होती ACP यशवर्धन (जॉन अब्राहम ) च्या पिळदार,८ बिस्कीट असलेल्या दणकट ,४ चाकी वाहन व बुलेट दोन्ही हातानी कवेत घेणाऱ्या शरीराने जे पाहताच आपल्यात शरीर तंदुरुस्ती ची जागरूकता परत निर्माण होते व जिम ला न जाणारे मुले परत जिम ला जायचा विचार करायला लागतात . भारतीय गुप्तहेर संघटनेचा  एक गुप्तहेर असलेला यशवर्धन ला त्याच्या साथिदारांच्या अचानक बेपत्ता होणे हि बातमी समजते . त्याच्या शोधात तो व के के (सोनाक्षी सिन्हा )परदेशात बुडापेस्ट ला जातात . तिथे त्या दोघांना बेपत्ता होण्यामागचं कारण व त्याचा सूत्रधार कळतो . त्यानंतर सुरु होते जॉन अब्राहम व त्या सूत्रधाराच्या गोळ्यांचा व बुक्यांचा आवाज व सिनेमा ची समाप्ती होती . 
जॉन अब्राहम चा अभिनय नक्कीच पाहायच्या लायक आहे . एक पिळदार शरीरयष्टीचा ,एक थंड डोक्याचा पोलीस अधिकारी व देशविरोधी शत्रुंना शोधून काढायची त्याची धडपड नक्की पाहण्याजोगी आहे . सोनाक्षी सिन्हा चा अभिनय पण छान आहे . पण बोलके डोळे असल्याने तिचा अभिनय अधिक डोळ्यांमधून दिसून येतो . सिनेमा चा खलनायक असलेला ताहीर नक्कीच आपल्याला खिळवून ठेवतो . सिनेमा मधून गुप्तहेर व त्यांचे देशासाठी केलेले प्रामाणिक योगदान ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे . ह्या सिनेमा ची कथा हि अतिशय उत्कृष्ट आहे पण डायरेक्टर ह्यांनी ती मध्यांतरानंतर ती पळवली  . सिनेमा च्या शेवटी केलेले शूटिंग पाहताना आपण COUNTERSTRIKE पाहतो काय असा प्रश्न पडतो ???सिनेमा मध्ये असलेला जेनेलिया देशमुख चा वावर हा सुखावतो . 
जॉन अब्राहम चे फॅन ,त्याची शरीर तंदुरुस्ती ,जेनेलिया चे फॅन व गुप्तहेर ची आवड ज्यांना आहे त्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा . 
२. ५ स्टार्स 
लेखन - कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...