बऱ्याच दिवसांनी बाहुबली 2 नंतर आलेला उत्कृष्ट सिनेमा.ह्याची कथा पण रंजक आहे.पालक आणि मुलांच्या नात्यावर कथा स्पर्श करते.Boarding school मध्ये शिकण्यास जाणारा kabir(sumant shinde)पासून कथा सुरू होते.अतिशय शिस्तीत व अबोल आयुष्य जगणाऱ्या कबीर च आयुष्य पार्थ भालेराव(dhoongya) आणि dhirya(प्रतीक लाड) आणि graace(रितिका श्रोत्री) ह्यांच्या येण्याने बदलून जाते.Boarding school च्या विद्यार्थ्यांचे विश्व ह्यातून उत्तम दाखवले आहे.16 वरीस असताना शरीरात होणारे बदल,मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांच्या विषयी वाटणारे आकर्षण,त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा उत्तम रित्या दाखवला आहे.सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही(गाणी सोडून).प्रतीक लाड,पार्थ भालेराव ह्यांच्या अभिनयाने कथेमध्ये जान आणली आहे.नवखा सुमंत शिंदेच्या अभिनयाला उत्तम दाद द्यायला हवी. विद्यार्थी प्रिय शिक्षक संतोष जुवेकर चांगला लक्षात राहतो.बाकी सिनेमा पूर्ण पैसे वसूल....
३.5 मिरची माझ्याकडून.....
समीक्षण-कौशिक श्रोत्री
लिखाणाचे सर्व हक्क राखीव.
Monday, 18 September 2017
Film review-Bwoyzzzzzzzz
Friday, 25 August 2017
विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
तुझ्या आगमनाची लागली होती ओढ.
तुझ्या येण्याने समस्त आसमंत झाले गोड.
तुझ्या स्वागतासाठी सर्व विभागलेले झाले एक.
सर्व कुटुंबांचा तु विघ्नहर्ता.
मोरया,मोरया,मोरया.
तु सर्व विद्यार्थ्यांचा गुरू.
तु सर्व तरुणांचा मार्गदर्शक.
तु सर्व कलाकारांचा दैवत.
तुच गुरू,तुच माता,तुच पिता,तुच मित्र.
मोरया,मोरया,मोरया.
तुझ्या नावाचा महिमा आहे आभाळाएवढा मोठा.
तुझ्या जयजयकारापुढे ध्वनी होतो छोटा.
तुझ्या नावानं सर्व विघ्न क्षणात होतात नाहीशी.
तुझ्या येण्याने सर्व जीवन झाले गोडधोड.
तुझा महिमा आहे समस्त शब्दांच्याहून थोर.
गणपती बाप्पा मोरया.
लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.
Monday, 21 August 2017
Book review- Through Thick and Thin, Writer-Mr.Vivek Deshpande(Retired Deputy Commissioner,Maharashtra Police)
Tuesday, 1 August 2017
पुस्तक परीक्षण-Our story needs no filter लेखक-सुदीप नगरकर
सदरचे पुस्तक हे निखळ मैत्री व कॉलेज मधल्या राजकीय निवडणुकीचे वातावरण ह्यावर आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या तरुण पात्रांच्या आयुष्यावर कथानक आहे.पुस्तकाची सुरवात अतिशय रंजक आहे.कॉलेज चे निवडणुकीचे वातावरण,जात ह्या विषयावरून केलं जाणारे तरुण मुलांचं brainwash,पुढच्या आयुष्याचा विचार न करता अश्या संमोहनाच्या आहारी जाणारी पिढी ह्यावर परखडपणे भाष्य केलं गेलं आहे.त्याचबरोबर मैत्री कशी निखळ असू शकते ह्यावर ही नेमकेपणाने भाष्य केलं आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या पात्रांची निखळ मैत्री व रघु हे पात्र संकटात सापडले असताना त्याला त्या संकटातून बाहेर काढणारे त्याचे मित्र हा प्रवास खिळवून ठेवणारा आहे.मला एक गोष्ट जाणवली की सध्याच्या तरुण पिढीने कुठल्याही खोट्या संमोहनाच्या आहारी न जाता सत्य पडताळून पुढे जावे.कॉलेज चे वातावरण,मैत्रीचे रुसवे फुगवे अतिशय सुंदरपणे लिहिले आहेत. लेखक मूळचे अभियंता असल्याने माझी ह्या पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली होती.कथेचा प्रवास हा प्रचंड सुसाट आहे जो पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय थांबत नाही.
माझ्याकडून 👍👍👍👍👍
परीक्षण-कौशिक श्रोत्री
Wednesday, 19 July 2017
पुस्तक परीक्षण - भुलभुलैय्या , लेखक - व.पु.काळे
Tuesday, 4 July 2017
Long Reverence Walk
Saturday, 1 July 2017
Book Review- The Boy who loved, Writer-Durjoy Dutt.
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...