Saturday, 8 December 2018

Book Review:-रंगाधळा; लेखक:-रत्नाकर मतकरी


मध्यरात्री त्याला अचानक जाग आली.ती कसल्यातरी विचित्र आवाजाने.अंधारातच त्याने खोलीभर नजर टाकली.आणि एक गोष्ट लक्षात येऊन,त्याच्या छातीत धस्स झाले.!आवाज झाला होता,तो दरवाज्याच्या कडीचा.त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती.
-आणि दार सावकाश उघडू लागले होते...
जागच्या जागी खिळल्यासारखा तो ते दृश्य पाहत राहिला.दारात एक म्हातारा उभा होता.
बोडका.टक्कल पडलेला,चेहरा सुरकुत्यांनी मढलेला.गालावरची हाडे वर आलेली,आणि अस्थिपंजर शरीर.डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते.त्याची नजर भयानक होती.जगन्नाथने किंकाळी मारली,पण ती ओठांमधून बाहेर फुटलीच नाही.त्या बोडक्या म्हाताऱ्याने त्याला आपल्याबरोबर चालण्याची खुण केली.
जगन्नाथ चालू लागला.खरेतर त्याला जायचे नव्हते पण स्वतःच्या शक्तींवर त्याचा ताबा राहिला नाही.सर्व शक्ती एकटवून तिथून पळून जावे,असे वाटत होते,पण मनाचे सांगणे पाय ऐकत नव्हते.कुठे निघाले होते ते दोघे?
अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका वेगळ्या अश्या प्रदेशात घेऊन जातात.गूढ,भयप्रद,अनामिक अश्या जगात.त्याचे बोट धरून वाचक पाने उलटत राहतो...
दर्ज्यांवर दर्जा.
©
Kaushik

Thursday, 29 November 2018

Film review:-2.0

Film review-2.0
One sentence review:- Perfect entertainer
but it fails to maintain the expectations of part 1 robot.
Stars:-2.5
Story could be elaborated much in detail.

दक्षिण भारतात तयार होणारे सिनेमे म्हणजे अचाट कल्पनाशक्ती.'गुरुत्वाकर्षण' ह्या गोष्टीला छेद देऊन उंच हवेत उडणारी माणसे,सरळ रेषेत उडणाऱ्या पेप्सी च्या बाटल्या, 180 डिग्री मध्ये फिरणारे चिल्लर,हवेत उंच उडी मारून परत जमिनीवर येणारा नायक,सामजिक संदेश,टेक्नॉलॉजी चा वापर करून खुळ लावणारे कथानक...आणि बऱ्याच गोष्टी दक्षिणेत तयार होणाऱ्या सिनेमात पाहायला मिळतात. 'रोबोट' ह्या सिनेमा ने असेच काहीसे खूळ लावले होते आणि 'रजनीकांत'  ह्या व्यक्तीला माणसापेक्षा मोठे केले होते.
2.0 हा देखील तसाच सिनेमा आहे.ह्या सिनेमा मध्ये अचाट Vfx ची दृश्य आहेत.पण हा सिनेमा कथेच्या बाबतीत काठावर पास होत आहे.
मोबाईल आणि मोबाईल टॉवर मुळे होणारे परिणाम आणि त्यातून घडणारे कथानक....असा एकूण सिनेमा चा पसारा आहे.संगीताच्या बाबतीत सिनेमा पूर्ण निराश करतो.सिनेमा पूर्णपणे 'अक्षय' आणि 'रजनीकांत' ह्या दोघांच्या कॅरॅक्टर भवती फिरत राहतो.कथा अजून खुलवता आली असती.'अक्षय' लाजवाब.अखेर 'रजनीकांत' नावाचे वादळ हे कथेच्या कमकुवत बाजू पण खाऊन टाकते.
कथेच्या बाबतीत:-काठावर पास
2.5स्टार्स
©Kaushik

