Wednesday 25 January 2017

सिने परीक्षण -काबिल

ह्रितिक रोशन एक राजपुत्राला साजेसे असलेलं एक व्यक्तिमत्व व अभिनेत्याला एका अंध व्यक्तिरेखेच्या भूमिकेत पाहणे जरा कठीणच होते . पण सिनेमा पाहिल्यावर हा एक नक्कीच कसलेला अभिनेता आहे हे जाणवत राहते .
सिनेमा ची कथा  रोहन भटनागर (ह्रितिक रोशन) व सुप्रिया (यामी गौतम ) ह्यांच्याबोवती फिरते . एक कसलेला परंतु अंध असूनही नकलाकार असलेला रोहन भटनागर(ह्रितिक रोशन ) ची भेट एका अंध असलेली मुलगी सुप्रिया (यामी गौतम )शी होते . पुढचे आयुष्य एकत्र जगण्याचे दोघे एकमेकांना वाचन देतात व एकत्र येतात . एकत्र येऊन पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना सुप्रिया (यामी गौतम ) चा एका अनपेक्षित घटनेने मृत्यू होतो . ह्या अनपेक्षित घटनेमध्ये एका राजकीय पुढार्यांचा भावाचा सहभाग असल्याने त्याचा रोहन भटनागर (ह्रितिक रोशन ) च्या आयुष्यावर परिणाम करून जातो .पुढे न्याय व्यवस्था कडून पूर्ण न्याय न मिळाल्याने व घटनेला राजकीय वरदहस्त मिळाल्याने रोहन भटनागर ( ह्रितिक रोशन ) अखेर स्वतः पुढे होऊन अत्यंत चलाखीने व धूर्तपणे थंड डोक्याने खेळी करून आपल्या पत्नीच्या मारेकर्यांना शोधून काढतो व सिनेमा संपतो . सिनेमा पाहताना आपण अशी कथा असलेले सिनेमे पहिले असल्याचं जाणवते . यामी गौतम न एका अंध मुलीची भूमिका खूप चांगली केली आहे .एक साधी ,सरळ असलेली एका मुलीची भूमिका तिला खूप छान जमली आहे . नरेंद्र झा व मराठमोळा गिरीश कुलकर्णी ह्या २ अभिनेत्यांना   एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका पूर्णपणे पेलली आहे. खलनायक असलेले रोहित व रोनित रॉय हे दोघे भूमिकेत  फिट बसतात. अखेर सिनेमाचे प्रमुख आकर्षण ह्रितिक रोशन . ६फूट ,पिळदार शरीरयष्टी ,गोरापान व ज्याच्याकडे पाहताच समस्त तरुणांचा आदर्श व   समस्त तरुणींचा लाडका असलेला व राजपुत्राला हि लाजवेल व सुप्रसिद्ध डान्सर  असे व्यक्तिमत्व असलेले ह्रितिक रोशन हा ह्या सिनेमा मध्ये आपल्या अभिनयाचा शेवट(सर्वोच ) करतो . एका अंध व्यक्तीची भूमिका करताना त्याचा त्याने केलेला  बारीक अभ्यास,अंध व्यक्तीची रोजच्या असलेल्या गोष्टी व  मेहनत आपल्याला जाणवते . मध्यंतरानंतर कथेमध्ये पूर्ण बदल होतो व व्यवस्थेच्या  च्या विरोधात लढाई करायचे धाडस करतो व हा अभिनय आपल्याला सिनेमा मध्ये आणखीन खोलवर घेऊन जातो . कथेमध्ये अंध व्यक्ती ह्या पूर्णपणे स्वावलंबी व स्व-कमाई करणारे व स्वतः स्वतंत्र राहणारे आहेत ह्यावर अधिक प्रकाश टाकला आहे हे वेगळेपण पूर्ण जाणवते .कुठल्याही व्यक्तीला कमी लेखू नये ह्यावर कथेमध्ये प्रकाश पडला आहे .
सिनेमाच्या  कथेमध्ये खूप उणिवा जाणवतात . ह्रितिक रोशन व यामी गौतम हे अंध कसे झाले ह्याचा उलगडा सिनेमा मध्ये होत नाही . दोघांच्याही घरचे एक हि व्यक्ती नाहीत हे पाहून जरा आश्चर्य होते . पण ह्रितिक रोशन हा अष्टपैलू अभिनेता आपल्याला कथेच्या उणीव विसरायला लावतो व आपल्याला कथेच्या पूर्ण खोलात घेऊन जातो. एक उपेक्षित पात्र ह्रितिक रोशन ने पूर्ण मेहनतीने रंगवले आहे .  सिनेमा चे संगीत आपली पूर्ण निराशा करते . कथेचे  मास्टरटेलर असलेले  राकेश रोशन व ह्रितिक रोशन आपले पैसे पूर्ण पणे फेडतात .
माझ्याकडून ह्या सिनेमाला फर्स्ट क्लास .
जरूर पाहावा .

लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...