Sunday, 20 May 2018

Book Review:-Kabandha(कबंध);Written by:-Shri.Ratnakar Matkari

गूढकथा म्हणजे नेमके काय? तर आयुष्याच्या एकाद्या मुलुखावेगळ्या पैलूंबाबत लिहिलेली कथा.सदरचा  कथासंग्रह हा मतकरींच्या इतर कथासंग्रहांपेक्षा स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवतो.सदरच्या पुस्तकात विविध प्रकारच्या रहस्यमयी कथा आहेत ज्या आपल्याला हळूच चिमटे काढतात. "कबंध" ह्या कथेमध्ये मानवी शरीर आणि विचारांचा कसा आपल्यावर परिणाम होतो ह्याचे उत्तम वर्णन केले आहे."म्हणे कोण मागे आले" ह्या कथेमध्ये भास आणि फँटसी ह्याचा उत्तम वापर केला गेला आहे."श्रीमंत" ह्या कथेमध्ये एका सर्व सामान्य माणसाला श्रीमंत होण्यासाठी कसे ब्रेन वॉश केले जाते ह्याचे रहस्यमयी पद्धतीने वर्णन केले आहे.त्याच बरोबर "लांबणीवर" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो-क्लिक" ह्या दोन कथा मस्तपैकी घाबरून सोडतात आणि हळूच चिमटे कडून जातात.
सर्व कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मानवी स्वभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.सर्व च्या सर्व कथांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
अवश्य वाचा
अमर्याद स्टार्स
©
Kaushik


Sunday, 6 May 2018

सेल्फी-क्विंस

सकाळचे ११.३० वाजले होते.कोल्हापूर ला रॉयल प्लाझा ला मी पुण्याला जाणारी कोंडुसकर गाडीची वाट पाहत उभा होतो.वैशाखाचा वणवा जोरदार पेटला होता.कोल्हापूर मध्ये तापमान चाळीस अंश होते.सुर्यनारायण शरीर पिळून काढत होते.अखेर ११.४५ ला कोंडुसकर आली आणि अखेरचं मला हुश्य झाले.लगेचच समान घेऊन मी गाडीमध्ये चढलो आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो.खिडकीकडेला माझी जागा होती.गाडीमध्ये ए.सी असल्याने उन्हापासून माझी सुटका झाली.कानात हेडफोन घालून मी गाणी ऐकत गाडी सुटण्याची वाट पाहत बसलो.


बरोबर १२.०० वाजता कोंडुसकर निघाली.मी खिडकीतून कोल्हापूर न्याहाळत आणि गाणी ऐकत बसलो होतो.बरोबर १२.१० वाजता बस शिरोली जवळ थांबली आणि दोन मिनिटांनी लगेचच निघाली.मी गाणी ऐकत बसलो असताना मला लेडीज पर्फुम चा गारेगार सुगंध चा स्वाद येऊ लागला.बस सुसाट वेगाने निघाली होती.बरोबर १२.३० ला मला मी ऐकत असलेल्या गाण्यांचा आवाज कमी ऐकू येऊ लागला आणि मला कुणीतरी अखंड चिवचिव करत असल्याचा आवाज ऐकू आला.मी कानातून हेडफोन बाजूला काढला.माझ्या सीट च्या शेजारी एक मुलगी आणि तिच्या शेजारच्या सीट वर कोल्हापूरच्या दोन मुली अखंड चिवचिव करत बसलेल्या होत्या.त्यांनी मारलेल्या पर्फुम चा स्वाद एव्हाना सर्व बस मध्ये पसरलेला होता आणि माझ्या नाकात सहज रित्या जात होता.त्या मुलींकडे मी हळूच नजर फिरवली.तिघीही गोऱ्या घार्या होत्या.लाल रंगाचा ड्रेस आणि ब्लू जीन्स मध्ये तिघींनी बस चे वातावरण पूर्ण उजळून टाकले होते आणि बस मध्ये एव्हाना महाबळेश्वरचे प्रणयरम्य वातावरण निर्माण केले होते.एव्हाना बस मध्ये असलेल्या सर्व तरुण हृदयांची नजर त्या मुलींवर पडलेली होती.