Tuesday, 13 November 2018

राजीनामा

   
दुपारचे एक वाजलेले होते.जोरात fan चा आवाज ऐकू येत होता.अधूनमधून हळूच टिंग...टिंग असा आवाज ऐकू येत होता.मधूनच मच....मच...सुरर...ढूररर....असा आवाज येऊ लागला.काही वेळेनंतर मोठ्या वी.एम.सी मशीनचा आवाज येऊ लागला.वी.एम सी मशीन चा आवाज आल्यावर  बेल चा आवाज आला आणि एका मोठ्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर मधून पायांचा आवाज येऊ लागला.तीन मोठ्या पदावरचे अभियंते नुकतेच दुपारचे जेवण करून ग्राउंड फ्लोअर वरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आले आणि तिथे असलेल्या Washroom कडे गेले.
तिथून काही वेळाने बाहेर आल्यावर तिघे शतपावली करायला आपापल्या मिशींना पीळ देत कंपनी च्या आवारात असलेल्या जागेत फिरू लागले.काही वेळ फिरल्यानंतर तिघे परत आपापल्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑफिस मध्ये परतले.तिघांचे वेगळे ऑफिस होते.पहिला इंजिनिअर त्याच्या ऑफिस च्या बाहेर येऊन थांबला.तिथे थांबून त्याने त्याचा अवतार पाहिला.दुपारी भर पेट जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती.त्याने त्याचा विस्कटलेला शर्ट परत ईन केला आणि केसांवरून हाथ फिरवत आपली केशरचना व्यवस्थित करत तो त्याच्या केबिन मध्ये शिरला.त्या तिघांपेकी पहिला प्रोडक्शन हेड होता;दुसरा क्वालिटी; आणि तिसरा प्लांट हेड.
तिथे त्याच्या केबिन मध्ये ३ जुनिअर इंजिनिअर बसलेले होते.त्यांच्याजवळ तो पहिला इंजिनिअर जाऊन बसला.
“जेवण झाले काय?”
पहिल्या इंजिनिअर ने प्रश्न विचारला.
कुणीच उत्तर दिले नाही.
सर्व जण तोंड पडून बसले आहेत हे त्याच्या लक्षात आले.
“अरे...काय झाले?”
सर्व जुनिअर इंजिनिअर लोकांचे पडलेली तोंडे पाहून त्यांच्या साहेबांना काळजी वाटू लागली.
“साहेब..आपल्या जुन्या maintainance इंजिनिअर ने राजीनामा दिला.”
पहिला जुनिअर इंजिनिअर ने उत्तर दिले.
“का...”
“माहित नाही.”
“कुठे आहे राजीनामा...”
“हा माझ्या हातात...”
“मला दाखव...”
जुनिअर इंजिनिअर ने त्याच्या साहेबांना राजीनामा दाखवला.साहेब तो राजीनामा वाचू लागले.
 
“आदरणीय मालक
मी 'मन्सूर खान' आपल्या कंपनीत सुरवातीपासून आहे.सुरवातीपासून मी अत्यंत शिस्तबद्ध;कर्तव्यदक्ष;आणि कामाप्रती निष्ठा असलेला माणूस आहे.तथापि गेल्या काही वर्षापासून मला खूप त्रास होत आहे.माझे साहेब मला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत.ते मला 'ए नाग्या,,,बोक्या....ह्रिथिक...अंडी घालणारा कोंबडा' असे म्हणतात.कधीकधी मला ते 'गड्डापाव' असे म्हणतात.मला भर मिटिंग मध्ये ते 'नाम लावलेला गणपती' असे म्हणतात.मी सिनिअर असून सुद्धा साहेब असे का करतात ह्याचा मला प्रश्न पडतो.कधीकधी ते आम्हाला केबिन मध्ये बोलावतात आणि उगाचच आमच्यावर रागावतात.रागवत असताना आम्हाला हसू आले का हसलास; म्हणून पुन्हा रागावतात.रागवत असताना माणूस मान खाली घालून उभा राहतो.तसा मी मान खाली घालून  उभा राहिलो की, माझ्याकडे बघ; खाली मान घालू नकोस असे परत म्हणतात आणि रागावतात.कधीकधी ते मला 'शार्कमासा' म्हणतात.कधीकधी मला 'बदक' म्हणतात.कधीकधी मला बुट्टीने मारीन असे म्हणतात.कधीकधी मला ते सकाळी ६.०० वाजता फोन करतात आणि अजून झोपला आहेस म्हणून रागावतात.त्यांना राग अनावर झाला कि मला ते बोक्या;टग्या...मासा...नाग्या...ह्रिथिक असे म्हणतात.

मालक;एक वेळ ह्रिथिक ठीक आहे पण मासा...बोक्या...नाग्या....गड्डापाव..ह्याला काय म्हणावे.

