Wednesday 2 May 2018

पुस्तक परिचय:-तू भ्रमत आहासी वाया ;लेखक:- व.पू.काळे

सदरचे कथानक आयुष्याचे एक कडवट सत्य सांगून जाते.सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान नाचू नये आणि दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये.Dont get attached to any things हे तत्व खूप सुंदररित्या कथा सांगून जाते.मनातल्या अंतर्मनात सुद्धा लाभ आणि हानी ह्यांची चित्र उमटू देऊ नयेत, हे तत्व पळणारी माणसे देखील ह्या जगात आहेत.कथेमधली सायरा ह्या तत्वात बर्यापेकी दडलेली आहे.दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवर पहिला दिवा कोणता हेच पटकन समजत नाही.तसे कृष्णभक्ती मध्ये सर्वस्व बुडालेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.वपुंनी सायरा ह्या पात्रामधून हाच संदेश दिला आहे.सायरा जिथे जिथे जाते तिथे ती त्या प्रसंगाचा भाग होऊन जाते.
कथेमध्ये सायरा, ओंकारनाथ आणि मांडलिक असे तीन पत्र आहेत.आयुष्याचे कडवट डोस पिऊन जगणारी सायराची आणि भौतिक सुखाच्या मागे पळणाऱ्याओमकारनाथ ची भेट होते आणि तिथून सुरु होतो आयुष्याच्या कडवट गोष्टींचा शब्दांचा खेळ.
सायरा हे एक परिपूर्ण वैचारिक वादळ आहे.ह्या वादळावर काही परिणाम होत नाही.मध्यबिंदू च्या भवती फिरणारी ही कथा आहे ज्यात ना द्वेष आहे ना आकस आहे ना हिंसा आहे. इथे आहे फक्त समुद्राच्या लाटांसारखे वाहणारे निरपेक्ष प्रेम.सुखापलीकडे दुख आहे आणि दुखापलीकडे सुख आहे.सदरच्या कथेमध्ये सायरा न बोलताच बरेच काही मिळवते आणि नायक बरेच काही गमवून बसतो.
तर फार खोलात न जाता आस्वादापलीकडे आनंद मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचावीच.
अमर्याद स्टार्स
©
kaushik

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...