थोड्याच वेळात तिघींची चिवचिव थांबली आणि दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.ओठांचा चंबू करत आणि चेहऱ्यावर विविध प्रकारचे भाव आणत दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.पाच मिनिटात दोघींनी १०० सेल्फी काढले आणि सर्व सेल्फी त्या दोघी माझ्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीला दाखवले.१०० सेल्फी नंतर दोघींनी त्यांचे जुने फोटो पाहायला सुरवात केली.


“ए, हा बघ ना किती सुंदर फोटो आहे....’’


“ह्या फोटोत आय-लायनर ची शेड किती सुंदर आहे...’’


“हा फोटो काही खास नाही आला डिलीट कर...’’


“हा कोण ग हिरो...तुझा...’’


“माझी पाउट पोज तुझ्यापेक्षा भारी आहे...’’


दोघींची बडबड अखंड चालू होती.माझ्या शेजारी बसलेली तिसरी शांतपणे तिच्या शेजारच्या मुलींच्या फोटोंना भारी भारी म्हणत दाद देत होती.


अखेर तिघींची चिवचिव थांबली आणि तिघीं झोपल्या.


तिघी झोपल्यावर मी कानाला हेडफोन लावला आणि गाणी ऐकत मी देखील झोपलो.


दुपारी १.३० ला मला जाग आली.गाडी कराड च्या जवळ आली होती.मी शेजारी पाहिले तर त्या तिघींचे जोरदार भांडण सुरु होते.


“मी काढलेले सेल्फी कुठे गेले?’’


“असतील ना...’’


“नाही आहेत.’’


माझ्या शेजारी बसलेल्या मुलीने उत्तर दिले.


“सॉरी,चुकून डीलीट झाले.’’


“डिलीट...’’


पहिली मुलगी उत्तर ऐकून चिडली.


“तुझा फोन मी तू झोपली होतीस तेव्हा पाहत होते.तेव्हा चुकून डिलीट झाले.Sorry.’’


“Sorry…disgusting.किती सुंदर फोटो आले होते...I am not talking to you. We are no more best friends.’’


तिच्या वाक्याने तिघींचे चेहरे वेगवेगळ्या दिशेने गेले आणि बस मध्ये सुरु झाला जोरदार हास्यस्फोट...


Wednesday, 2 May 2018

पुस्तक परिचय:-तू भ्रमत आहासी वाया ;लेखक:- व.पू.काळे

सदरचे कथानक आयुष्याचे एक कडवट सत्य सांगून जाते.सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान नाचू नये आणि दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये.Dont get attached to any things हे तत्व खूप सुंदररित्या कथा सांगून जाते.मनातल्या अंतर्मनात सुद्धा लाभ आणि हानी ह्यांची चित्र उमटू देऊ नयेत, हे तत्व पळणारी माणसे देखील ह्या जगात आहेत.कथेमधली सायरा ह्या तत्वात बर्यापेकी दडलेली आहे.दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवर पहिला दिवा कोणता हेच पटकन समजत नाही.तसे कृष्णभक्ती मध्ये सर्वस्व बुडालेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.वपुंनी सायरा ह्या पात्रामधून हाच संदेश दिला आहे.सायरा जिथे जिथे जाते तिथे ती त्या प्रसंगाचा भाग होऊन जाते.
कथेमध्ये सायरा, ओंकारनाथ आणि मांडलिक असे तीन पत्र आहेत.आयुष्याचे कडवट डोस पिऊन जगणारी सायराची आणि भौतिक सुखाच्या मागे पळणाऱ्याओमकारनाथ ची भेट होते आणि तिथून सुरु होतो आयुष्याच्या कडवट गोष्टींचा शब्दांचा खेळ.
सायरा हे एक परिपूर्ण वैचारिक वादळ आहे.ह्या वादळावर काही परिणाम होत नाही.मध्यबिंदू च्या भवती फिरणारी ही कथा आहे ज्यात ना द्वेष आहे ना आकस आहे ना हिंसा आहे. इथे आहे फक्त समुद्राच्या लाटांसारखे वाहणारे निरपेक्ष प्रेम.सुखापलीकडे दुख आहे आणि दुखापलीकडे सुख आहे.सदरच्या कथेमध्ये सायरा न बोलताच बरेच काही मिळवते आणि नायक बरेच काही गमवून बसतो.
तर फार खोलात न जाता आस्वादापलीकडे आनंद मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचावीच.
अमर्याद स्टार्स
©
kaushik