मालक; कधी कधी मला असे वाटते की मी माणूस नाही प्राणी आहे.नाग्या...बोक्या....असे शब्द मला आता स्वप्नात पण ऐकू येत आहेत.मालक; मला आता फक्त मांजर आणि उंदीर म्हणायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे.काम करून सुद्धा साहेब ह्या सर्व नावांनी मला हाक मारत असतात.त्यामुळे मी मानसिक रित्या खचलेलो आहे.कधीकधी मला आपण प्राणी आहोत की काय असे उगीचच वाटू लागत आहे.म्हणून मी माझ्या साहेबांच्या मानसिक त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे.
स्वीकार करावा.
आपला नम्र
मन्सूर”


राजीनामा पूर्ण वाचून त्या पहिल्या इंजिनिअर ने तो टेबल वर ठेवला.काही सेकंद त्यांनी दीर्घ श्वास घेतला.श्वास घेऊन त्यांनी केबिन मध्ये असलेल्या इंजिनिअर लोकांकडे पाहिले आणि काही सेकंदात सर्वांचा सुरु झाला जोराचा आणि न थांबणारा हास्यस्पोट...
©

kaushik


Sunday, 4 November 2018

हाय जम्प

सायंकाळचे ५.०० वाजले होते.आजूबाजूला जोरदार वारे सुटले होते.पक्षांच्या किलबिलाट ऐकू येत होता.अधूनमधून गारेगार वाऱ्याची झुळूक जाणवत होती.लांबून सूर्यास्त दिसत होता.मधूनच स$रररर... असा आवाज ऐकू येत होता.अजस्त्र आणि भयावह वाटणाऱ्या पर्वतरांगा आजूबाजूला गुपचूप उभ्या होत्या.पर्वतरांगांमधून दिसणारी दरी अधिकच भयावह वाटत होती.लांबून एखादी गाडी आणि एखादी बस दिसत होती.मधूनच वाऱ्याचा वेग वाढत होता आणि कमी होत होता.जसजसे वेळ वाढत होता तसे आजूबाजूला भयावह वाटणारी अशी निःशब्द... अशी शांतता पसरत होती.पक्षांच्या किलबिलाट हळूहळू वाढत होता.

अजस्त्र अश्या असणाऱ्या पर्वतांमधून पायवाट दिसत होती.तिथून हळूहळू पायांचा आवाज येऊ लागला.२८ वर्षाचा तरुण तिथे असणाऱ्या पायवाटेवरच्या लहान झाडांवर पाय देत पुढे जात होता.पायवाटेवरून वाट काढत आजूबाजूला असणाऱ्या दगडांना धरत तो डोंगराच्या टोकाशी गेला आणि तिथे असणाऱ्या एका मोठ्या दगडाला टेकून उभा राहिला.त्याने वेळ पाहिली.सायंकाळचे ५.४५ वाजले होते.तो बराच उदास वाटत होता. त्याचा चेहरा बराच उदास आणि त्रासिक झाला होता.तो काही वेळ जमिनीवर विसावला आणि मनातल्या मनात विचार करू लागला.

“कधी संपणार हा त्रास...”

“किती प्रयत्न केले पण काही केल्या मार्ग दिसत नाही.आधी शिक्षणात अपयश;मग व्यवसायात अपयश...न संपणारा कर्जाचा डोंगर...”

तो खचून गेला होता.

“आयुष्यात आता काहीच उरले नाही.”

“कशाला जगायचे असे आयुष्य...”

“ह्या सर्व गोष्टींचा मला वैताग आला आहे.मला मुक्तता हवी आहे ह्या सर्वांमधून...”

विचार विचार करून तो पार खचून गेला.हळूहळू त्याच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागले.

“मी एवढ्या सर्व धार्मिक गोष्टी करतो तरी पण माझ्याच वाटेला हा त्रास...”

तो रडू लागला.रडूनरडून त्याचा चेहरा सुजला आणि त्याचे डोळे लालबुंद झाले होते.

त्याला सारेकाही संपले असे वाटत होते.

