Monday 18 September 2017

Film review-Bwoyzzzzzzzz

बऱ्याच दिवसांनी बाहुबली 2 नंतर आलेला उत्कृष्ट सिनेमा.ह्याची कथा पण रंजक आहे.पालक आणि मुलांच्या नात्यावर कथा स्पर्श करते.Boarding school मध्ये शिकण्यास जाणारा kabir(sumant shinde)पासून कथा सुरू होते.अतिशय शिस्तीत व अबोल आयुष्य जगणाऱ्या कबीर च आयुष्य पार्थ भालेराव(dhoongya) आणि dhirya(प्रतीक लाड) आणि graace(रितिका श्रोत्री) ह्यांच्या येण्याने बदलून जाते.Boarding school च्या विद्यार्थ्यांचे विश्व ह्यातून उत्तम दाखवले आहे.16 वरीस असताना शरीरात होणारे बदल,मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांच्या विषयी वाटणारे आकर्षण,त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा उत्तम रित्या दाखवला आहे.सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही(गाणी सोडून).प्रतीक लाड,पार्थ भालेराव ह्यांच्या अभिनयाने कथेमध्ये जान आणली आहे.नवखा सुमंत शिंदेच्या अभिनयाला उत्तम दाद द्यायला हवी. विद्यार्थी प्रिय शिक्षक संतोष जुवेकर चांगला लक्षात राहतो.बाकी सिनेमा पूर्ण पैसे वसूल....
३.5 मिरची माझ्याकडून.....
समीक्षण-कौशिक श्रोत्री
लिखाणाचे सर्व हक्क राखीव.

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...