Tuesday, 1 May 2018

Film Review:-Avengers:Infinity War

 Frankly speaking, I haven't seen any of the previous movies of characters of Avengers from the movie.Avengers: Infinity War, is longer but it is enjoyable.
The story is about typical Good and Bad Evil fights.The movie brings all these good guys together – against a bad guy, namely Thanos, who’s been a looming threat to Universe which is played by Josh Brolin in a terrific motion-capture performance that doesn’t miss a nuance. Thanos is a 12-feet-tall, purple-skinned mega-villain reminding great Khali who’s bent on acquiring all six of the Infinity Stones from all Avengers and wiping out half of the galaxy’s population to save the other half. Every superhero is given their respective stomping grounds, must do what they can to stop him.
 But because there are so many of them in the mix, it’s practically impossible for every significant character to get a huge amount of screen-time here.One thing I couldn't digest was the end of the movie.Entire CGI and Visual Effects needs a big shout out.Villan of the movie gets much more attention than the Avengers of the movie who makes all the Avengers fight till there last blood.
Take a Pop-Corn and Pepsi and enjoy the movie.
One time watch.
Two stars from my side.
©

kaushik

Thursday, 19 April 2018

पुस्तक समीक्षण:-एक दिवा विझताना... लेखक:-श्री.रत्नाकर मतकरी

गूढ म्हणजे काय? तर विज्ञानाच्या चौकटीत न बसणारी कल्पना.पण आपण ज्याला प्रमाण मानतो ते विज्ञान जर अपुरे पडले तर...

या कथा संग्रहामध्ये चटकन न समजणारी बरीच रहस्य आहेत.''चौथी खिडकी'' ही एक अफलातून विज्ञान कथा ''काळ'' ह्या संकल्पनेभोवती फिरत राहते. ''पोरखेळ''  ह्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले भावले असणे हे सूत्र मांडले आहे.कलावंत आणि कला ह्याचं संबंध असलेली एक दर्जेदार कथा पुस्तक वाचत असताना वेगळ्याच कल्पनेच्या खूप दूर असलेल्या जगामध्ये घेऊन जाते.बऱ्याच विषयांच्या खोलात जात असताना त्याची उत्सुकता आणि थ्रील अखेरपर्येंत टिकून राहते.एखाद्या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक वाट चुकून आपण एका माहिती नसलेल्या धसुर वाटेकडे जातो तसे काही कथा वाचत असताना जाणीव होत राहते.सर्व च्या सर्व कथा ह्या वास्तव आणि कल्पना ह्यांच्या सीमेवर सुरु होतात.वाचकांना एखाद्या विषयात गुंतवून ठेवत असताना लेखकांनी बऱ्याच शैल्या वापरल्या आहेत पण हा प्रवास विलक्षण आकर्षक असा असतो जो पूर्ण खोलात घेऊन जातो.कथा वाचत असताना अंगात एक अनामिक अशी लहर जाणवत असल्याची जाणीव होत राहते.सर्व च्या सर्व कथा ह्या सर्व तरुण लेखकांसाठी कादंबरी समान.