तो उठून उभा राहिला.त्याच्या मनात हा त्रास आता कायमचा संपवायचा असा भयानक विचार येऊ लागला.त्याने घड्याळ पाहिले.सायंकाळचे ५.५५ वाजले होते.तो हळूहळू डोंगराच्या एकदम टोकापाशी आला.त्याच्या कानावर सु$$$ई अश्या आवाजात गार वारे येऊ लागले.लांबून त्याला एका बाजूला सूर्यास्त दिसू लागला.त्याने आजूबाजूला दगडांवर अनेक प्रेमात बुडालेल्या व्यक्तींचे नाव पाहिले.स्वराजाची आठवण आणि साक्षीदार असलेल्या डोगरांच्या दगडांवर अनेक सैराट प्रेमींची नावं पाहून त्याला खटकले.तो आता दरीच्या अगदी जवळ गेला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला.लांबून सूर्य त्याला आता लालेलाल दिसू लागला.त्याने आजूबाजूला मनसोक्त शेवटचे पाहिले...आणि त्याने उंच खाली उडी मारायची ठरवली.तो उंच उडी मारणार तेवढ्यात त्याला  तिथे एक दगड दिसला.त्याचबरोबर त्याला इतिहासाची साक्ष असणारा असा एक सुप्रसिद्ध गड पर्वतरांगांमधून दिसू लागला.

त्या दगडावर काहीतरी लिहिले होते.त्याने ते पाहिले.

“हे ही दिवस जातील.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...”

त्याने ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचले.एक ते दोन मिनिटे तो ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचू लागला.फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याची विचारचक्रे बदलू लागली.त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा उमेद दिसू लागली.त्याने परत दरीत पाहिले.त्याला लांबून एक पक्षी उंच आकाशात झेप घेताना दिसला.त्याने परत तो इतिहासाची साक्ष देणारा गड पाहिला.त्याच्या अंगावर रोमांच येऊ लागले.

तो गड पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला.त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने स्वतःचे डोळे पुसले.परत त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिथे असलेली माती त्याने हातात घेतली आणि कपाळावर लावली आणि  पुन्हा नवीन उमेदीने अंगात बारा हातींचे बळ घेऊन तो डोंगर उतरू लागला.

©Kaushik shrotri.
#ichalkaranji

Thursday, 1 November 2018

बहिणी...

सायंकाळचे ४.०० वाजलेले होते.इचलकरंजी मध्ये रस्त्यावर बरीच वर्दळ सुरु होती.बऱ्याच सरकारी बसेस रोड वरून जात होत्या.बुलेट आणि यामाहा वरून २५-२७ वर्षाचे तरुण ट्रीपल सीट वरून बेफिकीर होऊन गाडी चालवत जात होते.अधूनमधून ट्राफिक पोलिसांच्या शिट्टीचा आवाज येत होता.बऱ्याच गृहिणी गाडी वरून रोड वरून जात होत्या.
दुपारी ४.१५ ला एक मोठी शाळेची बस आली.ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलनी जवळ थांबली.त्या बस चे दार उघडले गेले आणि त्यातून ४ मुली आणि आणखीन काही मुली खाली उतरल्या.चारही मुली आणि इतर मुली १० ते ११ वर्षाच्या होत्या.त्या त्यांच्या कॉलनीत असलेल्या घरी चालत निघाल्या होत्या.त्यांचे घर जेमतेम ५० मीटर अंतरावर होते.कॉलनीत थोडीफार वर्दळ जाणवत होती.आजूबाजूला कॉलनीमध्ये बऱ्याच टोलेजंग इमारती आणि गर्भश्रीमंतीने सजलेले असे बंगले होते.त्या ४ मुली एकमेकींशी गप्पा मारत निघाल्या होत्या.बहुदा शाळेतल्या गप्पा मारत असाव्यात असे त्यांच्या हावभावावरून दिसत होते.चारही मुली एकमेकींच्या चुलत बहिणी होत्या.पहिल्या मुलीचे नाव अनन्या;दुसरीचे स्वप्ना;तिसरीचे संजना;चौथीचे जान्हवी.चौघींच्या मम्मा शेजारी शेजारी उभ्या राहून त्यांची वाट पाहत लांब थांबल्या होत्या.अनन्या आणि स्वप्ना एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या आणि संजन,जान्हवी देखील एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या.त्याचबरोबर अनन्या.स्वप्ना ह्या संजना आणि जान्हवी च्या मामेबहिणी होत्या आणि संजना,जान्हवी ह्या अनन्या आणि स्वप्ना च्या आत्तेबहिणी होत्या.
काही वेळानंतर अनन्या,स्वप्ना,संजना आणि जान्हवी एकमेकींशी भांडायला लागल्या.अनन्या ने संजना ची चेष्टा-मस्करी केली.त्याच्या बदल्यात जान्हवी ही अनन्या शी भांडू लागली आणि त्याचे रुपांतर हळूहळू जोरदार भांडणात होऊ लागले.
संजना,’’ए ढमे!तू का माझे केस ओढत होतीस?.’’
संजना अनन्या कडे पाहत चिडली.
अनन्या,’’तू मला काल का चिडवत होतीस?.’’
स्वप्ना,’’संजे...अनन्या शी भांडायचे नाही.”
लहान बहिण म्हणून स्वप्ना ही संजना शी भांडू लागली.
जान्हवी,’’ए खुळे! कशाला भांडत आहात...चला ना घरी.”
अनन्या,’’कोण खुळी?शाळेत सारखे संजना मला ड्रेस वरून चिडवत असती.सारखे माझे पेन्सिल आणि रब्बर मागून घेती.तू खुळी...संजना पण खुळी...”
जान्हवी ने अनन्या ला रस्त्यावर जोरदार ढकलून दिले.चार बहिणी आपापसात शुल्लक कारणावरून भांडू लागल्या. चौघींचा आवाज वाढू लागला.त्यांचे भांडण रस्त्यावरून जाणारे लोकं पाहू लागले.त्यातले काही जेष्ठ व्यक्ती चौघींना रागवू लागल्या.चौघींचे भांडण पाहून त्यांच्या मम्मा त्यांच्यापर्येंत धापधाप पळत गेल्या.
अनन्या,’’मम्मा,जान्हवी मला खुळी म्हणाली.”
संजना,’’मम्मा,अनन्या ने माझे केस ओढले.”
स्वप्ना,’’मम्मा,संजना माझ्या दीदी शी भांडत होती.”
चौघींच्या मम्मा त्यांच्या कन्यांना धरून आपआपल्या घरी घेऊन गेल्या आणि घरी जात असताना एकमेकींकडे डोळे वटारून पाहत मनातल्या मनात बोलू लागल्या.योगायोगाने दोघी शेजारी-शेजारी होत्या.
अनन्या आणि स्वप्ना ची आई जान्हवी च्या आईकडे पाहत,’’काय ही संजना आणि जान्हवी....असे रस्त्यावर कोण भांडत असते का....काय शिकवलेच नाही हिने हिच्या पोरींना.नुसते लाडावून ठेवले आहे.तिच्यापेक्षा माझ्या मुली खूप सिन्सिअर आहेत.मी बोलणारच नाही हिच्याशी.”
संजना आणि जान्हवी ची आई अनन्या च्या आई कडे पाहत,’’माझ्या मुली खूप साध्या आणि सरळ आहेत.त्या कशाला भांडत असणार?.ह्या अनन्या ने नक्कीच संजना ची चेष्टा केली असणार.थांब आता मी पण बोलणारच नाही हिच्याशी.”
चौघी एकमेकींच्या घरी गेल्या आणि त्यांच्या घराचे दार फा$ड असा आवाज करत बंद झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता...
अनन्या आणि स्वप्ना शाळेसाठी आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची वेणी घालत होती.
शेजारी असलेल्या जान्हवी आणि संजना आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची bag भरत होती.
अनन्या आणि स्वप्ना आवरून bag घेऊन घराबाहेर आल्या.तेवढ्यात अनन्या आणि स्वप्ना च्या मम्मा ने त्यांना थांबायला सांगितले आणि ती घरात काहीतरी आणायला गेली.
शेजारी संजना आणि जान्हवी देखील तयार होऊन बाहेर आल्या.त्यांची मम्मा देखील “थांबा मी बस पर्येंत सोडायला येते” असे म्हणत परत घरात गेली.
दोन मिनिटांनी दोन्ही मम्मा घराबाहेर आल्या.सकाळचे ७.१२ वाजले होते.दोघींनी बाहेर नजर फिरवली.दोघींना आपआपल्या मुली दिसल्या नाहीत.दोघींनी शेजारी-शेजारी डोळे वटारून पाहिले.त्यांना स्वतःची कन्या कुठेच दिसत नव्हत्या.दोघीही पळतपळत घराबाहेर पडल्या आणि कॉलनीत असलेल्या बस stop जवळ जाऊ लागल्या.तिथे गेल्यावर त्यांना दृश्य दिसले.
काल भांडत असणार्या चौघी बहिणी आज सकाळी एकमेकींचा हात हातात धरून बस stop च्या दिशेने जात होत्या.त्यांच्या मम्मा पळतपळत बस stop पर्येंत आल्या.तेवढ्यात बस आली आणि चौघी बहिणी एकमेकींना हात देत बस मध्ये चढल्या आणि “बाय मम्मा” असे म्हणत त्या बस मध्ये बसल्या आणि त्यांच्या मम्मा ते दृश्य आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे बघत पाहू लागल्या.
©
#Kaushik Shrotri
#Ichalkaranji#Feelfreetoshare#