कौशिक    
©
Ichalkaranji


Monday, 9 April 2018

Book Review:- Century is not Enough(Sourav ganguly); Written by: Gautam Bhattacharya

To many cricket fans, the modern Indian cricket era truly began after Sachin Tendulkar made his debut in 1989 like a sparkling star but the man who at long last managed to mould the team into a winning army - That man was Sourav C Ganguly.
Indian cricket was ruled and developed by the big three people in the 90-95 Era.Sourav Ganguly, Rahul Dravid, Sachin Tendulkar.All these people had given their immense contribution in developing the professional cricket culture in India. These 3 people had brought the ultimate joy in our life.
The entire career of Sourav Ganguly was like a warrior. This book explains all his aspects of the cricketing career. In each and every chapter writer has touched various phases of the life of Sourav.During 1998 period when the match-fixing issue had completely destroyed the cricketing culture in the India Sourav Ganguly had come forward to wear the tight cap of the captaincy of the team. Sourav has explained all his cricketing phases from his 1st match to his retirement from the cricket. This is not just a memoir but also it is a self-guided book.Sourav Ganguly's life was filled up with a huge amount of ups and downs.From each and every chapter Sourav tries to explain how he has faced all the rejections and failures in his life and how he has succeeded to come out of it. Whether it would be Greg Chappel episode or whether it would be IPL matches and Whether it would be his initial 4 years of struggle to become the regular team member.He fought his way out of every corner and climbed from every defeat.

There are many inspiring lines in a book which will inspire all young and struggling people to keep moving on in the life.
1. You may not have a mentor.
2. Your journey will always be a challenge.
3.Every darkness has an expiry date.
4.The ups and downs, successes and failures will toughen you up.
5. So train your mind and be your own hero.
6.Being winner is all about what happens in your mind.
7. Keep the fire burning battle can do wonders.

Don't miss a cricketing journey of a warrior.

5 stars from my side

©
Kaushik

Sunday, 1 April 2018

पुस्तक परिचय :- मध्यरात्रीचे पडघम;लेखक-रत्नाकर मतकरी

"तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो... गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा ! पोपटाच्या चोचीसारखं नाक ! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे ! मला तर त्यांच्या डोळ्यांची भीतीच वाटते... ...त्या दिवशी,रात्रीची गोष्ट.मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर 'धम धम' वाजवत होतं. त्याच 'धम धम धम' तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक 'गूंऽऽ' असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा 'धम धम' वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय ? बिछान्यात आहेच कोण ?...''

अशी एखादी कथा वाचत असताना मनात साठलेले गूढ अलगदपणे बाहेर येते.
सदरच्या पुस्तकात सर्व कथा ह्या भीषण...करुण...गूढ...विक्षिप्तपणा...अश्या भावनांनी भरलेल्या आहेत.अवचिन्ह ह्या कथेचा थरार...झोपाळा ह्या कथेमध्ये हळूच अलगद चिमटा काढत वाटणारे भय...मंदा पाटणकरची गोष्ट ह्या कथेमध्ये घाबरून सोडणारा शेवट...फिरून त्याच जागी ह्या कथेमध्ये मानसशास्त्राचा केलेले अभ्यास...सर्वच्या सर्व कथा वाचकांना गुंतवून ठेवून घाबरून सोडतात.सर्वच्या सर्व कथा जबराट आहेत.शब्दांमध्ये ताकद कशी  ह्याचे उत्तम उदहरण म्हणजे सदरच्या पुस्तकाचे लेखकांची इतर पुस्तक आणि कथा.
कथा कशी लिहायची हे जर शिकायचे असेल तर रत्नाकर मतकरी ह्यांच्या पुस्तकांचे पारायण करावे.

माझ्याकडून फर्स्ट  क्लास 
©
कौशिक 

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...