Monday, 29 October 2018

03:00 P.M



दुपारचे 03:00 वाजलेले होते.वैशाखाचा वणवा जोरदार पेटलेला होता. तापमान ४२ अंश होते.सुर्यनारायण दिवसेंदिवस डोळे वटारु लागले होते.वाऱ्याचा किंचितही लवलेश दिसत नव्हता.जमीन हळूहळू तापू लागली होती.कडकडीत ऊन पडलेले होते.मधूनच धुळीचा लोट येत होता आणि विरत होता.लांबून एखादे वाहन आणि एखादा ट्रक दिसत होता.आजूबाजूला असलेली झाडं सुकू लागली होती.मधूनच एखादा दुचाकीस्वार जात होता.अश्या ह्या पराकोटीच्या उन्हात तो डोक्यावर टोपी न घालता आणि पायात स्लीपर घालून येत होता.५ फुट ४ इंच,३५ वर्षाचा,फाटलेले आणि मळलेले कपडे आणि काळे झालेले हात अश्या अवतारात तो येत होता.बरेच अंतर चालुन आल्यामुळे तो थकलेला दिसत होता.हळूहळू तो चालत येत होता.चालत येत असताना तो घामाने डबडबू लागला.


तो चालत आजूबाजूला आडोसा शोधू लागला.पण आजूबाजूला काही कारखाने सोडल्यास पूर्ण ओसाड रान होते.तो चालत रस्त्यावरून जात असताना त्याला काही दुचाकीस्वार दिसत होते.त्यांना तो थांबवायचा प्रयत्न करत होता पण कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते.तो कासवाच्या गतीने चालू लागला आणि त्याला काही अंतरावर पिंपळाचे झाड दिसले.त्या झाडाखाली तो झाडाला लागून असलेल्या कठड्यावर बसला.पिंपळाच्या झाडाखाली त्याला बराच गारवा मिळत होता.काही मिनिटे तिथे बसल्यावर तो परत उठला आणि चालू लागला आणि त्याने त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न केला.


“Hello!....Hello”


पलीकडून आवाज आला.


“Hello!.कोण बोलत आहे? बोला ना....Hello…”


“मी बोलतोय....मी.....”


पलीकडून फोन कट झाला.


वैतागून तो परत चालू लागला.काही अंतर चालून झाल्यावर त्याला चहाची टपरी दिसली.एका झाडा जवळ असलेल्या  त्या टपरीजवळ तो गेला आणि तिथे तो बसला.त्याला तहान लागली होती म्हणून त्याने तिथे असलेल्या पाण्याच्या पेल्यातून पाणी पिऊ लागला.तो पाणी पिताच तिथे असलेले ४-५ माणसे तिथून झपाझपा पळू लागली.त्याला वाटले त्याच्या अवतारावरून ती माणसे पळून गेली असणार.त्याने त्याच्या अवताराकडे पाहिले.त्याचा अवतार भयंकर झाला होता.चेहरा काळा पडत होता.हात काळे पडत होते आणि केस पांढरे होऊ लागले होते.इतक्यात आपण म्हातारे होऊ असे त्याला वाटले नाही.त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या.


“किती तो ताण...किती तो त्रास..”


तो स्वतःशी पुटपुटत होता.


“इतके राब राब राबून देखील काय उपयोग आहे?बास झाले आता...पुरे तो संसार आणि जगणे...काही केल्या प्रश्न सुटत नाही आहेत.खर्च वाढत आहेत आणि पगार.....राबून पण काय उपयोग झाला?”


तो स्वतःशी मनातल्या मनात बोलू लागला.


“हा त्रास कधी संपणार?”


विचार करून करून त्याच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या.टपरीजवळ ४-५ लोकं जमलेली होती.पण कुणीही त्याच्याकडे पाहत नव्हते.


तो टपरीजवळ असलेले पाणी पुन्हा पिऊ लागला.पाणी पिऊन झाल्यावर तो पुन्हा चालू लागला.काही अंतर चालून गेल्यावर त्याला मोठा कारखाना दिसला.तिथून तो गेट मधून आत शिरला. तो आत शिरत असताना गेट जवळ त्याला watchman पण दिसला नाही.आत शिरल्यावर तो ऑफिस जवळ गेला.तिथे त्याला सर्व कामगार आणि मालक दिसत होते.तिथे कसलातरी कार्यक्रम सुरु होता.तो त्या कार्यक्रमाकडे पाहू लागला.उत्तम कमगिरी करणाऱ्या सर्वांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरु होता.तो लांबून त्या कार्यक्रमाकडे पाहू लागला.


काही वेळानंतर सर्व कामगार बाहेर आले आणि घरी जाऊ लागले.गेट च्या बाहेर उत्तम काम करणाऱ्या कामगारांचे सर्व जण अभिनंदन करू लागले.त्यापेकी एका कामगाराचे नाव प्रसाद होते. त्याला वर्षात सर्व दिवस हजर राहिल्याबद्दल सर्वजण अभिनंदन करत होते.त्याचे अभिनंदन करायला तो त्याच्या जवळ गेला.


“मित्रा, अभिनंदन!”


“धन्यवाद.”


“वर्षात तू एकदाही सुट्टी घेतली नाहीस.”


“कधीच नाही.काम हेच आपले देव आणि श्वास.”


“बरे वाटले मित्रा तुला बक्षीस मिळाल्याबद्दल.खूप कमी लोकांना त्यांच्या सच्चेपणाचे फळ मिळते.”


“कष्ट केल्यावर फळ हे उशिरा का होईना पण मिळते हा जगाचा नियम आहे.”


प्रसाद त्याच्याशी मोकळेपणे बोलत होता.


“प्रसाद.मग आत्ता पुढे?पुढची पोस्ट?”


“पाहू...साहेबांच्या मनात काय आहे ते...योग असेल तर एक दिवस Quality Engineer नक्की होईन.”


“तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा मित्रा.तुला भेटल्यावर मला समजले की काम करणार्याची जगात कदर होते”


“Thank you.तू नवीन आहेस का?तुला कधी पाहिले नाही मी.”


“मी कायम इथेच असतो इतरांसारखा सर्वसामान्य कामगार.”


“तरीपण मला सर्व जण माहिती आहेत.तुला नेमके कधी पाहिले ते आठवत नाही.”


“माझ्याबद्दल तू काही तासांपूर्वी ऐकले आहेस.”


तो प्रसाद कडे डोळे एकटक ठेऊन पाहू लागला.


“कधी...”


“आठव....”


प्रसाद आठवू लागला.


“तुला बक्षीस कुणाच्या तरी स्मरणार्थ मिळाले आहे.”


“कुणाच्या...”


“काही वर्षापूर्वी एक कामगार...”


प्रसाद त्याला मिळालेल्या मेडल कडे पाहू लागला.मेडल कडे पाहिल्यावर त्याच्या डोक्यात tube पेटली.तो प्रसादच्या जवळ आला आणि त्याच्याकडे तो निर्विकारपणे पाहू लागला.प्रसाद त्याच्याकडे भेदरून पाहू लागला.तो  प्रसाद कडे एकटक पाहू लागला आणि तो हळूहळू वातावरणात विरळ होत गेला आणि प्रसाद त्याच्या हातात असलेल्या मेडल कडे पाहतच राहिला.त्याला बक्षीस समारंभात झालेले भाषण आठवू लागले.


“प्रसाद ह्यांना पूर्ण वर्षभर एकही सुट्टी न घेतल्याबद्दल श्री.बबन हिंगमिरे ह्यांच्या स्मरणार्थ विशेष बक्षीस प्रदान करण्यात येत आहे.”


©


Kaushik Shrotri


Ichalkaranji


Saturday, 20 October 2018

Rain

Sun is roaring
Temperature is rising
Skin is getting flame
According to the sources


The land is degrading
It's time for the nature
To gather the ananymous clouds
To bless with the rain

Here comes the anonymous rain
Abolishing the skin flame.
Feeding the crops 
Turning the temperature upside down

Here comes the anonymous rain
Feeding the land with infinite serenity
Blomming the skies with dancing leafs
With a smile and the pain.

Here comes the anonymous rain
Triggering the emotions
 Having Infinite gain
With smile...and the pain.

©



Kaushik











Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...